शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

लोकसभा निवडणूक निकाल 2019: मनसेवर शरद पवारांचे मोठं विधान, राज ठाकरेंबाबत पवार अजूनही आशावादी   

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2019 15:51 IST

लोकसभा निवडणुकीच्या निकालांचे जवळपास चित्र स्पष्ट झालं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने बारामती, शिरुर, सातारा, रायगड हे मतदारसंघ ताब्यात मिळविले आहेत.

पुणे - लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात सर्वात चर्चेत राहिलेला मनसेचा निकालांवर जास्त परिणाम झाला नसल्याचं जवळपास स्पष्ट झाला आहे. मनसेने सभा घेतलेल्या ठिकाणी आघाडीला मतांचा फायदा झाल्याचं दिसून येत नाही. मात्र मनसेने निवडणुकीत उमेदवार उभे केले असते तर चित्र वेगळं असतं असं शरद पवारांनी मनसेवर विश्वास दाखविला आहे. 

लोकसभा निवडणुकीच्या निकालांवर भाष्य करण्यासाठी शरद पवारांनी पत्रकार परिषद घेतली. राज ठाकरे यांच्या सभांचा किती फायदा झाला यावर बोलताना शरद पवारांनी यावर बोलणं टाळलं मात्र मनसेने उमेदवार उभे केले नव्हते, जर त्यांनी लोकसभेत उमेदवार उभे केले असते तर बहुदा चित्र वेगळं दिसलं असतं असा अंदाज पवारांनी दिला. 

तसेच  महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमध्ये संपर्क ठेऊन जनाधार वाढविण्यासाठी माझ्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते प्रयत्न करतील. रायगड, बारामती, शिरुर, सातारा या चार मतदारसंघात राष्ट्रवादी विजयी झालेली आहेत. अमरावती आणि माढ्यात अटीतटीची लढत आहे त्याचं चित्र स्पष्ट होईल असा विश्वास पवारांनी व्यक्त केला.  

दरम्यान मावळ लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीने कधी जिंकला नव्हता. तिथे पक्ष वाढविण्याच्या दृष्टीने आम्हाला जे करायचं होतं ते आम्ही करु शकलो असं भाष्य पार्थ पवार यांच्या पराभवावर शरद पवारांनी दिली. तसेच मी निवडणूक लढवणार नव्हतो हे 2014 साली ठरवलं होतं. मी राज्यसभेचा सदस्य होतो. माढ्यातील पक्षातील पदाधिकाऱ्यांमध्ये एकवाक्यता नव्हती म्हणून मी तुमच्यात एकवाक्यता नसेल तर मी लढतो असं बोललो होतो असं पवारांनी स्पष्ट केलं. 

लोकसभा निवडणुकीच्या निकालांचे जवळपास चित्र स्पष्ट झालं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने बारामती, शिरुर, सातारा, रायगड हे मतदारसंघ ताब्यात मिळविले आहेत. अजूनही काही मतदारसंघात मतमोजणी सुरु आहे. त्याठिकाणीही काही जागांवर विजय मिळू शकतो अशी शक्यता शरद पवारांनी व्यक्त केली आहे.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालMNSमनसेNCPराष्ट्रवादी काँग्रेस