शहरं
Join us  
Trending Stories
1
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
2
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
5
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
6
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
7
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
8
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
9
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
10
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
11
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
12
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
13
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
14
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
15
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
16
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
17
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
18
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
19
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
20
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन

खडसेंनीच आत्मचिंतन करावे, गिरीश महाजन यांचा हल्लाबोल; फडणवीस एकटे पक्ष चालवत नाहीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2020 07:18 IST

खडसे यांच्यावर भ्रष्टाचाराचे व इतरही आरोप झाले. माझ्यावर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी कधीही आरोप केले नाहीत असे खडसे आज सांगतात; पण त्यावेळच्या विरोधी पक्षाने त्यांच्या राजीनाम्यासाठी राजभवनावर जाऊन राज्यपालांना निवेदन दिले होते, सभागृहातदेखील आरोप केले होते, याकडे महाजन यांनी लक्ष वेधले.

मुंबई :देवेंद्र फडणवीस यांनी छळ केल्यामुळे पक्ष सोडल्याचा खडसेंनी केलेला कांगावा अत्यंत चुकीचा असून पक्ष सोडण्याची पाळी का आली याचे आत्मचिंतन त्यांनी केले तर नवीन पक्षात ते सुखी राहतील, असा हल्लाबोल माजी मंत्री आणि जळगाव जिल्ह्यातील भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी लोकमतशी बोलताना केला.

खडसे यांच्यावर भ्रष्टाचाराचे व इतरही आरोप झाले. माझ्यावर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी कधीही आरोप केले नाहीत असे खडसे आज सांगतात; पण त्यावेळच्या विरोधी पक्षाने त्यांच्या राजीनाम्यासाठी राजभवनावर जाऊन राज्यपालांना निवेदन दिले होते, सभागृहातदेखील आरोप केले होते, याकडे महाजन यांनी लक्ष वेधले. खडसे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यावेळच्या परिस्थितीसाठी फडणवीस कसे जबाबदार असतील. भाजपच्या कोणत्याही नेत्याबाबत होणारा निर्णय हा सामूहिक असतो. मात्र, फडणवीस यांना टार्गेट करणे खडसेंना सोपे वाटत असावे, असा टोलाही महाजन यांनी हाणला.

खडसे राष्ट्रवादीत गेल्याने जळगाव जिल्ह्यात भाजपचे मोठे नुकसान होईल का, या प्रश्नात महाजन म्हणाले की, काहीही फरक पडणार नाही. लहानमोठ्या निवडणुकांमध्ये तुम्हाला ते दिसेलच. भाजप व्यक्तिकेंद्रित पक्ष नाही. कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. जिल्ह्यातील जनता भाजपसोबत कालही होती, उद्याही राहील. मी आज काही बोलणार नाही पण भाजपत असताना पक्षाविरुद्ध कुठे कुठे कोणी काय काय केले ते योग्यवेळी सांगेन.

पुनर्वसनाची शक्यता संपली होती -जाणकारांच्या मते, खडसेंच्या मुद्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा भक्कमपणे फडणवीस यांच्या बाजूने उभे राहिले. खडसेंनी काहीही बोलायचे आणि ते पक्षाने सहन करून घ्यायचे, हे होणार नाही.आज खडसेंचे सहन केले तर उद्या आणखी कोणी नेता बोलू लागेल. त्यामुळे खडसेंबाबत तडजोड करायची नाही, असा स्पष्ट निरोप भाजप श्रेष्ठींकडून होता, असे म्हटले जाते. त्यामुळेच प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्याशी शेवटपर्यंत चर्चा केली पण राजकीय पुनर्वसनाचा कोणताही शब्द दिलेला नव्हता.त्यामुळे फडणवीस यांच्यावर टीका करत त्यांनी पक्ष सोडला.

बाहेर का फेकले गेले ?फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्या खुर्चीचा जो मान भाजपमधील त्यांचे विरोधक मानले जाणाऱ्या नेत्यांनी ठेवला तो खडसे यांनी कधीही ठेवला नाही. अनेकदा ते फडणवीस यांची जात, कनिष्ठता यावरून बोलत असल्याचे अनेक जण सांगतात. त्यातच त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. या सगळ्या बाबींची नोंद मोदी-शहांकडे होत गेली आणि त्यातून खडसे बाहेर फेकले गेले अशी चर्चा भाजपमध्ये आहे. 

टॅग्स :Girish Mahajanगिरीश महाजनeknath khadseएकनाथ खडसेBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस