शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

सोशल मीडिया ठरतोय भाजपसाठी डोकेदुखी; नेत्यांकडून प्रत्यक्ष भेटींवर भर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2019 18:07 IST

२०१४ मध्ये दिलेले अनेक आश्वासने भारतीय जनता पक्ष पूर्ण करण्यात अपयशी ठरला आहे. वर्ध्यात झालेल्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकासाव्यतिरिक्त हिंदुत्व आणि विरोधकांवर टीका करण्यावर भर दिला. त्यामुळे २०१४ मध्ये दिलेल्या आश्वासनांच काय झालं, असा थेट प्रश्न नेटकरी विचारत आहेत.

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा झंझावात आणि सोशल मीडिया आक्राळविक्राळ शक्तीच्या जोरावर भारतीय जनता पक्षाने २०१४ लोकसभा निवडणुकीत एकतर्फी विजय मिळवून सत्ता स्थापन केले होती. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच सोशल मीडियाच्या जोरावर भाजपने विजय मिळवला होता. परंतु, हे दुधारी शस्त्र आता भाजपवर उलटत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे भाजप नेते मतदारांच्या प्रत्यक्ष भेटीला प्राधान्य देत आहेत.

सध्या सोशल मीडियावर भाजपच्या कोणत्याही  पोस्टवर जाब विचारण्यात येत आहे. २०१४ मध्ये दिलेले अनेक आश्वासने भारतीय जनता पक्ष पूर्ण करण्यात अपयशी ठरला आहे. वर्ध्यात झालेल्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकासाव्यतिरिक्त हिंदुत्व आणि विरोधकांवर टीका करण्यावर भर दिला. त्यामुळे २०१४ मध्ये दिलेल्या आश्वासनांच काय झालं, असा थेट प्रश्न नेटकरी विचारत आहेत. एवढंच काय तर नेटकऱ्यांमुळे अनेक भाजप नेत्यांना ट्रोलला सामोरे जावे लागते आहे.

या पार्श्वभूमीवर भाजप नेत्यांनी जनतेत जावून प्रत्यक्ष भेटी-गाठीवर भर देण्याच्या सुचना वरिष्ठ पातळीवरून देण्यात आल्याचे समजते. दुसरीकडे विरोधकांची सोशल मीडिया टीम आता देखील आता सक्रीय झाली आहे. त्यामुळे भाजपच्या टेन्शनमध्ये भर पडली आहे.

काँग्रेसही होतय अनेकदा ट्रोल

सध्या सर्वच पक्ष सोशल मीडियावर प्रचार करण्यास प्राधान्य देत आहेत. फेसबुक लाईव्ह, ट्विटर आणि व्हॉट्सएपच्या माध्यमातून नेतेमंडळी मतदारांशी संपर्क साधत असतात. मात्र एखाद्या चुकीच्या पोस्टमुळे काँग्रेस देखील अनेकदा ट्रोल झाले आहे. मागील ७० वर्षांत काय केलं असा जाब नेटकरी काँग्रेसला देखील विचारताना दिसतात. त्यामुळे सोशल मीडिया या दुधारी शस्त्राचा वापर उत्तम पद्धतीने करणे सर्वांसाठीच जिकीरीचे ठरत आहे, असच म्हणावे लागले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकcongressकाँग्रेसBJPभाजपाSocial Mediaसोशल मीडिया