शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मेरी आवाज ही पहचान है...; सप्तसूर पोरके झाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2022 07:28 IST

दाही दिशा, अष्टौप्रहर, तिन्ही बाजूंनी पाण्याने वेढलेल्या जगाच्या पल्याड, सात सुरांच्याही पलीकडे नेणारा एक सूर म्हणजे लता मंगेशकर. करोडो रसिकांनी निगुतीने ९२ वर्षे जपून ठेवलेला हा स्वर रविवारी परमात्म्याने स्वत:कडे नेला.

मुंबई : दाही दिशा, अष्टौप्रहर, तिन्ही बाजूंनी पाण्याने वेढलेल्या जगाच्या पल्याड, सात सुरांच्याही पलीकडे नेणारा एक सूर म्हणजे लता मंगेशकर. करोडो रसिकांनी निगुतीने ९२ वर्षे जपून ठेवलेला हा स्वर रविवारी परमात्म्याने स्वत:कडे नेला. निर्मळ मनाने गायलेल्या साडेतीन मिनिटांच्या गाण्याला ज्यांनी अजरामर केले, अंगाई गीतापासून पसायदानापर्यंत सर्व भावभावनांना आपल्या गायकीने एका सूत्रात बांधले, असा भारतरत्न लता मंगेशकर नावाचा अजरामर इतिहास क्रूर काळाने मर्त्य मानवांच्या हातून हिसकावून नेला. कोरोनाचे निमित्त झाले आणि दीदींचे सूर आसमंत पोरका करून गेले. अनादी, आदिम असा हा सूर होता. ज्याने मानवी जीवनाचे समग्र, सर्वंकष दर्शन घडवले. भावभावनांचे असंख्य पदर दूर करत, निर्मळ सुख दिले. कधी मनाला हुरहुर लावणारे तर कधी हवेहवेसे वाटणारे हे जिवंत सूर घराघरांतल्या प्रत्येकाला पोरके करून गेले.

हृदयनाथ मंगेशकर आणि त्यांचे चिरंजीव आदिनाथ या दोघांनी लतादीदींच्या पार्थिवाला शिवाजी पार्क मैदानावर भडाग्नी दिला. आपल्या सुरांचे जगावर गारुड करणारे स्वर आकाशी झेप घेणाऱ्या ज्वालांनी कवेत घेतले तेव्हा प्रत्येकाचे डोळे भरून आले होते... खिन्न मनाने सगळे घराकडे परतत होते आणि "अखेरचा हा तुला दंडवत... सोडून जाते गाव..." हे दीदींचे स्वर प्रत्येकाचे काळीज कापून टाकत होते...

- जन्म इंदूर (मध्य प्रदेश) येथे. मूळ गाव मंगेशी (गोवा), १९४२ मध्ये कारकीर्दीला सुरुवात- ९५०+ पेक्षा अधिक चित्रपटांची गाणी गायली असून, ३६ पेक्षा अधिक भारतीय भाषांमध्ये गायन. भारताची गानसम्राज्ञी अशी ओळख - १९४५ मध्ये लतादीदी मुंबईत आल्या. त्यांनी भेंडीबाजार घराण्याचे उस्ताद अमान अली खान यांचा गंडा बांधला. - २००१ साली भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरव.- १९८९ मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात आला. - वयाच्या पाचव्या वर्षापासून त्यांनी संगीत नाटकात कामे केली. - दत्ता डावजेकर यांच्या संगीत दिग्दर्शनात 'आपकी सेवा मे' या चित्रपटातील 'पा लागू कर जोरी रे' या गाण्याने त्यांनी हिंदी चित्रपटांच्या पार्श्वगायनाच्या प्रातांत पदार्पण केले. 

पहिले गायन सोलापुरात -ही गानसरस्वती पहिल्यांदा गायिली ती सोलापुरात. तब्बल ८४ वर्षांपूर्वी, ९ सप्टेंबर १९३८ रोजी.त्या मैफलीचं वर्णन करायला आज कुणी हयात नाहीत; पण दीदींचा प्रदीर्घ गायनप्रवास सोलापुरातून सुरू झाला, हे सांगणारे अनेक जण आहेत. दूरचंच कशाला, गतवर्षीच्या मार्च महिन्यात दीदीनंच तसं ट्वीट करून त्या वेळचा फोटोही शेअर केेला होता. 

टॅग्स :Lata Mangeshkarलता मंगेशकरbollywoodबॉलिवूड