शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

"सोडून जायचं होतं तर..."; जितेंद्र आव्हाड पत्रकार परिषदेत भावूक, डोळे पाणावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2023 15:45 IST

राजकारण समजू शकतो पण काल वकिलांमार्फत सुनावणीत जे बोलण्यात आले ते सहन होणारे नव्हते अशी टीका जितेंद्र आव्हाडांनी अजित पवार गटावर केली.

मुंबई – खरी राष्ट्रवादी कुणाची हा वाद सध्या निवडणूक आयोगात सुरू असून शुक्रवारी अजित पवार गटाने शरद पवार यांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उभे केले. पवारांनी पक्ष हुकुमशाहीने चालवला असा आरोप अजित पवार गटाच्या वकिलांनी केला. या सुनावणीवेळी खुद्द शरद पवार आणि पक्षाचे इतर नेतेही उपस्थित होते. आज या सुनावणीवर पत्रकार परिषदेत बोलताना आमदार जितेंद्र आव्हाड भावूक झाल्याचे दिसून आले. सुनावणीवेळी घडलेल्या प्रसंगामुळे आव्हाडांचे डोळे पाणावले.

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, त्यांच्या वकिलांचे बोलणे ऐकून कशाला लढतोय असं वाटलं. हे घरात बसल्यानंतर त्यांना फोन येणार तुम्हाला मंत्री बनवलंय, शपथविधी करा. या सगळ्या भावनिक स्वातंत्र्याचा काय फळ मिळाले तर ते हुकुमशाह आहेत? महाराष्ट्रातील एकाही व्यक्तीने सांगावे, शरद पवार हुकुमशाहसारखे वागतात आणि त्यांनी पक्षात लोकशाही जिवंत ठेवली नाही. एवढेच होते तर तुम्ही सांगून जायचं होतं, तुम्ही लोकशाहीवादी नाही, आम्हाला तुमच्या पक्षात राहायचे नाही. आम्ही स्वातंत्र्य पक्ष काढतो. त्यांच्या हातातील बाळ आता मोठं झालंय, वाढण्याचा प्रयत्न करतंय त्याचे वृक्ष झालंय, ते आता तुम्ही त्यांच्या हातातून उपटून घेण्याचा प्रयत्न करताय असा आरोप त्यांनी केला.

तसेच राजकारण समजू शकतो पण काल वकिलांमार्फत सुनावणीत जे बोलण्यात आले ते सहन होणारे नव्हते. ज्यांनी त्यांच्याकडून सगळे घेतले, इतके असंवेदनशील झालंय. हे पहिल्या सुनावणीत घडलंय. अजून खूप आहेत. तुमच्या मनाला त्याचे उत्तर द्यावे लागेल. शरद पवारांसमोर त्यांच्या वकिलांनी हे आरोप केलेत. काय घडेल काय नाही ही लढाई निवडणूक आयोगासमोर होतेय. अभिषेक मनु सिंघवी यांनी बोगस प्रतिज्ञापत्रे दाखल केलीत. पण प्रश्न संवेदनशीलतेचा आहे. ज्यांनी तुम्हाला वाढवले, प्रत्येक प्रसंगात तुमच्यामागे पहाडासारखा उभा राहिला. केवळ राजकीय लढाई जिंकण्यासाठी तुम्ही त्यांच्याबद्दल असे शब्द वापरले ते कुणालाही सहन होणार नाही. शरद पवारांनी आयुष्यात कधीही लोकशाही मुल्याबाहेर काम केले नाही. राजकारण सोडून मदत करणारे आहेत. कुटुंबातील भांडणांनाही वेळ देणारे शरद पवार आहेत. कधी कुणाबद्दल वैयक्तिक द्वेष नाही. आज त्या माणसाला समोर बसवून आरोप करतायेत. सर्वसामान्य माणसाला ताकद मिळाली पाहिजे म्हणून आयुष्य खर्ची घातले. वयाच्या ८४ व्या वर्षी पवारांचे हृदय महाराष्ट्रासाठी धडधडतंय. त्यांच्याबद्दल कालचे उद्धार अनाकलनीय होते. कमीत कमी यापुढे तुमचा वकील हे बोलणार नाही याची काळजी घ्या असंही जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवारJitendra Awhadजितेंद्र आव्हाड