शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
5
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
6
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
7
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
8
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
9
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
10
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
11
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
12
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
13
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
14
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
15
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
16
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
17
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
18
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
19
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
20
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी

"आम्ही XXX झालोय..." राज ठाकरेंच्या विधानावर जितेंद्र आव्हाडांनी ऑन कॅमेरा काय केले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2025 13:16 IST

भारतात प्रत्येकाला त्यांचं मत व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य आहे. किंबुहुना मी राज ठाकरेंचं अभिनंदन करेन. अशाप्रकारे हिंमतीने बोलणारा माणूस महाराष्ट्रात आहे. आपल्या मनातलं बोलायला हिंमत लागते असं त्यांनी म्हटलं. 

मुंबई - मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी कुंभमेळ्यातील पवित्र स्नानावरून गंगा नदीच्या अस्वच्छतेवर भाष्य केले. राज यांच्या विधानावरून भाजपासह शिवसेनेसारख्या संघटनांनी आक्षेप घेत त्याचा समाचार घेतला. मात्र राज ठाकरे जे बोलले, ते बोलायला धाडस लागते, आम्ही XXX झालोय, षंढ झालोय, हे बोलायलाही घाबरतो, नको आपल्या मागे लागतील परंतु राज ठाकरे जे बोलले त्यांना सलाम असं सांगत जितेंद्र आव्हाडांनी त्यांचं कौतुक केले.

राज यांच्या विधानावर माध्यमांनी जितेंद्र आव्हाडांना प्रतिक्रिया विचारली. त्यावेळी जितेंद्र आव्हाडांनी राज यांची मिमिक्री करत म्हणाले की,  राज ठाकरेंनी जे विधान केले, जी नकल केली ते आम्ही केले असते तर आतापर्यंत आमच्या घरावर मोर्चे, दगडफेक झाली असती. आम्ही देशद्रोहीही ठरलो असतो. राज ठाकरे यांनी त्यांचं मत व्यक्त केले. भारतात प्रत्येकाला त्यांचं मत व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य आहे. किंबुहुना मी राज ठाकरेंचं अभिनंदन करेन. अशाप्रकारे हिंमतीने बोलणारा माणूस महाराष्ट्रात आहे. आपल्या मनातलं बोलायला हिंमत लागते असं त्यांनी म्हटलं. 

तसेच आम्ही कदू, XXX, षंढ झालोत, आम्ही हे बोलायलाही घाबरतो, नको नको उगाच आपल्या मागे लागतील. राज ठाकरे मनात आहे ते बिनधास्त बोललेत. ते बोलले ते अनेक भारतीयांच्या मनात आहेत. राज ठाकरेंच्या डेरिंगला माझा सलाम आहे. बाकी मला यात काही बोलायचे नाही असं जितेंद्र आव्हाडांनी प्रतिक्रिया देत सॅल्यूट देतानाची अ‍ॅक्शन माध्यमांसमोर केली. 

राज ठाकरे मविआत सहभागी होणार?

दरम्यान, राज ठाकरे मविआत सहभागी होणार का या प्रश्नावर जितेंद्र आव्हाड यांनी माध्यमांना खोचक टोला लगावला. तुम्ही स्वप्नरंजन करत राहावे, पत्रकाराचं काम स्वप्न पाहणे हे आहे. तुमच्या स्वप्नावरच महाराष्ट्र चालतो, तुम्ही स्वप्न पाहात राहा. परंतु राज ठाकरे यांनी जे विधान केले, ते करण्याची हिंमत दाखवली त्यासाठी राज ठाकरेंना मानाचा मुजरा असं आव्हाडांनी सांगितले.

काय म्हणाले होते राज ठाकरे?

मनसेचा वर्धापन मेळावा पिंपरी चिंचवड येथे पार पडला. त्यात राज ठाकरे म्हणाले की, कुंभमेळ्याला जाऊन आल्यावर बाळा नांदगावकर यांनी मला कमंडलूमधील पाणी दिले. ते म्हणाले, पिणार का? मी नाही म्हटले. देशातील एकही नदी स्वच्छ नाही, तरीही आम्ही नदीला माता म्हणतो. श्रद्धेला पण काही अर्थ आहे की नाही असं परखड मत त्यांनी व्यक्त केले. 

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडMNSमनसेRaj Thackerayराज ठाकरेKumbh Melaकुंभ मेळाBJPभाजपा