शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

Load Shedding In Maharashtra: राज्यात लोड शेडिंग! अदानीवर काय कारवाई होणार? राऊतांनी स्पष्टच सांगितले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2022 20:39 IST

नितीन राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या बैठकीनंतर भारनियमनाची घोषणा केली आहे. तसेच अदानी पावरवर कारवाईचे संकेतही त्यांनी दिले आहेत. 

देशभरात कोळसा पुरवठा होत नसल्याने वीज टंचाई असताना राज्य सरकार ज्या कंपन्यांवर अवलंबून होते, त्यांनीच अचानक दगा दिल्याने राज्यावर भारनियमनाचे संकट कोसळले आहे. राज्याला १५०० मेगावॅट विजेचा तुटवडा आहे, अदानी कंपनीने तिरोडा येथील प्लाँटमधून वीजपुरवठा कमी केल्याने ही वेळ आली आहे. राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या बैठकीनंतर भारनियमनाची घोषणा केली आहे. तसेच अदानी पावरवर कारवाईचे संकेतही त्यांनी दिले आहेत. 

अदानी आणि जीएसडब्ल्यू कंपनीला नोटीस पाठविण्यात आली आहे. अदानी पावर कंपनीने अचानकपणे तिरोडा प्लँटमधील पुरवठा बंद केला. ३१०० मेगावॅटचा करार आहे, सप्लाय १७६५ मेगावॅट केला. त्यांच्याकडून चौदाशे मेगावॅट वीज कमी मिळाली. जेएसड्ब्लूकडून १०० मेगावॅट वीज मिळायची, परंतू त्यांचा प्लाँट बंद झाल्याने ती मिळत नाही, असे राऊत म्हणाले. 

जेएसड्ब्लू आणि SLDC यांनी दुरुस्तीच्या नावाखाली विनापरवानगी वीज निर्मिती प्रकल्प बंद केले. या तिन्ही कंपन्यांना Electricity Act Section 11 राज्याच्या अखत्यारीत ते सुरु करण्याचे आदेश दिले जाऊ शकतात. तसेच अदानी आणि GSWला १५ दिवसांत वीजपुरवठा सुरु करण्यास सांगण्यात येऊ शकते. याचसोबत Power Purchase Agreement रद्द केले जाऊ शकते. तसेच या कंपन्यांचे डिपॉझिट जप्त केले जाऊ शकते. याचबरोबर राज्य सरकारचे पावर ग्रीड असल्याने एमएसईबीचे वीज ग्राहक नसलेल्या कंपन्यांची वीज बंद केली जाऊ शकते. 

अदानी राज्याला ठरलेली वीज का देत नाहीय? यामागचे कारण काय, यावर राऊतांनी ते अदानीच सांगू शकतो, असे म्हटले आहे. पाऊस पडला तर मदत होईल आणि भारनियमन कमी होईल. आम्ही ऑक्टोबरपर्यंत कसं प्लांनिंग असेल याची माहिती मुख्यमंत्र्यांना दिल्याचे राऊत म्हणाले.  

टॅग्स :AdaniअदानीelectricityवीजMaharashtraमहाराष्ट्रNitin Rautनितीन राऊत