शहरं
Join us  
Trending Stories
1
"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली?
2
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
3
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
4
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
5
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
6
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
7
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
8
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
9
हुंडाबळीच्या खटल्यात पती, सासूला सक्तमजुरी; १५ वर्षांची शिक्षा
10
सराईत गुन्हेगारांची टाेळी; पाच जणांविराेधात मकोका, लातूर पाेलिसांचा दणका
11
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
12
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
13
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
14
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
15
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
16
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
17
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
18
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
19
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
20
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?

Lok Sabha Election 2019 : 'चंद्रपूर'चा गड नक्की होता तरी कुणाचा ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2019 13:04 IST

मागील तीन निवडणुकांत हा मतदार संघ भाजपकडे असून चंद्रपूरचा गड नेमका आहे तरी कुणाचा, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

मुंबई - राज्यातील चंद्रपूर मतदार संघाच्या उमेदवारीवरून पेच निर्माण झाला होता. अखेरीस काँग्रेसने चंद्रपूरमधील पेच दूर करत विनायक बांगड यांना उमेदवारी दिली आहे. भाजपच्या ताब्यात असलेला चंद्रपूर मतदार संघ एकेकाळी काँग्रेसचा गड म्हणून ओळखला जायचा. परंतु, मागील तीन निवडणुकांत हा मतदार संघ भाजपकडे असून चंद्रपूरचा गड नेमका आहे तरी कुणाचा, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

१९५२ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत चंद्रपूर मतदार संघातून काँग्रेसचे अब्दुलभाई मुल्ला तहेराली विजयी झाले होते. त्यांच्यानंतर १९५७ मध्ये व्ही.एन. स्वामी निवडून आले. परंतु, १९६२ मध्ये लाल शाम शाह यांनी अपक्ष विजय मिळवला. शाह यांच्या राजीनाम्यानंतर १९६४ मध्ये येथे झालेल्या फेर निवडणुकीत पुन्हा एकदा काँग्रेसच्या जी.एम. कन्नमवार यांनी विजय मिळवला. तर १९६७ मध्ये के.एम. कौशिक अपक्ष निवडून आले. त्यानंतर १९७१ मध्ये पुन्हा काँग्रेसचे अब्दुल शफी निवडून आले. परंतु काँग्रेसच्या विजयाची परंपरा भारतीय लोकदलचे राजे विश्वेश्वर राव यांनी खंडित केली. त्यानंतर काँग्रेसकडून शांताराम पोटदुखे यांनी चंद्रपूरमधून १९८०, १९८४, १९८९ आणि १९९१ मध्ये काँग्रेसला विजय मिळवून दिला होता. त्यामुळे चंद्रपूर काँग्रेसचा गड मानला जात होता.

दरम्यान १९९६ मध्ये हंसराज अहिर यांनी काँग्रेसचा गड असलेला चंद्रपूर मतदार संघ हिसकावला. मात्र १९९८ आणि १९९९ मध्ये काँग्रेसने येथे पुन्हा कमबॅक केले. काँग्रेसच्या नरेश पुगलीया यांनी दोन्ही वेळा विजय मिळवला. परंतु, २००४ मध्ये भाजपने हंसराज अहिर यांनी पुन्हा एकदा निवडणुकीच्या आखाड्यात उतरविले. अहिर यांनी त्यावेळी विजय मिळवला. तसेच २००९ आणि २०१४ मध्ये देखील हा मतदार संघ भाजपला मिळवून दिला. त्याचे फळ त्यांना २०१४ मध्ये मिळाले असून मोदी सरकारमध्ये हंसराज अहिर यांना केंद्रीय गृहराज्यमंत्री पदी संधी देण्यात आली होती.

शिवसेना आमदार धानोरकर होते इच्छूक

चंद्रपूरमध्ये शिवसेनेचे आमदार बाळू धानोरकर काँग्रेसकडून उमेदवारीसाठी इच्छूक होते. मात्र काँग्रेसकडून विनायक बांगड यांना उमेदवारी देण्यात आली आहे. वास्तविक पाहता आमदार धानोरकर यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करून काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी प्रयत्न केले होते. परंतु त्यांना तिकीट मिळाले नाही. आता चंद्रपूरमधून हंसराज अहिर यांना विनायक बांगड यांचे आव्हान आहे. त्यामुळे या निवडणुकीतच चंद्रपूर गड कुणाचा हे स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकBJPभाजपाcongressकाँग्रेसcongressकाँग्रेस