शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

कोरेगाव-भीमा घटनेचे पडसाद ; मुंबई, राज्यात तणावपूर्ण शांतता, प्रकाश आंबेडकरांची आज महाराष्ट्र बंदची हाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 06:03 IST

कोरेगाव-भीमा, सणसवाडी येथे दोन गटांत उफाळलेल्या संघर्षाचे हिंसक पडसाद मंगळवारी मुंबईसह राज्यात उमटले. या घटनेचा निषेध करत आंदोलनकर्ते मोठ्या संख्येने मुंबईतील रस्त्यांवर उतरले.

मुंबई - कोरेगाव-भीमा, सणसवाडी येथे दोन गटांत उफाळलेल्या संघर्षाचे हिंसक पडसाद मंगळवारी मुंबईसह राज्यात उमटले. या घटनेचा निषेध करत आंदोलनकर्ते मोठ्या संख्येने मुंबईतील रस्त्यांवर उतरले. मुंबई शहरासह पूर्व आणि पश्चिम उपनगरांत विविध भागांत रास्ता रोको करण्यात आले. कुर्ला, मुलुंड व चेंबूर परिसरात आंदोलनादरम्यान बेस्ट बसेसच्या काचा फोडण्यात आल्या. पूर्व उपनगरातीलरस्ते वाहतुकीला आंदोलनाचा मोठाफटका बसला. त्यामुळे चक्का जामझाला होता. दुसरीकडे हार्बर रेल्वेमार्गावर दुपारच्या सुमारास चेंबूर येथे करण्यात आलेल्या रेल रोकोमुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झालीहोती. मुख्यमंत्र्यांसह सर्वच प्रमुखनेत्यांनी शांततेचे आवाहन केल्याने तणाव निवळत गेला.मंगळवारी सकाळीच मुंबईच्या पूर्व उपनगरात कुर्ला, मुलुंड, चेंबूर आणि गोवंडीसह लगतच्या परिसरात भीमा-कोरेगाव हल्ला प्रकरणाचा तीव्र निषेध व्यक्त करणे सुरू झाले. ठिकठिकाणी दुकाने उत्स्फूर्तपणे बंद करण्यात आली. विद्यार्थी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून शाळाही लवकर सोडण्यात आल्या. विशेषत:रेल्वे स्थानके आणि बस स्थानकेपरिसरात तणावपूर्ण स्थिती होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ठिकठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.मृत व्यक्तीच्या कुटुंबास १० लाख रुपयांची मदतहिंसाचारात झालेल्या एका मृत्यूची सीआयडीमार्फत चौकशी केली जाईल. मृत व्यक्तीच्या कुटुंबास १० लाख रुपयांची मदत दिली जाईल. या शिवाय, ज्यांच्या वाहनांची तोडफोड झालेली आहे, त्यांना नुकसानभरपाई राज्य शासनाच्या वतीने दिली जाईल, असे फडणवीस यांनी सांगितले.भिडे, एकबोटे यांच्यावर गुन्हा : सामाजिक कार्यकर्त्या अनिता साळवे यांच्या तक्रारीनंतर शिव प्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे (गुरुजी) व हिंदू जनजागरण समितीचे प्रमुख मिलिंद एकबोटे यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटी, जाळपोळ, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान, सशस्त्र हल्ला, बेकायदेशीर जमाव जमविणे व असंघटित गुन्हेगारी आदी कलमान्वये पिंपरीत गुन्हा दाखल करण्यात आला.चौकशी करा : आठवलेअनेक वर्षांपासून त्या ठिकाणी लाखो कार्यकर्ते येतात, पण अनुचित प्रकार घडला नाही. काही लोकांनी जाणीवपूर्वक हा हल्ला केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे. ज्या लोकांनी हिंसा भडकावली, त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली.हार्बर रेल्वे ठप्पमुलुंड आणि गोरेगाव येथे राजकीय पक्षांचे मोर्चे, हार्बर रेल्वे चेंबूरच्या रेल रोकोमुळे पूर्णत: ठप्प, चेंबूर, घाटकोपर आंदोलनकर्त्यांचे बनले प्रमुख केंद्र, चेंबूर, गोवंडी परिसरात तणावपूर्ण शांतता, दादर-हिंदमाता परिसरातही दुकानांना कुलुपे, बेस्टच्या सुमारे २० बेस्ट बसेसचे नुकसान, पोलिसांकडून शंभरहून अधिक आंदोलनकर्त्यांवर कारवाई.मुलुंड आणि गोरेगाव येथे राजकीय पक्षांनी मोर्चे काढत स्थानिक पोलिसांना आपले निवेदन दिले. हार्बर रेल्वेमार्गावर दुपारच्या सुमारास चेंबूर येथे करण्यात आलेल्या रेल रोकोमुळे हा मार्ग पूर्णत: ठप्प झाला होता.सायन आणि ठाणे शहराला जोडणारा लाल बहादूर शास्त्री मार्गही पूर्णत: ठप्प झाला होता. चेंबूर आणि गोवंडी परिसरात तणावपूर्ण शांतता होती. दादर-हिंदमाता परिसरातही तणावपूर्ण शांतता होती.पवारांनी ठेवला प्रशासनावर ठपकाभीमा-कोरेगावच्या लढाईला २०० वर्षे झाल्यानिमित्त मोठ्या संख्येने लोक उपस्थित राहतील, याची प्रशासनाला कल्पना असतानाही खबरदारी घेण्यात आली नाही. याचा गैरफायदा घेण्यास काही हिंदुत्ववादी संघटनांनी पुणे शहरातून येऊन काही दिवसांपासूनच चिथावणी देण्याची भूमिका घेतल्याचे वढू येथील ग्रामस्थ सांगतात. लोकांनी कोणतेही प्रक्षोभक भाष्य न करता, योग्य प्रकारे ही स्थिती हाताळणे आवश्यक आहे, असे आवाहन शरद पवार यांनी केले.

टॅग्स :Bhima-koregaonभीमा-कोरेगावnewsबातम्याMaharashtraमहाराष्ट्र