शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी हत्या केलेल्यांची नावे समोर, मृतांमध्ये महाराष्ट्रातील ६ जण, जखमी कोण?
2
"पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारला असेल तर त्याला भाजपाचं द्वेषाचं राजकारण जबाबदार’’, संजय राऊतांचा आरोप
3
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
4
व्हीआय आणि बीएसएनएल विलीन होणार? दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधियांनी केलं स्पष्ट
5
गावचा कचरा साफ करून मुलीला शिकवलं; चार ओळीची चिठ्ठी लिहून तिने आयुष्य संपवलं
6
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा... म्हणे, हल्ल्यामागे भारतातील लोकांचाच हात, आम्ही दहशतवादाच्या विरोधात!
7
पहलगाम हल्ल्यानंतर कोकण किनारपट्टीवर अलर्ट! पोलिसांनी गस्त वाढवली; संशयित हालचालीवर लक्ष ठेवण्याचे आदेश
8
₹९,३७,०२,९०,८९,७०० चं कर्ज आणि जग जिंकण्याचं स्वप्न.., काय आहे वेदांताच्या अनिल अग्रवालांचा प्लान?
9
...ती पैशानंही 'गब्बर' झाली होती; टोकाचा निर्णय घेण्यापूर्वी डॉक्टरांचे शेवटचे ३ कॉल
10
पहलगाममधील हल्ल्यानंतर बारामुल्ला येथे तुंबळ चकमक, लष्कराकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान 
11
₹८९४ कोटींचा व्यवसाय, तरी का विकली गेली 'बिर्याणी बाय किलो'; कोण आहे नवा मालक, कितीत झाली डील?
12
Pahalgam Attack: हातात रायफल, डोक्यावर टोपी; दहशतवाद्याचा पहिला फोटो आला समोर
13
टॅक्स भरण्यासाठी आता सीएकडे जाण्याची गरज नाही; सरकारच्या ई-पे टॅक्स पोर्टलवरुन होईल काम
14
दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर राहुल गांधींचा अमित शाह यांना फोन; काय चर्चा झाली?
15
सौदीतून परतलेल्या मोदींना डोभाल आणि जयशंकर यांनी विमानतळावरच दिली पहलगाम हल्ल्याबाबत माहिती, मोठा निर्णय होणार?   
16
पतीसोबत काश्मीरमध्ये फिरायला गेली होती टीव्ही अभिनेत्री, दहशतवादी हल्ला झाल्यानंतर म्हणाली- "आम्ही आजच सकाळी..."
17
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर उरीमध्ये घुसखोरीचा प्रयत्न उधळला; लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरूच
18
पत्नीच्या मदतीनं करू शकता ₹४४,७९३ च्या मंथली पेन्शनचा जुगाड; एका झटक्यात मिळतील ₹१,११,९८,४७१
19
पहलगाम हल्ल्यावरून राज ठाकरे संतप्त, केंद्राला म्हणाले, "दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडेल असा...’’,   
20
Pahalgam Terror Attack: गोळ्या झाडल्या जात होत्या, मागे राहिलेले मारले जात होते... धावत होते

तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2024 10:15 IST

Loksabha Election - कणकवली येथे जाहीर सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजपासह अमित शाह, नारायण राणे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. 

कणकवली - Uddhav Thackeray on BJP ( Marathi News ) देशाचे प्रश्न भाजपा विसरून गेली, आता काँग्रेस ज्यांना जास्त मुले त्यांना तुमची संपत्ती काढून देणार असं भाजपा बोलतेय. तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही त्यात आमचा दोष काय? म्हणून तुम्हाला आमची मुले कडेवर घ्यावी लागतायेत. पण हे करताना गावात कचरा उचलणारी गाडी येते तसं निवडणुकीत कचऱ्याचं प्रदर्शन लावलंय, ज्यांना बाळासाहेबांनी गेट आऊट केले, ते इथले उमेदवार आहेत. तु कोणाला धमक्या देतोय, या धमक्यांना कोकणवासियांनी गाडून टाकलंय अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंवर घणाघात केला. 

कणकवलीच्या सभेत उद्धव ठाकरे म्हणाले की, २००५ ची पोटनिवडणूक होती. संपूर्ण दहशतीचं सावट होते, मी स्वत: ८ ते १० दिवस इथं राहिलो होतो, गावपाड्यात जात होतो. तुमच्यातील काही लोक माझ्याकडे आले, इथे आम्हाला लढणारा माणूस द्या, आमची मुले-बाळे यांना इथे जायचं असते. त्याच्यानंतर वैभव, विनायक उभे राहिले. तुम्ही सगळे उभे राहिले. श्रीधर नाईकांपासून मालिका सुरू झाली, अंकुश राणे कुठे गेले, हत्या झाली, गायब झाले कुठे गेले काही भुताटकी आहे, राणेंना मत म्हणजे मोदींना मत, गुंडगिरीला मत आहे. जनतेच्या डोळ्यात त्यांनी केलेली पापे आजही कायम आहे असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितले. 

तसेच उगाच वाट्टेल ते बडबडू नको, विनायक राऊतांची १० वर्षातील संसदेतील भाषणे आणि यांची भाषणे हे पाहा आणि मत द्या. ज्या घराणेशाहीविरोधात मोदी बोलतायेत, मी घराण्याचा वारस आहे. अभिमानाने सांगतो. अमित शाहांच्या प्रमाणपत्राची गरज नाही. मी अभिमानाने सांगतो, मी माझ्या वडिलांचे नाव सांगतो, तसं तुम्ही तुमच्या वडिलांचे नाव सांगा, माझ्या वडिलांच्या नावाने मत मागू नका. तुमच्या वडिलांच्या कर्तृत्व नाही का? असा सवालही उद्धव ठाकरेंनी केला. 

दरम्यान, मी मुख्यमंत्री असताना विधानसभेत सावरकरांवर बोललोय, तुम्ही श्यामाप्रसाद मुखर्जींवर बोला. श्यामाप्रसाद मुखर्जी ज्यांनी जनसंघाची स्थापना केली, त्यांनी ज्या मुस्लीम लीगनं भारताची फाळणी मागितली होती त्यांच्यासोबत बंगालमध्ये सरकारमध्ये बसले होते. तुमचे राजकीय बाप ते होते. त्यांच्याबद्दल बोला, काँग्रेसनं चले जावचा नारा दिला, तेव्हा श्यामाप्रसाद मुखर्जींनी इंग्रजांना पाठिंबा दिला होता. चले जाव चळवळ कशी वाईट हे मुखर्जींनी लिहिलं होते. त्यावर बोला. मात्र एवढे खोलात जाण्यापेक्षा तुम्ही १० वर्षात काय केले त्यावर बोला अशी टीकाही उद्धव ठाकरेंनी अमित शाह यांच्यावर केली.  

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपाNarayan Raneनारायण राणे lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४ratnagiri-sindhudurg-pcरत्नागिरी-सिंधुदुर्गVinayak Rautविनायक राऊत big Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४