शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

सारांश: आम्ही सगळे राहतो एकत्र आनंदाने...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2022 11:24 IST

अलीकडच्या काही बातम्या कुटुंब व्यवस्थेबद्दल चिंता व्यक्त करायला लावतात. आजच्या कुटुंब दिनानिमित्त जाणून घेऊ काही एकत्रित कुटुंबांबद्दल...

बाळासाहेब बोचरे, उपमुख्य उपसंपादक, लोकमत, मुंबई

आयुष्यभर कमावलेल्या इस्टेटीवरून मुलांमध्ये निर्माण झालेले कलह आणि त्यातून कुटुंबकर्त्यांची होणारी ससेहोलपट पाहता वृद्धापकाळ हा कुटुंब व्यवस्थेचा ढासळलेला बुरूजच म्हणता येईल. इस्टेटीसाठी मुलाने बापाचा खून केला. बापाने मुलाचा खून केला. अगदी उच्चशिक्षित मुलांनीही आईवडिलांना घराबाहेर काढले. मुलींनी आईला घराबाहेर काढले. या अलीकडच्या बातम्या सुन्न करणाऱ्या असून कुटुंब व्यवस्थेबद्दल चिंता व्यक्त करणाऱ्या आहेत. त्याचवेळेला काही कुटुंबे पिढ्यान् पिढ्या एकत्रितरित्या राहत आहेत. 

सोलापूर जिल्ह्यातील बेंबळे (ता. माढा) येथील पोपट नामदेव अनपट या शेतकऱ्याचे ३० जणांचे कुटुंब म्हणजे शेती व्यवस्थापन आणि कुटुंब व्यवस्थापन याचा उत्तम नमुना आहे. या कुटुंबाची २५० एकर शेती आहे. त्यामध्ये ऊस, केळी, डाळिंब याबरोबर हंगामी पिके घेतली जातात. पोपट अनपट यांच्यासह त्यांचे चार भाऊ मिळून दहा जणांचे हे कुटुंब. त्या कुटुंबात १२ मुली आणि नऊ मुले वाढली. सर्व जावई हे उच्चशिक्षित आणि अधिकारीपदावर आहेत. सध्या २५० एकर शेती नऊ मुले पाहतात. नऊ जणांपैकी ज्यांना जितकी शक्य आहे, तेवढी त्याने सांभाळावी. त्यानुसार कोणी २० कोणी ३० एकर शेती सांभाळतो. नऊजणांपैकी दोघांची लग्ने झाली असून नातवंडेही आली आहेत. तर अजून सात सुना यायच्या आहेत.अनपट कुटुंबाचे एकत्रित १५ खोल्यांचे मोठे घर आहे. मात्र आता जुने घर कमी पडू लागल्याने आणखी दोन बंगले बांधले आहेत. त्यामध्ये दोन विवाहित मुलांना ठेवले आहे.

पिकांचे नियोजन

आपापल्या क्षेत्रात कोणी काय उत्पादन घ्यायचे, याचे प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे; पण, लागणारी खते, बियाणे, अवजारे व कृषी निविष्ठा एकत्रित खरेदी केल्या जातात. कोणी किती उत्पादन घेतले, किती टन ऊस काढला, याची चर्चा होते. त्याचा हिशेब स्वत: पोपट अनपट करतात. पोपट हे या कुटुंबाचे मुख्य कारभारी असून त्यांचा शब्द प्रमाण मानला जातो. कारभारी प्रत्येकाला भांडवल देतात. त्यानंतर किती उत्पन्न काढले, याचा जमाखर्च काढतात.

नव्या पिढीमध्ये विभक्तीचे वारे

बेंबळेच्या शेजारच्या परिते गावातही कोंडीबा लामकाने यांना दोन पत्नीपासून ११ मुले आणि सहा मुली मिळून सुमारे ७० जणांचे कुटुंब एकत्र राहत होते. मात्र अलीकडे या कुटुंबात मतभेद झाल्याने विभक्त झाले. मात्र वेगळे राहिले तरी कुटुंबातील एकोपा कायम आहे. या कुटुंबाकडे २०० एकर शेती असून अख्ख्या गावावर यांचा वचक आहे. 

करकंब, ता. पंढरपूर येथील यशवंत गेना व्यवहारे यांचे सहा मुलांचे ४० जणांचे कुटुंब पण २० वर्षे कसलीच तक्रार नाही. यशवंत आप्पा यांचा शब्द प्रमाण मानून कुटुंबाचा गाडा व्यवस्थित चालू होता. या बळावर या कुटुंबाने शेती घेतली. मोठी प्रगती केली. आता आप्पांचे वय झाले. आणि कुटुंबातील नव्या रक्त जुन्यांकडे दुर्लक्ष करू लागल्याने हे कुटुंबही विभक्त झाले. 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र