शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
2
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
3
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
4
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
5
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
6
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
7
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
8
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
9
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
10
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
13
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
14
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
15
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
16
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
17
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
18
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
19
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे

भर उन्हात उमेदवार मतांसाठी तर नागरीक पाण्यासाठी घराबाहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2019 13:04 IST

२०१४ लोकसभा निवडणुकीत निवडून आलेल्या उमेदवाराला मत मागण्यासाठी जात असताना नागरिकांच्या पाणी प्रश्नाच्या रोषाला समोर जावे लागत आहे. मराठवाड्यातील अनेक भागात १५ दिवसांतून एकदा पाणी येते. नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी कित्येक किलोमीटर जाऊन पाणी आणावे लागत आहे.

मुंबई - प्रत्येक निवडणुकीत उमेदवार वीज, पाणी, रस्ते देणार म्हणून आपल्या जाहीरनाम्यात उल्लेख करत असतात. उमेदवार निवडून आला की दिलेल्या आश्वासनांचा मात्र त्यांना विसर पडतो. मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे मात्र उमेदवारांची गोच्ची पाहायला मिळत आहे.  भर उन्हात उमेदवार प्रचारासाठी गावो-गावी फिरत आहेत. मात्र नागरीक उमेदवारापेक्षा पिण्याच्या पाण्याला महत्व देताना दिसत आहेत.  

२०१४ लोकसभा निवडणुकीत निवडून आलेल्या उमेदवाराला मत मागण्यासाठी जात असताना नागरिकांच्या पाणी प्रश्नाच्या रोषाला समोर जावे लागत आहे. मराठवाड्यातील अनेक भागात १५ दिवसांतून एकदा पाणी येते. नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी कित्येक किलोमीटर जाऊन पाणी आणावे लागत आहे. पाण्यासाठी होणारी हेळसांड यामुळे नागरिकांमध्ये सत्ताधारीविषयी प्रचंड रोष दिसत आहे.

औरंगाबाद- जालना लोकसभा मतदारसंघातील युतीच्या उमेदवार यांना शहरातील पाणी टंचाई मुळे नागरिकाच्या प्रश्नांना उत्तरे देणे कठीण झाले आहे. पाणी टंचाईमुळे उमेदवारांना पराभवाची भीती जाणवत आहे. त्यामुळेच युतीच्या शिष्ठमंडळाने विभागीय आयुक्त यांची भेट घेऊन पाणी टंचाईवर नियोजन करून सुरळीत पाणी पुरवठा करण्याची मागणी केली.    

परभणी लोकसभा मतदारसंघात ही तीच परिस्थिती पहायला मिळत आहे. शहर आणि ग्रामीण भागात नागरिकांना पाणी टंचाईला समोर जावे लागत आहे. लोकसभा निवडणुकीत उमेदवार प्रचारात दंग आहे तर दुसरीकडे नागरीक पाण्यासाठी तंग आहेत.

महाराष्ट्रातील मराठवाड्याप्रमाणे आनेक भागात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. एकीकडे लोकसभा निवडणुकीचा जोर वाढला आहे. तर दुसरीकडे पिण्याची पाणी टंचाई सुद्धा वाढत चालली आहे.  उमेदवार मतासाठी तर नागरीक पाण्यासाठी घराबाहेर पडत असल्याचे चित्र पाहयला मिळत आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकdroughtदुष्काळMarathwadaमराठवाडा