शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

सोशल मीडिया ठरतोय भाजपसाठी डोकेदुखी; नेत्यांकडून प्रत्यक्ष भेटींवर भर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2019 18:07 IST

२०१४ मध्ये दिलेले अनेक आश्वासने भारतीय जनता पक्ष पूर्ण करण्यात अपयशी ठरला आहे. वर्ध्यात झालेल्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकासाव्यतिरिक्त हिंदुत्व आणि विरोधकांवर टीका करण्यावर भर दिला. त्यामुळे २०१४ मध्ये दिलेल्या आश्वासनांच काय झालं, असा थेट प्रश्न नेटकरी विचारत आहेत.

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा झंझावात आणि सोशल मीडिया आक्राळविक्राळ शक्तीच्या जोरावर भारतीय जनता पक्षाने २०१४ लोकसभा निवडणुकीत एकतर्फी विजय मिळवून सत्ता स्थापन केले होती. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच सोशल मीडियाच्या जोरावर भाजपने विजय मिळवला होता. परंतु, हे दुधारी शस्त्र आता भाजपवर उलटत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे भाजप नेते मतदारांच्या प्रत्यक्ष भेटीला प्राधान्य देत आहेत.

सध्या सोशल मीडियावर भाजपच्या कोणत्याही  पोस्टवर जाब विचारण्यात येत आहे. २०१४ मध्ये दिलेले अनेक आश्वासने भारतीय जनता पक्ष पूर्ण करण्यात अपयशी ठरला आहे. वर्ध्यात झालेल्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकासाव्यतिरिक्त हिंदुत्व आणि विरोधकांवर टीका करण्यावर भर दिला. त्यामुळे २०१४ मध्ये दिलेल्या आश्वासनांच काय झालं, असा थेट प्रश्न नेटकरी विचारत आहेत. एवढंच काय तर नेटकऱ्यांमुळे अनेक भाजप नेत्यांना ट्रोलला सामोरे जावे लागते आहे.

या पार्श्वभूमीवर भाजप नेत्यांनी जनतेत जावून प्रत्यक्ष भेटी-गाठीवर भर देण्याच्या सुचना वरिष्ठ पातळीवरून देण्यात आल्याचे समजते. दुसरीकडे विरोधकांची सोशल मीडिया टीम आता देखील आता सक्रीय झाली आहे. त्यामुळे भाजपच्या टेन्शनमध्ये भर पडली आहे.

काँग्रेसही होतय अनेकदा ट्रोल

सध्या सर्वच पक्ष सोशल मीडियावर प्रचार करण्यास प्राधान्य देत आहेत. फेसबुक लाईव्ह, ट्विटर आणि व्हॉट्सएपच्या माध्यमातून नेतेमंडळी मतदारांशी संपर्क साधत असतात. मात्र एखाद्या चुकीच्या पोस्टमुळे काँग्रेस देखील अनेकदा ट्रोल झाले आहे. मागील ७० वर्षांत काय केलं असा जाब नेटकरी काँग्रेसला देखील विचारताना दिसतात. त्यामुळे सोशल मीडिया या दुधारी शस्त्राचा वापर उत्तम पद्धतीने करणे सर्वांसाठीच जिकीरीचे ठरत आहे, असच म्हणावे लागले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकcongressकाँग्रेसBJPभाजपाSocial Mediaसोशल मीडिया