शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
Yuzvendra Chahal Hat Trick : आधी धोनीची विकेट; मग चहलनं साधला IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकचा डाव
4
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
5
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
6
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
7
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
8
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
11
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
12
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
13
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
14
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
15
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
16
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
17
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
18
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
19
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
20
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत

भर उन्हात उमेदवार मतांसाठी तर नागरीक पाण्यासाठी घराबाहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2019 13:04 IST

२०१४ लोकसभा निवडणुकीत निवडून आलेल्या उमेदवाराला मत मागण्यासाठी जात असताना नागरिकांच्या पाणी प्रश्नाच्या रोषाला समोर जावे लागत आहे. मराठवाड्यातील अनेक भागात १५ दिवसांतून एकदा पाणी येते. नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी कित्येक किलोमीटर जाऊन पाणी आणावे लागत आहे.

मुंबई - प्रत्येक निवडणुकीत उमेदवार वीज, पाणी, रस्ते देणार म्हणून आपल्या जाहीरनाम्यात उल्लेख करत असतात. उमेदवार निवडून आला की दिलेल्या आश्वासनांचा मात्र त्यांना विसर पडतो. मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे मात्र उमेदवारांची गोच्ची पाहायला मिळत आहे.  भर उन्हात उमेदवार प्रचारासाठी गावो-गावी फिरत आहेत. मात्र नागरीक उमेदवारापेक्षा पिण्याच्या पाण्याला महत्व देताना दिसत आहेत.  

२०१४ लोकसभा निवडणुकीत निवडून आलेल्या उमेदवाराला मत मागण्यासाठी जात असताना नागरिकांच्या पाणी प्रश्नाच्या रोषाला समोर जावे लागत आहे. मराठवाड्यातील अनेक भागात १५ दिवसांतून एकदा पाणी येते. नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी कित्येक किलोमीटर जाऊन पाणी आणावे लागत आहे. पाण्यासाठी होणारी हेळसांड यामुळे नागरिकांमध्ये सत्ताधारीविषयी प्रचंड रोष दिसत आहे.

औरंगाबाद- जालना लोकसभा मतदारसंघातील युतीच्या उमेदवार यांना शहरातील पाणी टंचाई मुळे नागरिकाच्या प्रश्नांना उत्तरे देणे कठीण झाले आहे. पाणी टंचाईमुळे उमेदवारांना पराभवाची भीती जाणवत आहे. त्यामुळेच युतीच्या शिष्ठमंडळाने विभागीय आयुक्त यांची भेट घेऊन पाणी टंचाईवर नियोजन करून सुरळीत पाणी पुरवठा करण्याची मागणी केली.    

परभणी लोकसभा मतदारसंघात ही तीच परिस्थिती पहायला मिळत आहे. शहर आणि ग्रामीण भागात नागरिकांना पाणी टंचाईला समोर जावे लागत आहे. लोकसभा निवडणुकीत उमेदवार प्रचारात दंग आहे तर दुसरीकडे नागरीक पाण्यासाठी तंग आहेत.

महाराष्ट्रातील मराठवाड्याप्रमाणे आनेक भागात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. एकीकडे लोकसभा निवडणुकीचा जोर वाढला आहे. तर दुसरीकडे पिण्याची पाणी टंचाई सुद्धा वाढत चालली आहे.  उमेदवार मतासाठी तर नागरीक पाण्यासाठी घराबाहेर पडत असल्याचे चित्र पाहयला मिळत आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकdroughtदुष्काळMarathwadaमराठवाडा