शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
3
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
5
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
6
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
7
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
8
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
9
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
10
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
11
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
12
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
13
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
14
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
15
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
16
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
17
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
18
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
19
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
20
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...

सोशल मीडिया ठरतोय भाजपसाठी डोकेदुखी; नेत्यांकडून प्रत्यक्ष भेटींवर भर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2019 18:07 IST

२०१४ मध्ये दिलेले अनेक आश्वासने भारतीय जनता पक्ष पूर्ण करण्यात अपयशी ठरला आहे. वर्ध्यात झालेल्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकासाव्यतिरिक्त हिंदुत्व आणि विरोधकांवर टीका करण्यावर भर दिला. त्यामुळे २०१४ मध्ये दिलेल्या आश्वासनांच काय झालं, असा थेट प्रश्न नेटकरी विचारत आहेत.

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा झंझावात आणि सोशल मीडिया आक्राळविक्राळ शक्तीच्या जोरावर भारतीय जनता पक्षाने २०१४ लोकसभा निवडणुकीत एकतर्फी विजय मिळवून सत्ता स्थापन केले होती. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच सोशल मीडियाच्या जोरावर भाजपने विजय मिळवला होता. परंतु, हे दुधारी शस्त्र आता भाजपवर उलटत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे भाजप नेते मतदारांच्या प्रत्यक्ष भेटीला प्राधान्य देत आहेत.

सध्या सोशल मीडियावर भाजपच्या कोणत्याही  पोस्टवर जाब विचारण्यात येत आहे. २०१४ मध्ये दिलेले अनेक आश्वासने भारतीय जनता पक्ष पूर्ण करण्यात अपयशी ठरला आहे. वर्ध्यात झालेल्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकासाव्यतिरिक्त हिंदुत्व आणि विरोधकांवर टीका करण्यावर भर दिला. त्यामुळे २०१४ मध्ये दिलेल्या आश्वासनांच काय झालं, असा थेट प्रश्न नेटकरी विचारत आहेत. एवढंच काय तर नेटकऱ्यांमुळे अनेक भाजप नेत्यांना ट्रोलला सामोरे जावे लागते आहे.

या पार्श्वभूमीवर भाजप नेत्यांनी जनतेत जावून प्रत्यक्ष भेटी-गाठीवर भर देण्याच्या सुचना वरिष्ठ पातळीवरून देण्यात आल्याचे समजते. दुसरीकडे विरोधकांची सोशल मीडिया टीम आता देखील आता सक्रीय झाली आहे. त्यामुळे भाजपच्या टेन्शनमध्ये भर पडली आहे.

काँग्रेसही होतय अनेकदा ट्रोल

सध्या सर्वच पक्ष सोशल मीडियावर प्रचार करण्यास प्राधान्य देत आहेत. फेसबुक लाईव्ह, ट्विटर आणि व्हॉट्सएपच्या माध्यमातून नेतेमंडळी मतदारांशी संपर्क साधत असतात. मात्र एखाद्या चुकीच्या पोस्टमुळे काँग्रेस देखील अनेकदा ट्रोल झाले आहे. मागील ७० वर्षांत काय केलं असा जाब नेटकरी काँग्रेसला देखील विचारताना दिसतात. त्यामुळे सोशल मीडिया या दुधारी शस्त्राचा वापर उत्तम पद्धतीने करणे सर्वांसाठीच जिकीरीचे ठरत आहे, असच म्हणावे लागले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकcongressकाँग्रेसBJPभाजपाSocial Mediaसोशल मीडिया