शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Lok Sabha Election 2019: महाराष्ट्रासाठी भाजपा दक्ष; 'मिशन 2019' साठी ठरलं 'शाही' लक्ष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2018 11:21 IST

शिवसेना सोबत आली नाही, तरीही 32 जागांवर 'कमळ' फुलवण्याचं लक्ष्य भाजपाने निश्चित केल्याचं खात्रीलायक सूत्रांकडून समजतं.

मुंबई: निवडणुकीची रणनीती आखण्यात माहीर असलेले भाजपाध्यक्ष अमित शहा यांना 'मिशन 2019'साठी महाराष्ट्राकडून मोठ्या अपेक्षा आहेत आणि गेल्या निवडणुकीपेक्षा जास्त जागा जिंकण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. शिवसेना सोबत आली नाही, तरीही 32 जागांवर 'कमळ' फुलवण्याचं लक्ष्य भाजपाने निश्चित केल्याचं खात्रीलायक सूत्रांकडून समजतं.

2014 च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात मोदी लाट उसळली होती. भाजपा-शिवसेना युतीनं 48 पैकी 42 जागा जिंकण्याची किमया केली होती. भाजपाच्या 24 आणि शिवसेनेच्या 18 उमेदवारांनी दणदणीत विजय मिळवला होता. पण, राज्यातील आजचं राजकीय चित्र पूर्णपणे बदललं आहे. शिवसेना सत्तेत भाजपासोबत असली, तरी या दोघांमधील नातं, 'दोस्त दोस्त ना रहा' अशा स्वरूपाचं झालंय. शिवसेनेनं 'एकला चालो रे'चा नारा दिलाय. त्यात, 'मोठा भाऊ' म्हणून मिरवणाऱ्या भाजपाला इंगा दाखवणं हाच उद्देश दिसतोय. दुसरीकडे, पोटनिवडणुकांमध्ये फटका बसल्यानंतर, विरोधकांच्या ऐक्यानंतर भाजपाला मित्रांची आठवण झालीय. पण त्यांच्यावर 'मातोश्री' प्रसन्न होणार का, याबद्दल शंकाच आहे.

गेल्या महिन्यांत अमित शहा यांनी मुंबईत येऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. मात्र, त्यानंतरही शिवसेना स्वबळाची भाषा बोलतेय. त्यामुळे आता भाजपाने आपला प्लॅन-बी राबवण्यास सुरुवात केली आहे. शिवसेनेला सोबत घेण्याचे प्रयत्न त्यांनी एकीकडे सुरू ठेवलेत. अमित शहांनी पुण्यात जाऊन शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची घेतलेली भेट, हा त्याचाच भाग मानला जातोय. पण या प्रयत्नांना यश न आल्यास, शिवसेनेनं 'टाळी' न दिल्यास, स्वबळावर 32 जागा जिंकण्यासाठी भाजपा रणनीती आखणार असल्याचं पक्षातील विश्वसनीय सूत्राने सांगितलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जनमानसांतील प्रतिमा, सरकारचं काम आणि ग्रामीण भागात वाढलेली पक्षाची ताकद या जोरावर गेल्यावेळच्या 24 जागांवरून 32 जागांपर्यंत मजल मारणं शक्य असल्याचं गणित भाजपाने मांडलंय. त्यासोबतच, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय नागपुरात असल्याने, स्वयंसेवकांची मोठी फळी प्रचारात उतरू शकेल, असंही नियोजन केलं जातंय.

अर्थात, हे समीकरण कागदावर सोपं वाटत असलं, तरी काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र लढल्यास आणि शिवसेना स्वतंत्रपणे मैदानात उतरल्यास मतविभाजनाचं गणितच निर्णायक ठरणार आहे आणि ते भाजपासाठी धोक्याचंच असेल. आता त्यातून भाजपाचे चाणक्य कसा मार्ग काढतात, हे पाहावं लागेल.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाLoksabhaलोकसभाNarendra Modiनरेंद्र मोदीShiv SenaशिवसेनाAmit Shahअमित शाह