शहरं
Join us  
Trending Stories
1
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
2
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर RSSची मोदी सरकारच्या पाठीवर कौतुकाची थाप, भारतीय सैन्याचे केले अभिनंदन
3
India Pakistan Vidoe: पाकिस्तानने डागलेली उखळी तोफ थेट घरावर, क्षणात दिसेनासं झालं, बघा काय घडलं?
4
यशस्वी जैस्वालचा यू-टर्न ! गोवा नव्हे, मुंबई संघाकडूनच क्रिकेट खेळणार... काय दिलं कारण?
5
हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त! पाकिस्तानच्या गोळीबारात जुळ्या भावंडांचा मृत्यू
6
पाक लष्कर प्रमुखाला मिळाली विशेष 'पॉवर'; पाकिस्तानी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
7
लग्नाच्या अवघ्या १५व्या दिवशीच नवरीनं उडवली सासरची झोप; नवरदेवालाही लावला चुना अन्...  
8
Mumbai: टाटा मेमोरियल हॉस्पिटलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; भारत- पाकिस्तान तणावादरम्यान मेल
9
तुमच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी आर्थिक नियोजन कसे करावे? महागाई लक्षात घेऊन 'या' टिप्स फॉलो करा
10
India Pakistan: 'ये कोई तरीका है भीख मांगने का'; भारताच्या 'पीआयबी'ने पाकिस्तानची उडवली खिल्ली 
11
मागे कोण उभं आहे बघा, शवपेट्यांना लपटलेले झेंडे बघा; भारताने जगाला दाखवला पाकचा खरा चेहरा
12
Operation Sindoor वर मुकेश अंबानींचं वक्तव्य, पंतप्रधानांचा उल्लेख करत केलं 'हे' वक्तव्य 
13
IPL 2025 अनिश्चित काळासाठी स्थगित! भारत-पाकिस्तान युद्धाचे ढग पाहून BCCI चा मोठा निर्णय
14
"घाबरण्याची गरज नाही..," भारत-पाक तणावादरम्यान इंडियन ऑईलनं पेट्रोल-डिझेलवर केलं मोठं वक्तव्य
15
"पुढचं आईस्क्रीम आता लाहोरमध्येच खाईन"; कर्तव्यावर परतलेल्या जवानाचा व्हिडीओ पाहून वाटेल अभिमान!
16
India Pakistan: पाकिस्तानच्या मिसाईल्स फटाक्यासारख्या फुस्स; पंजाबमध्ये सापडली पाडलेली क्षेपणास्त्रे, बघा व्हिडीओ
17
सलमान खान आर्मी ऑफिसरच्या भूमिकेत, गलवान व्हॅलीतील भारत-चीन युद्धावर येणार सिनेमा
18
पाकिस्तानी शेअर बाजारात भूकंप, पण भारतीय मार्केटवर झाला नाही परिणाम, 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
Swapna Shastra: प्रिय व्यक्तीचा स्वप्नात मृत्यू पाहणे शुभ की अशुभ? त्यातही स्वप्नं पहाटेचं असेल तर?
20
मनोहर पर्रीकरांची दूरदृष्टी, सैन्याची बनली अतूट शक्ती; S-400 ‘सुदर्शन’मुळे पाक चक्रावले

गणिताची भाषा की गरिबांची भाषा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2019 06:39 IST

बालभारतीच्या इयत्ता दुसरीच्या पुस्तकातील संख्यावाचनातील व लेखनातील बदलाच्या वादाने आता महाचर्चेचे रूप धारण केले आहे. समाजमाध्यमांवर या चर्चेला चेष्टेचेही स्वरूप आलेले असले तरी हा वाद गांभीर्याने आणि दोन्ही बाजू शांतपणे समजून घेऊन हाताळण्याची गरज आहे.

