शहरं
Join us  
Trending Stories
1
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
2
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
3
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
4
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
5
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
6
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
7
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
8
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
9
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
10
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
11
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?
12
दादर रेल्वे स्टेशनवर धक्कादायक प्रकार! तरुणाने स्वत:वरच केला चाकूहल्ला.. घटना CCTVमध्ये कैद
13
'आपण मोठी चूक करतोय', भारतावर कर लादल्यामुळे माजी अमेरिकन मंत्र्यांची ट्रम्प सरकारवर टीका
14
"टीम इंडियावर कारवाई करायची नाही... BCCIकडून आलेला फोन"; माजी मॅच रेफरीच्या आरोपांमुळे खळबळ
15
अजानमुळे सोनू निगमने कॉन्सर्ट थांबवला, आधी कौतुक झाले मग आठवला जुना वाद, एका ट्वीटमुळे झालेला गोंधळ
16
कर्नाटकमध्ये संघावर निर्बंध, हायकोर्टाचा काँग्रेस सरकारला दणका, दिले असे आदेश 
17
सलमान खानने केलेलं लाँच, आता १० वर्षांनंतर प्रसिद्ध स्टारकिडने बॉलिवूडमधून घेतला संन्यास, चाहत्यांना धक्का!
18
लोकांत असंतोष, भारतात नेपाळसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते: प्रकाश आंबेडकरांचा इशारा
19
Viral Video : हे कसं शक्य आहे? सील न फाडता उघडला आयफोनचा बॉक्स! व्हिडीओ बघून सगळेच शॉक्ड 
20
योगिता-सौरभनंतर 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीच्या संसारात आलं वादळ? एकमेकांना केलं अनफॉलो अन्....

“१०दा प्रयत्न पण उद्धव ठाकरे भेट नाही, आदित्य-वरुण सरदेसाईंसाठी हिंदुत्व भूमिका सोडायला...”

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2025 13:48 IST

Thackeray Group News: कोणाच्या जाण्याने काही फरक पडत नाही, ही भूमिका आत्मघाती आहे. संजय राऊत फक्त स्वतःचे विचार मांडतात, पक्षाचे नाही. संजय राऊतांनी स्वबळाची भूमिका मांडली आणि पक्षाला गळती लागली, अशी टीका करण्यात आली आहे.

Thackeray Group News: ठाकरे गटाकडे कुठलाही कार्यक्रम नाही, दिशा नाही. पक्ष कुठला तरी कार्यक्रम आणि दिशा घेऊन चालला असता तर एवढ्या लोकांनी पक्ष सोडला नसता. सनातनच्या मुद्द्यावर काँग्रेसकडून शिव्या दिल्या जातात, सावरकरांच्या मुद्द्यावर काँग्रेसकडून टीका होत असताना ठाकरे गटाने कधीच स्पष्ट भूमिका घेतली नाही. ठाकरे गटात समन्वय आणि संवाद नावाची कुठलीही गोष्ट नाही. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर खासदार पक्ष सोडत होते. तेव्हा त्यांच्याशी कोणीही बोलायला तयार नव्हते. अनेकांनी तेव्हा सांगितले की, विनायक राऊत यांच्या दादागिरीला कंटाळून आम्ही पक्ष सोडून चाललो. ठाकरे गटाकडून निवडणुकीत उभे राहिलेल्या उमेदवारांना संघटनेची आणि आर्थिक शक्ती दिली जात नाही अशा स्थितीत ठाकरे गट भाजपासमोर टिकूच शकत नाही, अशी खरमरीत टीका किशोर तिवारी यांनी केली. 

ठाकरे गटाकडून प्रवक्ते किशोर तिवारी यांची पक्षातून हकालपट्टी करण्याचे आदेश देण्यात आले. यानंतर किशोर तिवारी यांनी पक्षातील अंतर्गत घडामोडींवर बोट ठेवत अनेक गौप्यस्फोट केले. बांगलादेशींमुळे वरुण सरदेसाई, आदित्य ठाकरे निवडून आले; काँग्रेसच्या हिंदूविरोधी वक्तव्यावर बोलू नका, असा आदेश दिला. निवडणुकीच्या काळात प्रवक्ता असतानाही प्रसारमाध्यमांवर हिंदुत्वाचा मुद्दा लावून धरण्यापासून रोखण्यात आले होते. कारण मुंबईत वरुण सरदेसाई आणि आदित्य ठाकरेंच्या विजयासाठी मुस्लिमांचा मतदान आवश्यक होते. त्यामुळे हिंदुत्वाची भूमिका मांडण्यापासून पक्षाकडून थांबवण्यात आले, असा गंभीर आरोप किशोर तिवारी यांनी केला. 

स्वखर्चाने दहा वेळा उद्धव ठाकरेंना भेटायला गेलो, पण काही उपयोग झाला नाही

शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांचा सत्कार केला, त्याबद्दलही शिवसेनेकडून नाहक नाराची व्यक्त करण्यात आली. उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी पैसे खर्च करून किमान दहा वेळेला मुंबईला गेलो. मात्र कधीच उद्धव ठाकरे यांच्याशी भेट झाली नाही. उलट हाकलून लावण्यात आले. उद्धव ठाकरे यांनी कधीच संवाद साधला नाही. फक्त एकदा भेटले आणि मला तुमच्याशी शांतपणे भेटायचे आहे, असे सांगितले. मात्र शांतपणे भेटण्याची ती वेळ आजवर आली नाही, असे किशोर तिवारी यांनी सांगितले. राजन साळवी पक्ष सोडून गेल्यानंतर पक्षात कोणालाही जाग आलेली नाही. ज्याला जायचे आहे ते जा, कोणाच्या जाण्याने काही फरक पडत नाही, पक्षाची अशी भूमिका आत्मघाती आहे, अशी टीकाही किशोर तिवारी यांनी केली. 

दरम्यान, संजय राऊत पक्षाचे विचार आणि भूमिका मांडत नाही, ते फक्त स्वतःचे विचार मांडतात. त्यांच्यामुळे ठाकरे गटाची विश्वासार्हता खालवली आहे. संजय राऊत यांनी स्वबळाची भूमिका मांडली आणि दुसऱ्या दिवशीपासून पक्षाला गळती लागली. नागपुरातून आदित्य ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू दुष्यंत चतुर्वेदी यांनी संजय राऊतांच्या स्वबळाच्या घोषणेमुळेच पक्ष सोडला. शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांचा सत्कार केला, त्याबद्दलही ठाकरे गटाकडून नाहक नाराजी व्यक्त करण्यात आली, असे रोखठोक मत किशोर तिवारी यांनी व्यक्त केले. ते एबीपी माझाशी बोलत होते. 

 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेAaditya Thackerayआदित्य ठाकरेAditya Thackreyआदित्य ठाकरेSanjay Rautसंजय राऊतVarun Sardesaiवरुण सरदेसाई