शहरं
Join us  
Trending Stories
1
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
2
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
3
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
4
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
5
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
6
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
7
निवडणुकीआधी हत्यांमध्ये वाढ; बिहार हादरले, पोलिसांचा दावा काय...
8
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय
9
गुप्तपणे केलेले फोन रेकॉर्डिंग घटस्फोटाच्या खटल्यात कायदेशीर पुरावा मानता येईल
10
‘मोसाद’चे धाडसी ऑपरेशन्स आणि त्याची खासियत काय?
11
इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी विद्यार्थी नोंदणी 
12
मुंबईकरांच्या स्वप्नातील मोठ्या घराचे स्वप्न साकारणार : मुख्यमंत्री
13
राज्यात १० ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

विदर्भातील चार जिल्ह्यांत पट्टेदार वाघांचे अस्तित्व

By admin | Updated: June 6, 2015 01:37 IST

जंगलात वास्तव्यास असल्याने त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी घेण्यासाठी वनविभागाने कृती आराखडा तयार करण्याचे ठरविले आहे.

अमरावती : राज्यात वाघोबांची संख्या वाढतेय, ही सुखद घटना आहे. परंतु हे वाघ अतिसंरक्षित क्षेत्राबाहेर म्हणजे जंगलात वास्तव्यास असल्याने त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी घेण्यासाठी वनविभागाने कृती आराखडा तयार करण्याचे ठरविले आहे. चार जिल्'ांत जंगलात पट्टेदार वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाने शिक्कामोर्तब केले आहे.प्रधान मुख्य वनसंरक्षक सर्जन भगत यांनी मुख्य वनसंरक्षकांना पाठविलेल्या पत्रात नागपूर जिल्ह्यातील कोंढाळी, कळमेश्वर, अमरावतीचे पोहरा-मालखेड, जळगाव जिल्'ातील मुक्ताईनगर तसेच धुळे येथील शिरपूर या राखीव जंगलात पट्टेदार वाघांचे अस्तित्व असल्याचे म्हटले आहे. वाघांचे संरक्षण आणि संगोपन व्याघ्र प्रकल्पात होणे अपेक्षित आहे. मात्र, या जिल्ह्यांतील जंगलात वाघ आढळल्याच्या नोंदी वनविभागात केल्या आहेत. जंगलात पट्टेदार वाघ असणाऱ्या परिसरात गस्त वाढविणे, ट्रॅप कॅमेरे बसविणे, रेस्क्यू आॅपरेशनची चमू तैनात ठेवणे आदी उपाययोजना करण्याचे कळविण्यात आले आहे. (प्रतिनिधी)वाघोबांचा नवीन क्षेत्रात घरोबाच्व्याघ्र प्रकल्पांच्या अतिसंरक्षित क्षेत्रात वाघांचे संगोपन आणि संरक्षण होणे आवश्यक आहे. परंतु काही वर्षांपासून वाघांनी व्याघ्र प्रकल्पाबाहेर वास्तव्याचे क्षेत्र शोधून काढले आहे. च्अतिसंरक्षित क्षेत्रात वास्तव्यास असलेल्या वाघोबांनी ५० ते ६० कि.मी.चा प्रवास करुन खुल्या जंगलात नवीन घरोबा तयार केल्याने वनविभागाची जबाबदारी वाढली आहे. च्अधिक जबाबदारी आली आहे. नागपूर येथे ताडोबा, पेंच, अमरावतीत बोर, नागझिरा तर जळगाव येथे मेळघाट, धुळे येथे नाशिक या भागातून पट्टेदार वाघ आल्याचा अंदाज वनविभागाने वर्तविला आहे.पोहरा- मालखेड या जंगलात यापूर्वी पट्टेदार वाघ आढळल्याची नोंद आहे. हा वाघ वर्धा जिल्ह्यातील बोर, नागझिरा येथून आल्याचा अंदाज आहे. वाघांचे मॉनिटरिंग करण्याच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत. परंतु काही दिवसांपासून ट्रॅप कॅमेऱ्यात या वाघाचे लोकेशन मिळाले नाही. तरीदेखील अधिकारी, कर्मचारी पट्टेदार वाघांच्या संरक्षणासाठी तैनात आहेत.- नीनू सोमराज, उपवनसंरक्षक, अमरावती.अशी करा उपाययोजनाराखीव व खुल्या जंगलात पट्टेदार वाघ असल्याबाबत वनविभागाने शिक्कामोर्तब केला असला तरी या वाघांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. यात वाघांचे दैनंदिन मॉनिटरिंग वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद, नियमित गस्त, कॅमेरा ट्रॅपिंग, जनजागृती, शिकार प्रतिबंधक पथकाची नियुक्ती, वाघांची शिकार व दुर्घटनेवर लक्ष आदी उपाययोजना करण्याचे ठरविले आहे. या वाघांच्या उपाययोजनांसाठी लागणाऱ्या आवश्यक बाबींचा प्रस्ताव तयार करुन पाठविण्याच्या सूचना प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी दिल्या आहेत.