- डॉ. प्रकाश परबबालभारतीच्या इयत्ता दुसरीच्या पुस्तकातील संख्यावाचनातील व लेखनातील बदलाच्या वादाने आता महाचर्चेचे रूप धारण केले आहे. समाजमाध्यमांवर या चर्चेला चेष्टेचेही स्वरूप आलेले असले तरी हा वाद गांभीर्याने आणि दोन्ही बाजू शांतपणे समजून घेऊन हाताळण्याची गरज आहे. गणित अभ्यास मंडळाने काही एक हेतू मनात ठेवून ज्या काही सुधारणा सुचवलेल्या आहेत त्यांचे नीट परीक्षण झाले पाहिजे. हे परीक्षण केवळ गणितीय नव्हे तर भाषाशास्त्रीय दृष्टीनेही झाले पाहिजे.‘एकवीस ते नव्याण्णव’ या संख्यानामांचे वाचन सुधारित पद्धतीने वीस एक, वीस दोन असे करावे म्हणजे ते खेड्यापाड्यातील, तळागाळातील, गरीब व अशिक्षित पालकांच्या मुलांना समजायला सोपे जाते असा यामागील प्रमुख युक्तिवाद आहे. या सुधारणेच्या समर्थकांकडून इतरही काही मुद्दे पुढे आले आहेत ते असे - या पद्धतीत जोडाक्षरे कमी वापरावी लागतात. त्यामुळे (गरीब) मुलांवरचा जोडाक्षरवाचनाचा ताण कमी होतो. उदा. ‘त्रेसष्ट’ उच्चारण्याऐवजी ‘साठ तीन’ हे वाचन अधिक सोपे आहे. शिवाय, या बदलामुळे इंग्रजी व काही दाक्षिणात्य भाषांतील संख्यानामांशी सुसंगती राखली जाते. या भाषांमध्ये दशक एकक अशा पद्धतीनेच दोन अंकी संख्यांचे वाचनलेखन होते. मग मराठीत ते का असू नये? मराठीतील संख्यानामांतील अनुक्रमामध्ये असलेली विसंगती दूर होते. बोलणे आणि लिहिणे यांचा क्रम सारखा राहतो. उदा. ‘पंचवीस’ऐवजी ‘वीस पाच’ असे लिहिणे सुसंगत आहे. कारण ‘पंचवीस’मध्ये पाच आधी वीस नंतर असा क्रम असूनही आपण दोन आधी आणि पाच नंतर लिहितो. इंग्रजीत मात्र ‘ट्वेंटीफाइव्ह’ म्हणजे दोन आधी व पाच नंतर असा सुसंगत क्रम आहे.गणित अभ्यास मंडळातील सदस्यांविषयी पूर्ण आदर बाळगून अगदी थेट प्रतिक्रिया द्यायची तर हा अव्यापारेषुव्यापार आहे. द्राविडीप्राणायाम आहे. नाचता येईना अंगण वाकडे किंवा आग सोमेश्वरी बंब रामेश्वरी असा प्रकार आहे. प्रचंड टीका झाल्यानंतर आता संख्यावाचनाची जुनी पद्धतीही चालू राहील, तिला आमचा विरोध नाही असे म्हटले जात असले तरी मुळात ही नवी पद्धती प्रमाण आणि सार्वत्रिक करण्याची काहीच आवश्यकता नव्हती. जसे, ‘शंभर’ म्हणजे ‘एक शून्य शून्य’ हे बरोबर असले तरी असे वाचन व लेखन हे स्पष्टीकरणात्मक व काही अपवादात्मक व विशेष कारणासाठीच केले पाहिजे. ‘त्रेसष्ट’ म्हणजे ‘साठ तीन’ हे बरोबर असले तरी ते त्याचे आकलनसुलभतेसाठी केलेले स्पष्टीकरण झाले. संख्याज्ञान करून घेताना ज्या मुलांना अडचण येते त्यांना त्या पद्धतीने जरूर शिकवावे. पण भाषिक व्यवहारात ‘साठ तीन’ हे त्रेसष्टचे पर्यायी रूप म्हणून सार्वत्रिक किंवा प्रमाणभूत करणे हे शिक्षणशास्त्र आणि भाषाविज्ञान या दोन्ही दृष्टींनी प्रामादिक आहे. ज्यांना नाचता येत नाही त्यांना विविध मार्गांनी नाचायला शिकवण्याऐवजी अंगणच ‘सरळ’ करण्याचा हा प्रकार आहे. र, ळ हे वर्ण उच्चारायला अनेक मुलांना त्रास होतो किंवा चुकीचे उच्चारले जातात म्हणून त्यांना सोपे पर्याय आपण शोधणार की तेच प्रमाण मानून ते कसे उच्चारायचे याचे प्रशिक्षणदेणार?