शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

"सोडून जायचं होतं तर..."; जितेंद्र आव्हाड पत्रकार परिषदेत भावूक, डोळे पाणावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2023 15:45 IST

राजकारण समजू शकतो पण काल वकिलांमार्फत सुनावणीत जे बोलण्यात आले ते सहन होणारे नव्हते अशी टीका जितेंद्र आव्हाडांनी अजित पवार गटावर केली.

मुंबई – खरी राष्ट्रवादी कुणाची हा वाद सध्या निवडणूक आयोगात सुरू असून शुक्रवारी अजित पवार गटाने शरद पवार यांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उभे केले. पवारांनी पक्ष हुकुमशाहीने चालवला असा आरोप अजित पवार गटाच्या वकिलांनी केला. या सुनावणीवेळी खुद्द शरद पवार आणि पक्षाचे इतर नेतेही उपस्थित होते. आज या सुनावणीवर पत्रकार परिषदेत बोलताना आमदार जितेंद्र आव्हाड भावूक झाल्याचे दिसून आले. सुनावणीवेळी घडलेल्या प्रसंगामुळे आव्हाडांचे डोळे पाणावले.

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, त्यांच्या वकिलांचे बोलणे ऐकून कशाला लढतोय असं वाटलं. हे घरात बसल्यानंतर त्यांना फोन येणार तुम्हाला मंत्री बनवलंय, शपथविधी करा. या सगळ्या भावनिक स्वातंत्र्याचा काय फळ मिळाले तर ते हुकुमशाह आहेत? महाराष्ट्रातील एकाही व्यक्तीने सांगावे, शरद पवार हुकुमशाहसारखे वागतात आणि त्यांनी पक्षात लोकशाही जिवंत ठेवली नाही. एवढेच होते तर तुम्ही सांगून जायचं होतं, तुम्ही लोकशाहीवादी नाही, आम्हाला तुमच्या पक्षात राहायचे नाही. आम्ही स्वातंत्र्य पक्ष काढतो. त्यांच्या हातातील बाळ आता मोठं झालंय, वाढण्याचा प्रयत्न करतंय त्याचे वृक्ष झालंय, ते आता तुम्ही त्यांच्या हातातून उपटून घेण्याचा प्रयत्न करताय असा आरोप त्यांनी केला.

तसेच राजकारण समजू शकतो पण काल वकिलांमार्फत सुनावणीत जे बोलण्यात आले ते सहन होणारे नव्हते. ज्यांनी त्यांच्याकडून सगळे घेतले, इतके असंवेदनशील झालंय. हे पहिल्या सुनावणीत घडलंय. अजून खूप आहेत. तुमच्या मनाला त्याचे उत्तर द्यावे लागेल. शरद पवारांसमोर त्यांच्या वकिलांनी हे आरोप केलेत. काय घडेल काय नाही ही लढाई निवडणूक आयोगासमोर होतेय. अभिषेक मनु सिंघवी यांनी बोगस प्रतिज्ञापत्रे दाखल केलीत. पण प्रश्न संवेदनशीलतेचा आहे. ज्यांनी तुम्हाला वाढवले, प्रत्येक प्रसंगात तुमच्यामागे पहाडासारखा उभा राहिला. केवळ राजकीय लढाई जिंकण्यासाठी तुम्ही त्यांच्याबद्दल असे शब्द वापरले ते कुणालाही सहन होणार नाही. शरद पवारांनी आयुष्यात कधीही लोकशाही मुल्याबाहेर काम केले नाही. राजकारण सोडून मदत करणारे आहेत. कुटुंबातील भांडणांनाही वेळ देणारे शरद पवार आहेत. कधी कुणाबद्दल वैयक्तिक द्वेष नाही. आज त्या माणसाला समोर बसवून आरोप करतायेत. सर्वसामान्य माणसाला ताकद मिळाली पाहिजे म्हणून आयुष्य खर्ची घातले. वयाच्या ८४ व्या वर्षी पवारांचे हृदय महाराष्ट्रासाठी धडधडतंय. त्यांच्याबद्दल कालचे उद्धार अनाकलनीय होते. कमीत कमी यापुढे तुमचा वकील हे बोलणार नाही याची काळजी घ्या असंही जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवारJitendra Awhadजितेंद्र आव्हाड