शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

राधाकृष्णांना काँग्रेसपेक्षा सुजय विखेंचीच चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2019 14:26 IST

निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना विखे पाटील युतीचा प्रचार करताना दिसत नाहीत. याउलट मुलाच्या विजयासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी युतीच्या विरोधात जावून भाजप नेत्यांची नाराजी दूर करण्यात विखे पाटील व्यस्त आहेत. यामुळे भाजप-सेनेचे नाराज नेते युतीधर्म पाळत असताना विखे पाटलांना मात्र पुत्रप्रेम आवरणे कठिण जात असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.

मुंबई - यंदाच्या लोकसभा निवडणूकीत पक्षांतरचा मुद्दा चांगलाच गाजला आहे. भाजपने अनेक उमेदवार आयात केले असताना, काँग्रस-राष्ट्रवादीने देखील तोच कित्ता गिरवला. यामध्ये नगरच्या विखे कुटुंबातील तिसरी पिढी अर्थात डॉ. सुजय विखे-पाटील यांच्या भाजप प्रवेशाने राजकीय वातावरण ढवळून काढले. भाजप प्रवेशानंतर सुजय विखे यांना लगेच नगरची उमेदवारीही मिळाली. मुलाला भाजपची उमेदवारी मिळाल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील देखील सुजयच्या राजकीय भवितव्यासाठी आपली ताकद पणाला लावत आहे. त्यामुळे राधाकृष्ण यांना काँग्रेसपेक्षा सुजय विखेंचीच अधिक चिंता वाटत असल्याचे नगरमध्ये चित्र आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रमुख पक्षांना पक्षांतराचा मोठा फटका बसला. काही ठिकाणची बंडखोरी रोखण्यात पक्ष नेतृत्वांना यशही आले. परंतु, नगरच्या जागेचा पेच काँग्रेस-राष्ट्रवादीला सोडवता न आल्याने माजी विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. प्रवेशानंतर भाजपने सुजय यांना लगेच उमेदवारी देखील दिली. आता सुजयसाठी राधाकृष्ण यांच्याकडून सुरू असलेली फिल्डींग म्हणजे युतीधर्माचा भंगच असल्याचे बोलले जात आहे.

याआधी जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याविरुद्ध दंड थोपटले होते. परंतु, शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी खोतकर यांची समजूत काढली. त्यानंतर अर्जुन खोतकर यांनी आपण युतीधर्म पाळण्यासाठी कटिबद्ध असल्याचे म्हटले होते. परंतु, काँग्रेसमध्ये युतीधर्माविषयी काहीही घेणं-देणं पाहायला चित्र आहे.

भाजपचे विद्यमान खासदार दिलीप गांधी यांनी बंडाचा झेंडा फडकवल्यानंतर खुद्द विखे-पाटील यांनी मुलासाठी त्यांची भेट घेतली. गांधी यांची नाराजी दूर करण्यात विखे पाटलांना यशही आले. असं असताना पक्षविरोधी कारवाई करणाऱ्या विखे पाटील यांच्याकडून विरोधी पक्षनेतेपद काढल्यानंतर त्यांना काँग्रेसकडून स्टार प्रचारकांच्या यादीत सामील करण्यात आले आहे.

निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना विखे पाटील युतीचा प्रचार करताना दिसत नाहीत. याउलट मुलाच्या विजयासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी युतीच्या विरोधात जावून भाजप नेत्यांची नाराजी दूर करण्यात विखे पाटील व्यस्त आहेत. यामुळे भाजप-सेनेचे नाराज नेते युतीधर्म पाळत असताना विखे पाटलांना मात्र पुत्रप्रेम आवरणे कठिण जात असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलcongressकाँग्रेस