मुळात, गणितीय सुधारणा करण्याचा गणित अभ्यास मंडळाला अधिकार असला तरी भाषिक सुधारणा करण्याचा अधिकार नाही. मंडळ फार तर भाषिक सुधारणांची शिफारस करू शकते. गणिताची भाषा ही एकूण भाषाव्यवस्थेचे एक अंग आहे. गणिताची भाषा बदलताना एकूण भाषाव्यवस्थेवर त्याचा काय परिणाम होईल किंवा ती बदलणे कितपत व्यवहार्य आहे याबाबत भाषातज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक होते. भाषा ही परिवर्तनशील असते आणि तिच्यात जाणीवपूर्वक कोणताच बदल करू नये असे नव्हे. पण तो बदल विचारपूर्वक व एकूण भाषिक व्यवस्था, तिची परंपरा, व्याकरणिक प्रकृती व प्रस्तावित बदलांमुळे उद्भवणाऱ्या व्यावहारिक अडचणी लक्षात घेऊनच करायला हवा. असा बदल मराठीचे प्रमाण लेखन घडवण्याच्या प्रक्रियेचा भाग म्हणून अनेकदा केला आहे. यापुढेही तो करायला हरकत नाही. पण त्यामागे भाषाशास्त्रीय दृष्टीहवी.भाषा ही समाजनिर्मित आणि सामाजिक मालमत्ता आहे. कोणीही उठावे आणि तीत बदल करावेत असे चालत नाही. भाषेतील शब्दसंपदा प्रतीकात्मक व रूढीने सिद्ध झालेली असते. एका भाषेत अमूक आहे म्हणून दुसºया भाषेत ते असलेच पाहिजे असे नाही. प्रत्येक भाषेत अभिव्यक्तीची व समाजाच्या भाषिक गरजा भागवण्याची पूर्ण क्षमता असते. ही क्षमता विभिन्न प्रकारे व्यक्त होत असते आणि ती विभिन्नताच तिला अनन्यता प्रदान करते. प्रत्येक भाषेत सुसंगती आणि विसंगती आहे. नियम आहेत आणि अपवाद आहेत. मराठीच्या संख्यानामांतील क्रमविसंगती लक्षात आणून देताना जिच्या उच्चार आणि वर्णलेखनात प्रचंड तफावत आहे त्या इंग्रजीचा दाखला देणे हास्यास्पद आहे. २१ ते ९९ या संख्यानामांमध्ये बदल किंवा पर्याय सुचवताना ११ ते १९ या संख्यानामांमध्ये बदल का सुचवला नाही? इंग्रजीत नाही म्हणून? ‘सिक्स्टीन’ हा उच्चार सोपा आहे काय? आणि त्यात कसली क्रमसुसंगती आहे? भाषेतील शब्द प्रतीकात्मक असतात. मुलांना भाषा आत्मसात करताना त्यांच्या क्षमतेनुसार कमी-जास्त अडचणी येतच राहणार. आजच्या प्रगत काळात तंत्रज्ञानाने अनेक गोष्टी सोप्या केलेल्या आहेत. तेव्हा अज्ञान, दारिद्र्य ही कारणे देऊन गणित आणि त्याची भाषा सोपी करण्याचा प्रयत्न करण्याऐवजीमुलांच्या क्षमतावर्धनाचे इतर मार्ग शोधून काढणे अधिक व्यवहार्य ठरेल. समाजात विशिष्ट भाषा शिकण्याची व शिकवण्याची प्रेरणा क्षीण झाली की ती कठीण वाटू लागते, असे भाषाविज्ञान सांगते. मराठी भाषेबाबत असेच घडले असण्याची शक्यता आहे.(लेखक महाराष्ट्रराज्य भाषा सल्लागार समितीचे सदस्य आहेत)

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र