शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळी एकत्र साजरी करू, पण अजित पवारांना पुन्हा पक्षात नो एंट्री; शरद पवारांनी परतीचे दरवाजे बंद केले...
2
महागाईवर सर्वात खळबळजनक रिपोर्ट; तीन वर्षांत कुटुंबांची घरगुती बचत ९ लाख कोटींनी घटली
3
साताऱ्याच्या बदल्यात राज्यसभा मिळाली! पार्थ पवारांना दिल्लीत पाठविण्यावर अजित पवारांचे मोठे संकेत
4
सुप्रियाने पवार-सुळे असे नाव लावले असते तर..? शरद पवारांनी सांगितला तिने घेतलेला एक निर्णय...
5
अदानी-अंबानींकडून टेम्पाेने पैसा आला का? मोदींच्या सवालावर राहुल गांधींचे चोख प्रत्तूत्तर...
6
नावात काय आहे? विचारत हायकोर्टाने फेटाळल्या नामांतराविरोधातील याचिका
7
कर्मचारी सुट्टीवर; विमाने जमिनीवर; ‘एअर इंडिया एक्स्प्रेस’ची ९० उड्डाणे रद्द
8
मी ठाण मांडून बसलो, म्हणजे करेक्ट कार्यक्रम होणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
9
शाळेत अ‍ॅडमिशन मिळणार का? न्यायालयात स्थगितीनंतर आरटीई ऑनलाइन अर्जाला ब्रेक, पालक अस्वस्थ 
10
हेड, अभिषेकने घातला धुमाकूळ; लखनौचा पाडला फडशा; हैदराबादचा १० गड्यांनी दणदणीत विजय
11
तीन वर्षांनंतर भारतात खेळणार नीरज; राष्ट्रीय फेडरेशन चषक स्पर्धेची उत्सुकता शिगेला
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

'नेत्यांच्या निधनानंतर सहानुभूतीची लाट, मग शेतकरी आत्महत्येनंतर का नाही' ?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2019 12:54 PM

नेत्यांच्या निधनानंतर त्यांचे वारस केवळ सहानुभूतींवर निवडून येतात. परंतु, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियाला कायम वाऱ्यावर का सोडलं जातं, असा सवाल करत वैशाली येडे यांनी आपला प्रचार सुरू केला आहे.

मुंबई - देशाच्या इतिहासात अनेक अशा घटना आहेत, ज्यामध्ये राजकीय नेत्याचे निधन झाल्यानंतर सहानुभूतीची लाट येते. इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्या हत्येनंतर देशात सहानुभूतीची अशीच लाट आली होती. राज्यातही केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर बीडमध्ये त्यांची कन्या प्रितम मुंडे सहानुभूतीच्या लाटेमुळे रेकॉर्ड ब्रेक मतांनी निवडून आल्या होत्या. मात्र अशी लाट शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबासाठी का येत नाही, असा सवाल प्रहारच्या यवतमाळ मतदार संघातील लोकसभेच्या उमेदवार वैशाली येडे यांच्याकडून उपस्थित करण्यात येत आहे.

नेत्यांच्या निधनानंतर त्यांचे वारस केवळ सहानुभूतींवर निवडून येतात. परंतु, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियाला कायम वाऱ्यावर का सोडलं जातं, असा सवाल करत वैशाली येडे यांनी आपला प्रचार सुरू केला आहे. राजकारणाचे शुद्धीकरण करायला हवं, सर्वसामान्यांना ही लोक प्रतिनिधीत्व करायला मिळावं, अशी टॅग लाईन वैशाली येडे यांच्या प्रचारात देण्यात आली आहे.

वैशाली येडे आत्महत्याग्रस्त कुटुंबातील असून त्यांच्या पतीने कर्जबाजारीपणाला आणि सततच्या नापिकीला कंटाळून आत्महत्या केली होती. त्यांना प्रहार संघटनेने लोकसभेचे तिकीट दिले आहे. याआधी त्यांनी एसटी बसमधून आपल्या प्रचाराला सुरुवात केली होती. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरलो असल्याचे वैशाली सांगतात.

वैशाली यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील रहिवासी आहेत. त्यांच्या पतीने ७ वर्षांपूर्वी आपली जीवनयात्रा संपवली होती. परंतु, दुःखावर मात करत दोन मुलांचा सांभाळ करणाऱ्या वैशाली यांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाच्या व्यथा मांडण्याचे काम केले आहे. यवतमाळ येथे झालेल्या आणि गाजलेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे उद्घाटन वैशाली यांच्या हस्ते झाले होते.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकBachhu Kaduबच्चू कडू