शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

Lok Sabha Election 2019 : 'चंद्रपूर'चा गड नक्की होता तरी कुणाचा ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2019 13:04 IST

मागील तीन निवडणुकांत हा मतदार संघ भाजपकडे असून चंद्रपूरचा गड नेमका आहे तरी कुणाचा, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

मुंबई - राज्यातील चंद्रपूर मतदार संघाच्या उमेदवारीवरून पेच निर्माण झाला होता. अखेरीस काँग्रेसने चंद्रपूरमधील पेच दूर करत विनायक बांगड यांना उमेदवारी दिली आहे. भाजपच्या ताब्यात असलेला चंद्रपूर मतदार संघ एकेकाळी काँग्रेसचा गड म्हणून ओळखला जायचा. परंतु, मागील तीन निवडणुकांत हा मतदार संघ भाजपकडे असून चंद्रपूरचा गड नेमका आहे तरी कुणाचा, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

१९५२ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत चंद्रपूर मतदार संघातून काँग्रेसचे अब्दुलभाई मुल्ला तहेराली विजयी झाले होते. त्यांच्यानंतर १९५७ मध्ये व्ही.एन. स्वामी निवडून आले. परंतु, १९६२ मध्ये लाल शाम शाह यांनी अपक्ष विजय मिळवला. शाह यांच्या राजीनाम्यानंतर १९६४ मध्ये येथे झालेल्या फेर निवडणुकीत पुन्हा एकदा काँग्रेसच्या जी.एम. कन्नमवार यांनी विजय मिळवला. तर १९६७ मध्ये के.एम. कौशिक अपक्ष निवडून आले. त्यानंतर १९७१ मध्ये पुन्हा काँग्रेसचे अब्दुल शफी निवडून आले. परंतु काँग्रेसच्या विजयाची परंपरा भारतीय लोकदलचे राजे विश्वेश्वर राव यांनी खंडित केली. त्यानंतर काँग्रेसकडून शांताराम पोटदुखे यांनी चंद्रपूरमधून १९८०, १९८४, १९८९ आणि १९९१ मध्ये काँग्रेसला विजय मिळवून दिला होता. त्यामुळे चंद्रपूर काँग्रेसचा गड मानला जात होता.

दरम्यान १९९६ मध्ये हंसराज अहिर यांनी काँग्रेसचा गड असलेला चंद्रपूर मतदार संघ हिसकावला. मात्र १९९८ आणि १९९९ मध्ये काँग्रेसने येथे पुन्हा कमबॅक केले. काँग्रेसच्या नरेश पुगलीया यांनी दोन्ही वेळा विजय मिळवला. परंतु, २००४ मध्ये भाजपने हंसराज अहिर यांनी पुन्हा एकदा निवडणुकीच्या आखाड्यात उतरविले. अहिर यांनी त्यावेळी विजय मिळवला. तसेच २००९ आणि २०१४ मध्ये देखील हा मतदार संघ भाजपला मिळवून दिला. त्याचे फळ त्यांना २०१४ मध्ये मिळाले असून मोदी सरकारमध्ये हंसराज अहिर यांना केंद्रीय गृहराज्यमंत्री पदी संधी देण्यात आली होती.

शिवसेना आमदार धानोरकर होते इच्छूक

चंद्रपूरमध्ये शिवसेनेचे आमदार बाळू धानोरकर काँग्रेसकडून उमेदवारीसाठी इच्छूक होते. मात्र काँग्रेसकडून विनायक बांगड यांना उमेदवारी देण्यात आली आहे. वास्तविक पाहता आमदार धानोरकर यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करून काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी प्रयत्न केले होते. परंतु त्यांना तिकीट मिळाले नाही. आता चंद्रपूरमधून हंसराज अहिर यांना विनायक बांगड यांचे आव्हान आहे. त्यामुळे या निवडणुकीतच चंद्रपूर गड कुणाचा हे स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकBJPभाजपाcongressकाँग्रेसcongressकाँग्रेस