शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

'ऑपरेशन लोटस' तोडाफोडीचं राजकारण जनतेला मान्य नाही; काँग्रेसचा भाजपाला टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2023 12:20 IST

आगामी काळात होणाऱ्या लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीत भाजपच्या घसरणीला आता सुरुवात झाली आहे अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेत्यांनी दिली आहे.

मुंबई - कर्नाटक निवडणुकीच्या निकालाचे पडसाद आता विविध राज्यात उमटू लागले आहेत. काँग्रेसला मिळालेल्या अभूतपूर्व यशामुळे देशभरात काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे. कर्नाटकच्या विजयाचा आनंद कार्यकर्ते साजरा करत आहेत. तर या निवडणुकीच्या निकालावरून भाजपाचं ऑपरेशन लोटस, तोडफोडीचे राजकारण जनतेला मान्य नाही असा टोला काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी भाजपाला लगावला आहे. 

काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात म्हणाले की, प्राथमिक कलांमध्ये काँग्रेस आघाडीवर असून देशाची इच्छा आहे की काँग्रेसचा विजय व्हावा. ऑपरेशन लोटस तोडाफोडीचं राजकारण जनतेला मान्य नाही, हे या निकालावरून समोर आलंय. भविष्याच्या राजकारणात लोकशाही टिकवायची असेल तर कर्नाटकचा आजचा निकाल खूप महत्त्वाचा आहे असं त्यांनी सांगितले. 

त्याचसोबत आगामी काळात होणाऱ्या लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीत भाजपच्या घसरणीला आता सुरुवात झाली आहे. लोकशाही वाचवण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना पाठिंबा मिळतोय हेच यावरून स्पष्ट होतं. भारत जोडो यात्रा ही ऐतिहासिक घटना असून भारत जोडो यात्रेचा प्रभाव कर्नाटक निवडणुकीत निश्चितपणे दिसला असा विश्वास काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.

भाजपानं धडा घेतला पाहिजे दरम्यान, लिंगायत समाजाच्या जोरावर निवडून आले त्यांना वाळीत टाकण्याचे काम भाजपने केले. त्यामुळे कर्नाटकच्या जनतेने भाजपाला वाळीत टाकले. भाजपाने धडा शिकला पाहिजे की सत्तेचा दुरुपयोग करुन जनता घाबरणार नाही. कर्नाटकात १२४ च्या वर जागा सुशिक्षित मतदारांनी कॉंग्रेसला दिल्या आहेत. याहूनही जास्त जागा येतील. राहुल गांधीवर खोटा आरोप लावून त्यांचे लोकसभेचं सदस्यत्व रद्द करण्याचं पाप भाजपने करत त्यांना बेघर केलं. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाला मानण्याची देशात सुरुवात झाली आहे. राहुल गांधीकडे आम्ही पंतप्रधान म्हणून पाहतोय, राहुल गांधी शिकलेले आहेत आताचे पंतप्रधान किती शिकले मला माहित नाही असं सांगत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी भाजपावर तोंडसुख घेतले. 

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेKarnataka Electionकर्नाटक विधानसभा निवडणूकBalasaheb Thoratबाळासाहेब थोरातcongressकाँग्रेसBJPभाजपा