शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

अंध:कार दूर होणार, मोदी जाणार, भाजपा २२५ वर अडणार, तर इंडिया आघाडी..., सामनाचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2024 10:59 IST

Lok Sabha Election Exit Poll Results 2024: शिवसेना ठाकरे (Shiv Sena UBT) गटाचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या आजच्या अग्रलेखामधून एक्झिट पोलवर जोरदार टीका करण्यात आली आहे. तसेच ४ जून रोजी हुकूमशाहीचा अंध:कार दूर होणार आणि नरेंद्र मोदींची (Narendra Modi) सत्ता जाणार, असा दावा सामनाच्या अग्रलेखामधून करण्यात आला आहे. 

लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होण्यास आता काही तासांचा अवधी उरला आहे. दरम्यान, सातव्या टप्प्यातील मतदान आटोपल्यानंतर प्रसिद्ध झालेल्या विविध संस्थांच्या एक्झिट पोलमधून केंद्रामध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीएला ३५० ते ४०० च्या आसपास जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, एक्झिट पोल आल्यापासून काँग्रेससह इंडिया आघाडीमधील घटक पक्षांचे नेते त्यावर जोरदार टीका करत आहेत. दरम्यान, एकेकाळी भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेना ठाकरे गटानेही एक्झिट पोलवर टीका केली आहे. शिवसेना ठाकरे गटाचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या आजच्या अग्रलेखामधून एक्झिट पोलवर जोरदार टीका करण्यात आली आहे. तसेच ४ जून रोजी हुकूमशाहीचा अंध:कार दूर होणार आणि नरेंद्र मोदींची सत्ता जाणार, असा दावा सामनाच्या अग्रलेखामधून करण्यात आला आहे. 

सामनाच्या आजच्या अग्रलेखात म्हटलं आहे की, सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान पूर्ण होण्याआधी टीव्ही वाहिन्यांनी लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर केले. तसेच तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी हेच पंतप्रधानपदाची शपथ घेतील, हे सुद्धा त्यांनी सांगूव टाकले आहे. काही राज्यातील मतदानाची पूर्ण आकडेवारी समोर आलेली नाही. त्यामुळे या राज्यात निकाल काय लागेल, याचं भविष्य कुणीच सांगू शकत नाही. मात्र सगळ्या मतदानाची सारासार माहिती न घेता एक्झिट पोलवाल्या कॉर्पोरेट कंपन्यांनी पुन्हा एकदा मोदीच येत आहेत आणि भाजपाला आणि त्यांच्या आघाडीस ३५० पेक्षा जास्त जागा मिळतील, असे बिनधास्त ठोकून दिले. भाजपाला ३५० जागा मिळाव्यात असे कोणते महान कार्य असे कोणते महान कर्तृत्व या लोकांनी गाजवलं आहे, असा सवाल सामनाच्या अग्रलेखातून विचारण्यात आला आहे. ४ जून रोजी मतमोजणी होईल आणि हुकूमशाहूचा अंध:कार दूर होईल. मोदींनी ध्यान केले आणि सूर्याला शांत केले, असे भाजपाला शांत केले, असे भाजपवाले सांगतात. मोदी यांनी ध्यान केले तरी जनतेचा उसळलेला उद्रेक ते शांत करू शकलेले नाही.  त्यामुळे भाजपाचा पराभव होणारच आहे. भाजपा २२५ च्या वर जात नाही. तर इंडिया आघाडी २९५ ते ३१० जागा जिंकून सरकार स्थापन करेल. एक्झिट पोल हे गुवाहाटीमध्ये कापलेल्या रेड्यांसारखा आहे. त्यामुळे खरा निकाल बदलणार नाही. मोदी है तो इंडिया आघाडीचा विजय १०० टक्के मुमकीन है, मोदी जात आहेत, हाच ४ जूनचा खरा निकाल आहे, असा दावाही सामनाच्या अग्रलेखामधून करण्यात आला आहे.   

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीINDIA Opposition Allianceइंडिया आघाडीUddhav Thackerayउद्धव ठाकरे