शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार?, आज होणार फैसला; माघार कोण घेणार याकडे लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2024 06:14 IST

शिंदे यांनी बंड केले तेव्हा त्यांना १० अपक्षांनी पाठिंबा दिला होता. काँग्रेसचे दोन आमदारही सध्या अजित पवार यांच्या गोटात आहेत.

मुंबई - विधान परिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक होणार की सर्वांची निवड बिनविरोध होणार याचा फैसला आज होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शुक्रवारी शेवटचा दिवस आहे. १२ पैकी एका उमेदवाराने माघार घेतली तरच निवडणूक बिनविरोध होईल.  

निवडणूक बिनविरोध करण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेतल्याचे समजते. विधानसभेतील २८८ पैकी १४ जागा रिक्त आहेत. त्यामुळे २७४ आमदार मतदान करणार असून, विजयासाठी २३ (२२.८४ ) आमदारांचे पाठबळ लागणार आहे. निवडणुकीत घोडेबाजार होऊ शकतो. यामुळे सर्वच पक्षांना आपल्या आमदारांना सांभाळण्याची कसरत करावी लागणार आहे. 

महायुतीकडे किती संख्याबळ? विधानसभेत सध्या भाजपचे १०३, शिंदेसेनेचे ३९, अजित पवार गटाचे ४० आमदार आहेत. याशिवाय या तिन्ही पक्षांना काही अपक्ष व छोट्या पक्षांचा पाठिंबा  आहे. महायुतीकडून भाजपच्या पंकजा मुंडे, योगेश टिळेकर, डॉ. परिणय फुके, अमित गोरखे, सदाभाऊ खोत या पाच जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यासाठी त्यांना ११५ आमदारांचे पाठबळ लागणार आहे. म्हणजेच १२ मते बाहेरून मिळवावी लागतील. अपक्ष व लहान पक्षांचे ९ आमदार भाजपसोबत आहेत. शिल्लक तीन मतांची तजवीज करणे त्यांच्यासाठी कठीण नाही.  

शिंदेसेनेने माजी खासदार भावना गवळी आणि कृपाल तुमाने यांना उमेदवारी दिली आहे. त्यासाठी त्यांना सात अतिरिक्त मते लागतील.अजित पवार गटाने राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे यांना उमेदवारी दिली आहे. त्यांनाही सहा मतांची तजवीज करावी लागणार आहे. शिंदे यांनी बंड केले तेव्हा त्यांना १० अपक्षांनी पाठिंबा दिला होता. काँग्रेसचे दोन आमदारही सध्या अजित पवार यांच्या गोटात आहेत.

मविआकडे किती संख्याबळ?  काँग्रेसकडे ३७ मते असून त्यांनी फक्त प्रज्ञा सातव यांनाच उमेदवारी दिली असल्याने त्यांच्याकडे १४ मते अतिरिक्त आहेत. ही अतिरिक्त मते त्यांनी उद्धवसेनेला देण्याचे मान्य केले आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडे स्वतःची १५ मते आहेत. याशिवाय एक अपक्ष त्यांच्यासोबत आहेत. उद्धव ठाकरे यांनी आपले स्वीय सहायक व पक्षाचे सचिव मिलिंद नार्वेकर यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसची अतिरिक्त मते मिळाली तर नार्वेकर निवडून येऊ शकतात. 

महाविकास आघाडीचा घटक असलेल्या शेकापचे नेते  जयंत पाटील यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्याकडे पक्षाचे केवळ एकच मत आहे. याशिवाय समाजवादी पार्टी व माकप यांची तीन मते त्यांना मिळू शकतात. शरद पवार गटाने त्यांना पाठिंबा दिला आहे. पवार गटाकडे १२ आमदार आहेत. या व्यतिरिक्त आणखी सात मतांची तजवीज त्यांना करावी लागेल. आघाडीचे तिन्ही उमेदवार निवडून येण्यासाठी ६९ मतांची गरज आहे. तेवढी मते त्यांच्याकडे आहेत.

विधान परिषदेच्या नऊ जागा आम्ही महायुतीत शंभर टक्के जिंकू. महाविकास आघाडीने एक जास्तीचा उमेदवार दिला आहे.त्यांना घोडेबाजार करायचा असेल तर ते तिसरा उमेदवार ठेवतील आम्हाला आमच्या विजयाचा पूर्ण विश्वास आहे - देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

टॅग्स :MahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडीVidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूक 2024Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस