शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

लोकसभा निवडणूक: उमेदवारीवरून महायुतीला बसू शकतो फटका? भाजपच्या वर्तुळात शंका

By यदू जोशी | Updated: May 29, 2024 11:58 IST

तरीही नरेंद्र मोदी लाटेचा फॅक्टर भारी ठरण्याचा विश्वास

यदु जोशी, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या येत्या ४ जून रोजीच्या संभाव्य निकालाची चर्चा भाजपमध्ये सुरू झाली असून नेमक्या काय चुका झाल्या, यावर आत्मचिंतन केले. जात असतानाच, पंतप्रधाननरेंद्र मोदींच्या लाटेत कोणताही उमेदवार दिला, तरी निवडून येईल, हे गृहितक चुकीचे तर ठरणार नाही ना, अशी शंका व्यक्त केली जात आहे. भाजप आणि शिंदेसेनेने किमान आठ ते दहा उमेदवार वेगळे दिले असते, तर त्याचा फायदा झाला असता असाही मतप्रवाह आहे.

सामान्य मतदारांमध्ये ज्यांच्याबद्दल नाराजी आहे, अशा विद्यमान खासदारांना तिकीट दिल्याचा फटका विशेषत: विदर्भात बसू शकतो, असे म्हटले जात आहे. वर्धा, गडचिरोली, भंडारा-गोंदियात नवीन चेहरे दिले असते, तर उमेदवारांबाबत जी काही ‘अँटी इन्कम्बन्सी’ (प्रस्थापितविरोधी नाराजी)  होती, तिचा फटका नवीन उमेदवाराला बसला नसता, असे विदर्भात पक्ष संघटनेत काम करणारे काही जण नाव न देण्याच्या अटीवर सांगत आहेत. उमेदवारांबाबत नाराजी हा एक भाग असला, तरी मोदींची सुप्त लाट होतीच आणि त्याचा फायदा होऊन असे उमेदवारही निवडून येतील, लोकांनी मोदींकडे पाहून मते दिली, असा दावाही हे नेते करत आहेत.

शिंदेसेनेच्या कोणत्या उमेदवारांना फटका?

शिंदेसेनेच्या ज्या उमेदवारांबाबतच्या नाराजीचा फटका बसू शकतो, अशी चर्चा आहे. त्यात बुलडाणा (प्रतापराव जाधव), यामिनी जाधव (दक्षिण मुंबई), हेमंत गोडसे (नाशिक), सदाशिव लोखंडे (शिर्डी) यांची नावे प्रामुख्याने घेतली जात आहेत. बुलडाण्यात अपक्ष रविकांत तुपकर किती आणि कोणती मते घेतात, यावर जाधव यांचा जय-पराजय अवलंबून असेल. दक्षिण मुंबईची जागा भाजपने लढविली असती आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर किंवा मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यापैकी कोणालाही उमेदवारी दिली असता, तर नक्कीच विजय मिळाला असता, असे भाजपच्या स्थानिक नेत्यांचे म्हणणे आहे. यामिनी जाधव यांची उमेदवारी खूप उशिरा जाहीर झाल्याने त्यांना प्रचाराला तेवढा वेळ मिळाला नाही, ही बाबही त्यांच्या विरोधात जाऊ शकते, असे जाणकारांचे म्हणणे आहे.

महायुती, मविआचे दावे-प्रतिदावे

पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मराठा-मुस्लीम-दलित असे समीकरण महाविकास आघाडीसोबत होते, तर विदर्भात कुणबी-मुस्लीम-दलित समीकरणाने आमचा फायदा होईल, असे मविआचे नेते अनौपचारिक चर्चेत सांगत आहेत. दुसरीकडे मराठा आणि कुणबी समाज आमच्यासोबतही होता आणि लहान-मोठ्या अन्य जातींनी आम्हाला साथ दिली, असा दावा भाजपचे नेते करत आहेत.

  • ‘मतदारांची मोदींना पसंती, आम्हाला अडचण नाही’

प्रदेश भाजपचे एक ज्येष्ठ नेते म्हणाले, ‘मोदी पंतप्रधान पाहिजेत की राहुल गांधी, असे दोनच पर्याय मतदारांसमोर होते, त्यात मतदारांनी मोदींना

  • पसंती दिली, त्यामुळे आम्हाला अडचण नाही.’

भाजपच्या नेत्यांशी बोलताना जाणवते की, उमेदवारांबाबतची नाराजी, विरोधात गेलेली जातीय समीकरणे यावर मोदी फॅक्टर भारी ठरेल, असे त्यांना वाटते.

या प्रयोगांचे काय?

उस्मानाबादमध्ये भाजपचे आमदार राणा जगजीतसिंह यांच्या पत्नी अर्चना पाटील यांना अजित पवार गटाची, हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री यांना यवतमाळ-वाशिममधून शिंदेसेनेने उमेदवारी देणे, महादेव जानकर यांना अजित पवार गटाच्या कोट्यातून परभणीतून लढविणे, शिरुरमध्ये आढळराव पाटील यांना शिंदेसेनेतून आणून घड्याळावर लढविणे हे प्रयोग यशस्वी होतील का?

अमरावतीत जुळलेच नाहीत राणा आणि भाजपचे सूर

अमरावतीत नवनीत राणा यांना उमेदवारी देऊन तेथील सर्वच्या सर्व भाजप नेत्यांना नाराज केले गेले. राणा आणि भाजप यांचे सूर शेवटपर्यंत हवे तसे जुळलेच नाहीत. दोघांची प्रचारयंत्रणा समांतर होती. मोदी मॅजिक, नवनीत राणांची प्रतिमा हे दोन घटक सर्व नकारात्मक बाबींवर मात करतील, असे मानत पक्षाने त्यांना उमेदवारी दिली. पक्षाचे हे समीकरण अचूक होते का, ते ४ जूनच्या निकालात दिसेलच.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Mahayutiमहायुतीprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा