शहरं
Join us  
Trending Stories
1
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
2
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
3
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
4
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
5
Smartphones: नवा फोन घेण्याचा विचार करताय? थांबा! बाजारात येतायेत एकापेक्षा एक भारी फोन
6
धक्कादायक! विद्यापीठात महिलेवर लैंगित अत्याचार; बंगळुरू विद्यापीठाच्या प्राध्यापकाला अटक
7
"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
8
Dularchand Yadav: दुलारचंद यादव यांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला नाही, डॉक्टरांचा मोठा खुलासा!
9
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
10
मोबाईलचे जीपीएस ठरू शकते तुमच्या डिजिटल अरेस्टचे कारण; आयआयटी दिल्लीत महत्त्वाचा रिसर्च
11
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
12
ICC T20 Rankings : टीम इंडियाचं अव्वलस्थान धोक्यात! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर दुहेरी आव्हान
13
"मी त्याला काही वर्षांपूर्वीही भेटले होते...:, रोहित आर्याबद्दल रुचिता जाधवचा खुलासा, ९ मिनिटं...
14
ऑस्ट्रेलियानं ८० चेंडूत संपवला भारताविरुद्धचा सामना! 'पॉवर प्ले'मध्ये हेजलवूडचा जलवा, अभिषेक शर्मा एकटाच लढला!
15
राजस्थानात आजपासून धर्मांतरविरोधी कायदा लागू; बुलडोझर कारवाईसह अनेक कठोर तरतुदी
16
८९ वर्षीय अभिनेते धर्मेंद्र मुंबईतील रुग्णालयात दाखल, चाहते चिंतेत; हेल्थ अपडेट आली समोर
17
Yavatmal Accident: गाडी शिकताना नियंत्रण सुटलं अन्...; एकाच कुटुंबातील ४ जण ठार
18
बॉयफ्रेंडसोबत मिळून केली आईची हत्या, मग रचलं जीवन संपवल्याचं नाटक, मुलीचं भयानक कृत्य  
19
उल्हासनगरमध्ये भाजपला मोठे खिंडार! उद्धवसेनेच्या नेत्याच्या प्रवेशावरून अंतर्गत वाद चव्हाट्यावर
20
"दगा फटका झाला तर बच्चू कडू फाशीवर जाईल" आंदोलनाचा विजय झाल्याचा दावा करत बच्चू कडूंनी सरकारला दिला इशारा

मोदी गॅरंटी खोटी, ही तर भ्रमिष्ट लोकांची टोळी; संजय राऊतांचा भाजपावर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2024 16:11 IST

Loksabha Election 2024: सांगली इथं प्रचारसभेला आलेल्या संजय राऊत यांनी देशातील भाजपा सरकारवर निशाणा साधला. मोदींनी देशातील जनतेला गुलाम केलंय अशी टीका राऊतांनी केली. 

सांगली - Sanjay Raut on BJP ( Marathi News ) देशात बदल घडवण्यासाठी १० वर्ष खूप आहेत. तुम्ही देशातील जनतेला फसवलं. मोदी गॅरंटी ही खोटी आहे. ही भ्रमिष्ट लोकांची टोळी आहे. वेळ घालवायचा असेल तर लोकांनी सिनेमाला जावं नाहीतर मोदींच्या भाषणला जावं. 'हेलिकॉप्टरसे बाय रोड मै पोहचा' असं भाषणात मोदी म्हणाले, आता ते हवेत रोड बांधायला लागलेत. हे भ्रमिष्ट लोक देशावर राज्य करतायेत अशा शब्दात संजय राऊतांनीभाजपावर घणाघात केला. 

सांगली इथं चंद्रहार पाटील यांच्या प्रचार सभेत संजय राऊत म्हणाले की, जो आपल्या पक्षासोबत, विचारांशी एकनिष्ठ राहू शकत नाही तो या भागातील जनतेशी एकनिष्ठ कसा राहील? कुणी काही केले तरी या देशात, महाराष्ट्रात बदल घडवण्याची ताकद शिवसेनेत आहे. अबकी बार ४०० पार मोदी म्हणतायेत परंतु तुम्ही २०० पार होत नाही याची खात्री आहे. सांगलीत अबकी बार चंद्रहार, गुजरातमध्येही मोदी हरतील असा रिपोर्ट आहे. उद्धव ठाकरेंनी कोरोना काळात घराघरात औषध पोहचेल, अन्नधान्य पोहचेल का याची काळजी घेतली. तेव्हा नरेंद्र मोदी थाळ्या वाजवा, घंटा वाजवा, टाळ्या वाजवा हे सुरू होते. १४० कोटींचा देश, परदेशात गेल्यावर लोक हसतात. या देशाला ७० वर्षात विकास झाला पण हे सरकार पुन्हा २०० वर्ष मागे घेऊन चाललेत. त्यामुळे देशाला, महाराष्ट्राला प्रतिष्ठा द्यायची असेल तर कोण काय बोलतंय याकडे लक्ष देऊ नका असं राऊतांनी म्हटलं. 

तसेच या मतदारसंघात घरोघरी पोहचून प्रचार केला पाहिजे. लोक मोदींना कंटाळलेत. ८० कोटी जनतेला फुकट धान्य देणे ही सरकारची कर्तबगारी, याचा अर्थ बेरोजगारी वाढली आहे. कुणाच्या हाताला काम नाही. म्हणजे तुम्ही लोकांना गुलाम बनवतायेत. ब्रिटिशांच्या गुलामीतून मुक्त झालो परंतु गेल्या १० वर्षात मोदींनी लोकांना गुलाम बनवून टाकलं. आपण सगळे मोदी, अंबानी, अदानीचे गुलाम आहोत. मोदी सत्तेत आले तेव्हा गॅस सिलेंडर ४०० रुपयाला होता आज १४०० रुपयांवर गेला अशी टीकाही राऊतांनी केली.

काहीजण अप्रत्यक्षपणे भाजपाला मदत करतायेत

वसंतदादांचे राजकारण सामान्य माणसाला पोषक होतं. शेतकऱ्याच्या हिताचं राजकारण वसंतदादांनी केले. त्या शेतकऱ्याचा मुलगा पुढे येतोय. आज कुणी वेगळ्या मार्गाने राजकारण करून सामान्य शेतकऱ्याच्या मुलाची कोंडी करत असेल तर ही कोंडी फोडण्याची ताकद शिवसेनेत आहे. शिवसेना वाघाची औलाद आहे. काही जणांना अप्रत्यक्षपणे भाजपाला मदत करायची आहे. काहीही करून भाजपाचा खासदार निवडून आणायचा आहे. पण जोपर्यंत चंद्रहार रिंगणात आहे. तोपर्यंत भाजपाचा खासदार टिकणार नाही अशी भीती आहे असा आरोप संजय राऊतांनी नाव न घेता काँग्रेस नेत्यांवर केला. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४