शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
2
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
3
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
6
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
7
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
8
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
9
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
10
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
11
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
12
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
13
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
14
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
15
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
16
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
17
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
18
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
19
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
20
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
Daily Top 2Weekly Top 5

"आम्ही XXX झालोय..." राज ठाकरेंच्या विधानावर जितेंद्र आव्हाडांनी ऑन कॅमेरा काय केले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2025 13:16 IST

भारतात प्रत्येकाला त्यांचं मत व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य आहे. किंबुहुना मी राज ठाकरेंचं अभिनंदन करेन. अशाप्रकारे हिंमतीने बोलणारा माणूस महाराष्ट्रात आहे. आपल्या मनातलं बोलायला हिंमत लागते असं त्यांनी म्हटलं. 

मुंबई - मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी कुंभमेळ्यातील पवित्र स्नानावरून गंगा नदीच्या अस्वच्छतेवर भाष्य केले. राज यांच्या विधानावरून भाजपासह शिवसेनेसारख्या संघटनांनी आक्षेप घेत त्याचा समाचार घेतला. मात्र राज ठाकरे जे बोलले, ते बोलायला धाडस लागते, आम्ही XXX झालोय, षंढ झालोय, हे बोलायलाही घाबरतो, नको आपल्या मागे लागतील परंतु राज ठाकरे जे बोलले त्यांना सलाम असं सांगत जितेंद्र आव्हाडांनी त्यांचं कौतुक केले.

राज यांच्या विधानावर माध्यमांनी जितेंद्र आव्हाडांना प्रतिक्रिया विचारली. त्यावेळी जितेंद्र आव्हाडांनी राज यांची मिमिक्री करत म्हणाले की,  राज ठाकरेंनी जे विधान केले, जी नकल केली ते आम्ही केले असते तर आतापर्यंत आमच्या घरावर मोर्चे, दगडफेक झाली असती. आम्ही देशद्रोहीही ठरलो असतो. राज ठाकरे यांनी त्यांचं मत व्यक्त केले. भारतात प्रत्येकाला त्यांचं मत व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य आहे. किंबुहुना मी राज ठाकरेंचं अभिनंदन करेन. अशाप्रकारे हिंमतीने बोलणारा माणूस महाराष्ट्रात आहे. आपल्या मनातलं बोलायला हिंमत लागते असं त्यांनी म्हटलं. 

तसेच आम्ही कदू, XXX, षंढ झालोत, आम्ही हे बोलायलाही घाबरतो, नको नको उगाच आपल्या मागे लागतील. राज ठाकरे मनात आहे ते बिनधास्त बोललेत. ते बोलले ते अनेक भारतीयांच्या मनात आहेत. राज ठाकरेंच्या डेरिंगला माझा सलाम आहे. बाकी मला यात काही बोलायचे नाही असं जितेंद्र आव्हाडांनी प्रतिक्रिया देत सॅल्यूट देतानाची अ‍ॅक्शन माध्यमांसमोर केली. 

राज ठाकरे मविआत सहभागी होणार?

दरम्यान, राज ठाकरे मविआत सहभागी होणार का या प्रश्नावर जितेंद्र आव्हाड यांनी माध्यमांना खोचक टोला लगावला. तुम्ही स्वप्नरंजन करत राहावे, पत्रकाराचं काम स्वप्न पाहणे हे आहे. तुमच्या स्वप्नावरच महाराष्ट्र चालतो, तुम्ही स्वप्न पाहात राहा. परंतु राज ठाकरे यांनी जे विधान केले, ते करण्याची हिंमत दाखवली त्यासाठी राज ठाकरेंना मानाचा मुजरा असं आव्हाडांनी सांगितले.

काय म्हणाले होते राज ठाकरे?

मनसेचा वर्धापन मेळावा पिंपरी चिंचवड येथे पार पडला. त्यात राज ठाकरे म्हणाले की, कुंभमेळ्याला जाऊन आल्यावर बाळा नांदगावकर यांनी मला कमंडलूमधील पाणी दिले. ते म्हणाले, पिणार का? मी नाही म्हटले. देशातील एकही नदी स्वच्छ नाही, तरीही आम्ही नदीला माता म्हणतो. श्रद्धेला पण काही अर्थ आहे की नाही असं परखड मत त्यांनी व्यक्त केले. 

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडMNSमनसेRaj Thackerayराज ठाकरेKumbh Melaकुंभ मेळाBJPभाजपा