शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

Lok Sabha Election 2019: महाराष्ट्रासाठी भाजपा दक्ष; 'मिशन 2019' साठी ठरलं 'शाही' लक्ष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2018 11:21 IST

शिवसेना सोबत आली नाही, तरीही 32 जागांवर 'कमळ' फुलवण्याचं लक्ष्य भाजपाने निश्चित केल्याचं खात्रीलायक सूत्रांकडून समजतं.

मुंबई: निवडणुकीची रणनीती आखण्यात माहीर असलेले भाजपाध्यक्ष अमित शहा यांना 'मिशन 2019'साठी महाराष्ट्राकडून मोठ्या अपेक्षा आहेत आणि गेल्या निवडणुकीपेक्षा जास्त जागा जिंकण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. शिवसेना सोबत आली नाही, तरीही 32 जागांवर 'कमळ' फुलवण्याचं लक्ष्य भाजपाने निश्चित केल्याचं खात्रीलायक सूत्रांकडून समजतं.

2014 च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात मोदी लाट उसळली होती. भाजपा-शिवसेना युतीनं 48 पैकी 42 जागा जिंकण्याची किमया केली होती. भाजपाच्या 24 आणि शिवसेनेच्या 18 उमेदवारांनी दणदणीत विजय मिळवला होता. पण, राज्यातील आजचं राजकीय चित्र पूर्णपणे बदललं आहे. शिवसेना सत्तेत भाजपासोबत असली, तरी या दोघांमधील नातं, 'दोस्त दोस्त ना रहा' अशा स्वरूपाचं झालंय. शिवसेनेनं 'एकला चालो रे'चा नारा दिलाय. त्यात, 'मोठा भाऊ' म्हणून मिरवणाऱ्या भाजपाला इंगा दाखवणं हाच उद्देश दिसतोय. दुसरीकडे, पोटनिवडणुकांमध्ये फटका बसल्यानंतर, विरोधकांच्या ऐक्यानंतर भाजपाला मित्रांची आठवण झालीय. पण त्यांच्यावर 'मातोश्री' प्रसन्न होणार का, याबद्दल शंकाच आहे.

गेल्या महिन्यांत अमित शहा यांनी मुंबईत येऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. मात्र, त्यानंतरही शिवसेना स्वबळाची भाषा बोलतेय. त्यामुळे आता भाजपाने आपला प्लॅन-बी राबवण्यास सुरुवात केली आहे. शिवसेनेला सोबत घेण्याचे प्रयत्न त्यांनी एकीकडे सुरू ठेवलेत. अमित शहांनी पुण्यात जाऊन शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची घेतलेली भेट, हा त्याचाच भाग मानला जातोय. पण या प्रयत्नांना यश न आल्यास, शिवसेनेनं 'टाळी' न दिल्यास, स्वबळावर 32 जागा जिंकण्यासाठी भाजपा रणनीती आखणार असल्याचं पक्षातील विश्वसनीय सूत्राने सांगितलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जनमानसांतील प्रतिमा, सरकारचं काम आणि ग्रामीण भागात वाढलेली पक्षाची ताकद या जोरावर गेल्यावेळच्या 24 जागांवरून 32 जागांपर्यंत मजल मारणं शक्य असल्याचं गणित भाजपाने मांडलंय. त्यासोबतच, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय नागपुरात असल्याने, स्वयंसेवकांची मोठी फळी प्रचारात उतरू शकेल, असंही नियोजन केलं जातंय.

अर्थात, हे समीकरण कागदावर सोपं वाटत असलं, तरी काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र लढल्यास आणि शिवसेना स्वतंत्रपणे मैदानात उतरल्यास मतविभाजनाचं गणितच निर्णायक ठरणार आहे आणि ते भाजपासाठी धोक्याचंच असेल. आता त्यातून भाजपाचे चाणक्य कसा मार्ग काढतात, हे पाहावं लागेल.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाLoksabhaलोकसभाNarendra Modiनरेंद्र मोदीShiv SenaशिवसेनाAmit Shahअमित शाह