शहरं
Join us  
Trending Stories
1
OPEC+ Oil Output: आणखी एक अग्निपरीक्षा; ८ देशांनी मिळून घेतला असा निर्णय ज्याचा थेट भारतावर होणार परिणाम, का वाढलं टेन्शन?
2
Afghanistan Earthquake : भीषण! भूकंपाने हादरला अफगाणिस्तान; ७ जणांचा मृत्यू, १५० जखमी; मजार-ए-शरीफचं नुकसान
3
स्मृती मंधानाचा ट्रॉफी सोबतचा फोटो, हातावर टॅटू..., होणारा नवरा पलाश मुच्छलची पोस्ट व्हायरल
4
"मला २० लाख कॅश द्या, तरच वरात घेऊन येईन"; नवरदेवाचा ऐनवेळी लग्नास नकार, मागितला हुंडा
5
VIDEO: "दीदी, हा कप तुमच्यासाठी....", हरमनप्रीतचा माजी दिग्गजांसोबत मैदानात जल्लोष
6
व्होडाफोन आयडियाला पुन्हा अच्छे दिन येणार? अमेरिकेन कंपनी गुंतवणूक करण्याच्या तयारीत; पण एका अटीवर
7
एका पैशाचा खर्च नाही, संकटे-समस्या संपतील; २१ दिवस १ मंत्राचा जप करा, अशक्यही शक्य होईल!
8
३० कोटींच्या उधळपट्टीचा घोटाळा सिद्ध, मुख्यमंत्र्यांचीही परवानगी नाही; रोहित पवार म्हणाले, 'हिवाळी अधिवेशनात सरकारची धिंड काढणार'
9
पशुपतिनाथाचे अवतार आणि रक्षेतून प्रगट झाले असे गोरक्षनाथ यांची जयंती; वाचा त्यांचे कार्य!
10
'हेरा फेरी'मधील बाबूरावच्या भूमिकेला कंटाळले परेश रावल, म्हणाले - "५०० कोटींची..."
11
वैकुंठ चतुर्दशी २०२५: श्रीविष्णू-महादेवांचे वरदान, पुण्य लाभेल; ‘असे’ करा व्रत, शुभच घडेल!
12
नोट चोरी बंद झाल्याने वोट चोरीची आठवण: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल
13
६० दिवस सोन्याहून पिवळे, ५ राशींच्या घरी लक्ष्मी पाणी भरेल; भरपूर भरभराट, लक्षणीय यश-सुख-लाभ!
14
आणखी एक मोठा बस अपघात, भरधाव ट्रकने बसला समोरून दिली धडक, २० जणांचा मृत्यू
15
मोठा निष्काळजीपणा! सरकारी रुग्णवाहिकेचा टायर पंक्चर, १ तास मिळाली नाही स्टेपनी; रुग्णाचा तडफडून मृत्यू
16
मुंबईकर अमोल मुजुमदारची शांतीत क्रांती! भारतीय महिला संघाला असं बनवलं वर्ल्ड चॅम्पियन  
17
“पुढील आषाढी एकादशीपर्यंत अजितदादा CM व्हावेत अन् विठ्ठलाची महापूजा करावी”: कुणाची इच्छा?
18
अखेर 'बिग बॉस'मधून प्रणित मोरेची Exit! सलमान खानलाही बसला धक्का, म्हणाला- "तू एलिमिनेट झाला नाहीस, पण..."
19
याच महिन्यात लाँच होणार ई-आधार ॲप; पाहा घरबसल्या काय-काय अपडेट करता येणार?
20
Anil Ambani ED: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या; ३००० कोटींची मालमत्ता जप्त, फ्लॅट, प्लॉट आणि ऑफिसचा समावेश, काय आहे प्रकरण?

"शिवसेना वाढण्यासाठी हजारो शिवसैनिकांच्या हत्या"; रामदास कदमांचे वक्तव्य, म्हणाले "उद्धव ठाकरेंना याची..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2024 08:04 IST

शिवसेना मोठी करत असताना हजारो शिवसैनिकांच्या हत्या झाल्याचे शिवसेना नेते रामदास कदम यांनी म्हटलं.

Ramdas Kadam : विधानसभा निवडणुका जवळ येत असतानाच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी पुन्हा एकदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर टीकास्त्र डागलं आहे. एका कार्यक्रमात बोलताना रामदास कदम यांनी जुन्या आठवणी सांगत उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला. शिवसेना मोठी करत असताना हजारो शिवसैनिकांच्या हत्या झाल्याची उद्धव आणि आदित्य ठाकरेंना कल्पना नसल्याचे रामदास कदम यांनी म्हटलं आहे.

खेड तालुक्यात बीजघर येथे रविवारी शिवसेनेचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना शिवसेनेचे नेते रामदास कदम यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला. तसेच आदित्य ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. तुमचा पिल्लू मी मंत्री असताना केबिनमध्ये येऊन बसायचा, अशा शब्दात रामदास कदम यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली. तसेच आम्ही आमच्या डोक्याला कफन बांधून ५५ वर्षे शिवसेनेसाठी काम केलं त्याच मला प्रायश्चित काय मिळालं असा सवालही रामदास कदम यांनी केला.

"ही शिवसेना अशी मोठी झाली नाही, त्यासाठी आजवर अनेकांनी रक्त सांडले आहे. बाळासाहेबांच्या एका शब्दासाठी अनेक लोक जीव द्यायला तयार असायचे. त्यांना इतकं प्रेम त्या मातोश्रीवरती मिळत होतं. शिवसेना मोठी करत असताना हजारो शिवसैनिकांच्या हत्या झाल्या. हजारो माता भगिणींचे कुंकू पुसलं गेलं. मराठी माणसांचे न्याय हक्कासाठी स्थापन केलेली बाळासाहेबांची ही शिवसेना अशी मोठी नाही झाली आणि ही शिवसेना मोठी करण्यासाठी सगळ्यात मोठे योगदान कोणाचा असेल तर ते कोकणाचा आहे, त्याच कोकणी माणसाला कोकणातल्या नेतृत्वाला संपविण्याचे पाप उद्धव ठाकरे यांनी केलं. उद्धव आणि आदित्य ठाकरेंना याची कल्पना नाही," अशा शब्दात रामदास कदम यांनी टीका केली.

"मी मंत्री असताना उद्धवजी तुमचा तो पिल्लू आदित्य ठाकरे माझ्या केबिनला येऊन बसायचा. माझ्या मिटिंगमध्ये येऊन बसायचा, काय-काय काम चालतं कसं ते सगळं शिकून घेतलं, मला काका काका म्हणायचा आणि काकाच्या पाठीत खंजीर खुपसला. काकाचं खातं घेऊन बसला तुमचा मुलगा आदित्य ठाकरे. आता हाच आदित्य ठाकरे टुणटुण उड्या मारत लोकांना शहाणपणा शिकवतो आहे. अरे कसले पन्नास खोके. एका जरी आमदाराने पन्नास खोके घेतले असतील हे जर सिद्ध केले, तर मी तुमच्या घरी येऊन भांडी घासेन. नाहीतर तुम्ही माझ्या घरी भांडी घासायला या," असं आव्हान रामदास कदम यांनी दिलं.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Ramdas Kadamरामदास कदमUddhav Thackerayउद्धव ठाकरेAaditya Thackerayआदित्य ठाकरे