शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

Exclusive : 'आदर्श गाव' पाटोद्याचाही मतदानावर बहिष्कार; प्रशासनात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2019 5:58 PM

औरंगाबाद जिल्ह्यातील औरंगाबाद-जालना मतदारसंघातील मतदानावर बहिष्कार करण्यासंदर्भात जिल्हा प्रशासनाला आतापर्यंत १४ निवेदने प्राप्त झाली आहे. २०११-१२ मध्ये संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात राज्यात प्रथम येण्याचा बहुमान मिळालेल्या पाटोदा गावच्या गावकऱ्यांनी सुद्धा मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

मोसीन शेख 

मुंबई -  आर्दश गाव म्हणून प्रथम पुरस्कार मिळालेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील पाटोदा गावच्या गावकऱ्यांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे. पाटोदा गावच्या या भूमिकेमुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे. पाटोदा गावातील गावकऱ्यांची समजूत काढण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे. मात्र गावातील गावकरी आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे समजते.   

औरंगाबाद जिल्ह्यातील औरंगाबाद-जालना मतदारसंघातील मतदानावर बहिष्कार करण्यासंदर्भात जिल्हा प्रशासनाला आतापर्यंत १४ निवेदने प्राप्त झाली आहे. २०११-१२ मध्ये संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात राज्यात प्रथम येण्याचा बहुमान मिळालेल्या पाटोदा गावच्या गावकऱ्यांनी सुद्धा मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. गावातील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीच्या बांधकामासाठी गायरान जमीन प्रशासन देण्यास टाळत असल्याच्या आरोप पाटोदा येथील गावकऱ्यांनी केला आहे. 

राज्यातच नव्हेतर देशभरात अनेक ग्रामपंचायतीमध्ये पाटोदा पॅटर्न राबवला जातो. राज्यात आदर्श ठरलेल्या पाटोदा सारख्या गावाने मतदानावर बहिष्कार घातल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानासह विविध उपक्रम यशस्वीरीत्या राबवल्याबद्दल शासनाच्या तब्बल ५३ लाख रुपयांच्या पुरस्काराचे मानकरी ठरलेले निर्मल ग्राम आणि राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त पाटोदा गाव राज्यासाठीच नव्हे, तर देशासाठी विकासाचे मॉडेल म्हणून समोर आले आहे.

याविषयी पाटोदा गावचे सरपंच भास्कर पेरे यांना विचारले असता, जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीच्या बांधकामासाठी गावातील ३ एकर गायरान जमिनी मिळावी म्हणून आम्ही २०१४ पासून मागणी करत आहे. जमिनीच्या मोजणीसाठी आम्ही पैसे सुद्धा भरले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांना अनेकदा मोजणी करून ताबा देण्याची मागणी केली, पण काहीच प्रतिसाद मिळाला नाही. म्हणून सर्व गावकऱ्यांनी ठराव घेत लोकसभा निवडणुकीवर बहिष्काराचा निर्णय घेतल्याचे पेरे यांनी लोकमत ऑनलाईनशी बोलताना सांगितले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Aurangabadऔरंगाबादgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकAurangabad collector officeजिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद