शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
4
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
5
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
6
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
7
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
8
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
9
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
10
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
11
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
12
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
13
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
14
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
17
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
18
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
19
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
20
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी

Lok Sabha Election 2019: महाराष्ट्रासाठी भाजपा दक्ष; 'मिशन 2019' साठी ठरलं 'शाही' लक्ष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2018 11:21 IST

शिवसेना सोबत आली नाही, तरीही 32 जागांवर 'कमळ' फुलवण्याचं लक्ष्य भाजपाने निश्चित केल्याचं खात्रीलायक सूत्रांकडून समजतं.

मुंबई: निवडणुकीची रणनीती आखण्यात माहीर असलेले भाजपाध्यक्ष अमित शहा यांना 'मिशन 2019'साठी महाराष्ट्राकडून मोठ्या अपेक्षा आहेत आणि गेल्या निवडणुकीपेक्षा जास्त जागा जिंकण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. शिवसेना सोबत आली नाही, तरीही 32 जागांवर 'कमळ' फुलवण्याचं लक्ष्य भाजपाने निश्चित केल्याचं खात्रीलायक सूत्रांकडून समजतं.

2014 च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात मोदी लाट उसळली होती. भाजपा-शिवसेना युतीनं 48 पैकी 42 जागा जिंकण्याची किमया केली होती. भाजपाच्या 24 आणि शिवसेनेच्या 18 उमेदवारांनी दणदणीत विजय मिळवला होता. पण, राज्यातील आजचं राजकीय चित्र पूर्णपणे बदललं आहे. शिवसेना सत्तेत भाजपासोबत असली, तरी या दोघांमधील नातं, 'दोस्त दोस्त ना रहा' अशा स्वरूपाचं झालंय. शिवसेनेनं 'एकला चालो रे'चा नारा दिलाय. त्यात, 'मोठा भाऊ' म्हणून मिरवणाऱ्या भाजपाला इंगा दाखवणं हाच उद्देश दिसतोय. दुसरीकडे, पोटनिवडणुकांमध्ये फटका बसल्यानंतर, विरोधकांच्या ऐक्यानंतर भाजपाला मित्रांची आठवण झालीय. पण त्यांच्यावर 'मातोश्री' प्रसन्न होणार का, याबद्दल शंकाच आहे.

गेल्या महिन्यांत अमित शहा यांनी मुंबईत येऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. मात्र, त्यानंतरही शिवसेना स्वबळाची भाषा बोलतेय. त्यामुळे आता भाजपाने आपला प्लॅन-बी राबवण्यास सुरुवात केली आहे. शिवसेनेला सोबत घेण्याचे प्रयत्न त्यांनी एकीकडे सुरू ठेवलेत. अमित शहांनी पुण्यात जाऊन शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची घेतलेली भेट, हा त्याचाच भाग मानला जातोय. पण या प्रयत्नांना यश न आल्यास, शिवसेनेनं 'टाळी' न दिल्यास, स्वबळावर 32 जागा जिंकण्यासाठी भाजपा रणनीती आखणार असल्याचं पक्षातील विश्वसनीय सूत्राने सांगितलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जनमानसांतील प्रतिमा, सरकारचं काम आणि ग्रामीण भागात वाढलेली पक्षाची ताकद या जोरावर गेल्यावेळच्या 24 जागांवरून 32 जागांपर्यंत मजल मारणं शक्य असल्याचं गणित भाजपाने मांडलंय. त्यासोबतच, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय नागपुरात असल्याने, स्वयंसेवकांची मोठी फळी प्रचारात उतरू शकेल, असंही नियोजन केलं जातंय.

अर्थात, हे समीकरण कागदावर सोपं वाटत असलं, तरी काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र लढल्यास आणि शिवसेना स्वतंत्रपणे मैदानात उतरल्यास मतविभाजनाचं गणितच निर्णायक ठरणार आहे आणि ते भाजपासाठी धोक्याचंच असेल. आता त्यातून भाजपाचे चाणक्य कसा मार्ग काढतात, हे पाहावं लागेल.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाLoksabhaलोकसभाNarendra Modiनरेंद्र मोदीShiv SenaशिवसेनाAmit Shahअमित शाह