शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

विधिमंडळ अधिवेशन: मराठवाड्याच्या पाण्याचे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 02:31 IST

हक्काच्या पाण्यावर चर्चा तरी होणार की नाही?

- स. सो. खंडाळकर औरंगाबाद : मराठवाड्यात भीषण दुष्काळ पडला; पण सरकारकडून काही ठोस उपाययोजना दिसल्या नाहीत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठवाड्यात आले की, कोकणाचे पाणी मराठवाड्याला देऊ, कधीच दुष्काळ पडू देणार नाही, अशा वल्गना करतात; पण पाठ फिरली की ते सारे विसरून जातात. मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्याचे तरी बोला, त्यावर तरी विधिमंडळात चर्चा घडवून आणा, अशी किमान अपेक्षासुद्धा पूर्ण होईल की नाही, अशी परिस्थिती आहे. दरवर्षी पावसाळा आला की, अहमदनगर व नाशिकची मंडळी कधी मराठवाड्याच्या अंगावर धावून येतील, याचा नेम नाही. हक्काच्या पाण्यासाठी सतत संघर्ष सुरूआहे; पण न्याय मिळत नाही. हे व्हायला पाहिजे कृष्णेचे हक्काचे पाणी मिळाल्यास उस्मानाबाद, बीड व काहीअंशी लातूरचा प्रश्न सुटू शकतो. वैनगंगा, इंद्रावती व प्राणहिता या नद्यांचे ३० ते ४० टीएमसी पाणी मिळाल्यास नांदेड, परभणी जिल्ह्यांना फायदा होऊ शकतो. हे पाणी येलदरी व उर्ध्व पैनगंगामध्ये टाकता येऊ शकते. वैतरणा, दमण गंगा व पिंजाळ या नद्यांचे पाणी उचलता आल्यास औरंगाबाद, जालना व बीड जिल्ह्याला लाभ मिळू शकेल. सध्या नीरेचा वाद जोरात सुरूआहे. हे पाणी मराठवाड्याला मिळू शकेल की नाही, अशी सध्याची परिस्थिती आहे.मी प्रेझेंटेशन द्यायला तयार - नागरे२० जून रोजी मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावर मुंबईत बैठक होणार आहे; पण अद्याप मला निरोप नाही. आल्यास मी नक्की जाणार आहे व तेथे प्रेझेंटेशनही द्यायला तयार आहे. ग्रामीण विकासमंत्री पंकजा मुंडे यांनीही पाण्यासंबंधी त्यांची नोट सरकारला दिली आहे. त्यावरही चर्चा व्हायला पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी मराठवाड्यातील आमदारांबरोबर एकत्रित चर्चा करण्याची गरज आहे, असे जलतज्ज्ञ शंकरराव नागरे यांनी सांगितले.विधानसभेत चर्चा होणार - बंबगंगापूरचे आमदार व मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावर नेहमीच आग्रही भूमिका घेणारे प्रशांत बंब म्हणाले, यावेळी विधानसभेतच चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यासाठी प्रयत्नशील आहोत. नुकतीच लातूरला विकास परिषद झाली. त्याला मी उपस्थित होतो. मराठवाड्याला हक्काचे पाणी मिळायलाच पाहिजे.जलतज्ज्ञ प्रा. प्रदीप पुरंदरे व अर्थतज्ज्ञ प्रा. एच. एम. देसरडा यांनी यापूर्वीच कोकणचे पाणी मराठवाड्याला देण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या घोषणेवर टीका केली होती. ही गोष्ट अव्यवहार्य असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईMarathwadaमराठवाडा