शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
3
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
4
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
5
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
6
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
7
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
8
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
9
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
10
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
11
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
12
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
13
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
14
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
15
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
16
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
17
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
18
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
19
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
20
मायेची फुंकर! ब्रेकअप-स्ट्रेस- रागावर नियंत्रण यासाठी थेरपी देणारी उशी,अनेक दुखण्यांवर औषध

...तर कायद्याचे राज्य कोसळेल, सरन्यायाधीश दीपक मिस्रा यांनी व्यक्त केली भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2018 06:41 IST

आपली लोकशाही ‘न्यायाचे राज्य’ या संकल्पनेने संरक्षित आहे. मात्र, ही संकल्पना जपली नाही, तर कायद्याचे राज्य कोसळल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा भारताचे सरन्यायाधीश दीपक मिस्रा यांनी शनिवारी पुण्यात दिला.

पुणे : आपली लोकशाही ‘न्यायाचे राज्य’ या संकल्पनेने संरक्षित आहे. मात्र, ही संकल्पना जपली नाही, तर कायद्याचे राज्य कोसळल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा भारताचे सरन्यायाधीश दीपक मिस्रा यांनी शनिवारी पुण्यात दिला.भारती विद्यापीठाचे संस्थापक कुलपती डॉ. पतंगराव कदम यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ भारती विद्यापीठाने आयोजित केलेल्या प्रबोधन व्याख्यानमालेत मिस्रा बोलत होते. या वेळी न्यू लॉ कॉलेज आणि आंतरराष्ट्रीय लवाद केंद्राचे उद्घाटनही सरन्यायाधीश मिस्रा यांच्या हस्ते झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यक्रमाला उपस्थित होते.सरन्यायाधीश म्हणाले की, एकमेकांच्या स्वातंत्र्याचा आदर करीत समाजाची उभारणी व्हावी. लोकशाहीत प्रत्येक अधिकाराला महत्त्व आहे, पण सर्वच अधिकार परिपूर्ण नाहीत. मात्र, हक्क आणि अधिकारांच्या बाबतीत कोणतीही तडजोड झालेली नाही. आपण सध्या लोकशाही व्यवस्था आणि मुक्त समाजात राहात आहोत. लोकशाहीच्या परिघात असलेल्या एकमेकांच्या अधिकारांविषयी आपण जागृत राहिले पाहिजे.आपल्याकडे घटनात्मक लोकशाही आहे. राज्यघटनेच्या संरचनेत संरक्षित हमी मिळणे हे कोणत्याही लोकशाही व मुक्त समाजाची लक्षणे आहेत. आपल्याकडे नागरिकांना त्यांचे हक्क मिळाले आहेत, पण त्या अधिकारांचा वापर घटनेच्या चौकटीत व्हावा, असेही सरन्यायाधीश दीपक मिस्रा यांनी स्पष्ट केले.पतंगराव कदम यांनी ग्रामीण भागांत उच्च व दर्जेदार शिक्षण देण्यासाठी केलेल्या कामांचेही सरन्यायाधीशांनी कौतुक केले.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयDeepak Mishraदीपक मिश्रा