शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
3
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
4
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
5
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
6
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
7
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
8
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
9
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
10
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
11
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
12
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
13
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
14
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
15
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
16
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
17
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
18
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
19
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
20
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा

विधिमंडळ अधिवेशन: मराठवाड्याच्या पाण्याचे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 02:31 IST

हक्काच्या पाण्यावर चर्चा तरी होणार की नाही?

- स. सो. खंडाळकर औरंगाबाद : मराठवाड्यात भीषण दुष्काळ पडला; पण सरकारकडून काही ठोस उपाययोजना दिसल्या नाहीत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठवाड्यात आले की, कोकणाचे पाणी मराठवाड्याला देऊ, कधीच दुष्काळ पडू देणार नाही, अशा वल्गना करतात; पण पाठ फिरली की ते सारे विसरून जातात. मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्याचे तरी बोला, त्यावर तरी विधिमंडळात चर्चा घडवून आणा, अशी किमान अपेक्षासुद्धा पूर्ण होईल की नाही, अशी परिस्थिती आहे. दरवर्षी पावसाळा आला की, अहमदनगर व नाशिकची मंडळी कधी मराठवाड्याच्या अंगावर धावून येतील, याचा नेम नाही. हक्काच्या पाण्यासाठी सतत संघर्ष सुरूआहे; पण न्याय मिळत नाही. हे व्हायला पाहिजे कृष्णेचे हक्काचे पाणी मिळाल्यास उस्मानाबाद, बीड व काहीअंशी लातूरचा प्रश्न सुटू शकतो. वैनगंगा, इंद्रावती व प्राणहिता या नद्यांचे ३० ते ४० टीएमसी पाणी मिळाल्यास नांदेड, परभणी जिल्ह्यांना फायदा होऊ शकतो. हे पाणी येलदरी व उर्ध्व पैनगंगामध्ये टाकता येऊ शकते. वैतरणा, दमण गंगा व पिंजाळ या नद्यांचे पाणी उचलता आल्यास औरंगाबाद, जालना व बीड जिल्ह्याला लाभ मिळू शकेल. सध्या नीरेचा वाद जोरात सुरूआहे. हे पाणी मराठवाड्याला मिळू शकेल की नाही, अशी सध्याची परिस्थिती आहे.मी प्रेझेंटेशन द्यायला तयार - नागरे२० जून रोजी मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावर मुंबईत बैठक होणार आहे; पण अद्याप मला निरोप नाही. आल्यास मी नक्की जाणार आहे व तेथे प्रेझेंटेशनही द्यायला तयार आहे. ग्रामीण विकासमंत्री पंकजा मुंडे यांनीही पाण्यासंबंधी त्यांची नोट सरकारला दिली आहे. त्यावरही चर्चा व्हायला पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी मराठवाड्यातील आमदारांबरोबर एकत्रित चर्चा करण्याची गरज आहे, असे जलतज्ज्ञ शंकरराव नागरे यांनी सांगितले.विधानसभेत चर्चा होणार - बंबगंगापूरचे आमदार व मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावर नेहमीच आग्रही भूमिका घेणारे प्रशांत बंब म्हणाले, यावेळी विधानसभेतच चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यासाठी प्रयत्नशील आहोत. नुकतीच लातूरला विकास परिषद झाली. त्याला मी उपस्थित होतो. मराठवाड्याला हक्काचे पाणी मिळायलाच पाहिजे.जलतज्ज्ञ प्रा. प्रदीप पुरंदरे व अर्थतज्ज्ञ प्रा. एच. एम. देसरडा यांनी यापूर्वीच कोकणचे पाणी मराठवाड्याला देण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या घोषणेवर टीका केली होती. ही गोष्ट अव्यवहार्य असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईMarathwadaमराठवाडा