शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

Jitendra Awhad daughter Natasha: वडीलांवर विनयभंगाचा गुन्हा, जितेंद्र आव्हाडांची मुलगी नताशा म्हणते, "असं घडल्यामुळे..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2022 12:15 IST

गर्दीत आव्हाडांनी गैरवर्तन केल्याची महिलेची तक्रार

Jitendra Awhad daughter Natasha: ठाणे जिल्ह्यातील एका कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड गेले असताना त्यांच्यावर एका महिलेने विनयभंगाची तक्रार दाखल केली. आव्हाड गर्दीतून वाट काढत पुढे जात होते, त्यावेळी ती महिला समोर येताच आव्हाडांनी त्या महिलेला हाताने बाजूला केले आणि ते पुढे जात राहिले. मात्र, आव्हाड यांनी दोन्ही हातांनी धरून मला पुरूषांची गर्दी असलेल्या ठिकाणी ढकलल्याचा आरोप त्या तक्रारदार महिलेने केला आहे. या तक्रारीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जितेंद्र आव्हाड यांच्या बचावासाठी विविध प्रतिक्रिया देत आहेत. याचदरम्यान, जितेंद्र आव्हाड यांची मुलगी नताशा हिने आपल्या वडीलांवरील या तक्रारीबाबत अतिशय भावनिक प्रतिक्रिया दिली.

विनयभंगाची तक्रार दाखल झाल्यानंतर संपूर्ण दिवसभर जितेंद्र आव्हाड यांच्यावर विविध आरोप करण्यात आले. त्यामुळे कौटुंबिक स्तरावर त्याचा नक्कीच परिणाम झाल्याचे त्यांची कन्या नताशा हिने सांगितले. जितेंद्र आव्हाड यांच्यावर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल झाला असून तुम्ही त्यांची मुलगी म्हणून या प्रकरणाकडे कसं बघता? असा सवाल नताशाला विचारण्यात आला. त्यावेळी तिने आपले मत मांडले. "कुटुंबातील एका सदस्यावर अशा प्रकारचे आरोप झाल्यामुळे कौटुंबिकदृष्ट्या आम्हाला खूपच मानसिक त्रास झाला आहे. असं घडल्यामुळे आम्ही सारेच काहीसे 'डिस्टर्ब्ड' आहोत. त्याहूनही महत्त्वाची गोष्ट म्हणजे महिलांच्या संरक्षणासाठी तयार करण्यात आलेल्या कायद्यांचा किती आणि कसा दुरूपयोग केला जातोय हे या प्रकरणात दिसत आहे," अशा शब्दांत नताशाने वडीलांना भक्कम पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले.

तक्रारदार महिलेनं नेमकं काय म्हटलं?

"तुम्ही व्हिडिओत पाहू शकता. आम्ही कार्यक्रमासाठी उपस्थित होतो आणि प्रचंड गर्दी होती. त्यामुळे गर्दीचा अंदाज घेऊनच आम्ही सहजपणे मुख्यमंत्र्यांना भेटता यावं यासाठी कारच्या जवळ एका रांगेतून पुढे जात होतो. त्यात तुम्ही आमच्या पुढे श्रीकांत शिंदे यांनाही पाहू शकता. माझे मुख्यमंत्र्यांच्या पीए सोबतही त्यांच्या भेटीसाठी बोलणं झालं होतं. त्यासाठी आम्ही कारच्या कडेने पुढे जात होतो. पण त्यावेळी समोरून स्थानिक आमदार आले. आता ते आमदार असल्यानं मी त्यांना पाहून स्माइल केलं. पण त्यांनी तू इथं काय करतेस असं म्हणत मला दोन्ही हातांनी पकडून ढकललं. जिथं पुरुषांची गर्दी होती त्या ठिकाणी मला ढकललं गेलं. धक्का लागणं आणि धक्का देणं यात फरक आहे," अशा शब्दांत भाजपा पदाधिकारी असलेल्या तक्रारदार महिलेने आपली बाजू मांडली.

अजित पवारांकडून आव्हाडांची पाठराखण आणि राज्य सरकारला इशारा

"लोकप्रतिनिधीवर विनयभंगाचे कलम लावणे हा अतिशय भ्याड प्रकार असून सरकारने हा गुन्हा मागे घ्यावा. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर २४ तासात दोन गुन्हे दाखल करण्यात आले. त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. मराठीत म्हण आहे 'चार दिवस सासूचे तसेच चार दिवस सुनेचे' असतात ही पण गोष्ट प्रत्येकाने लक्षात घ्या," असा स्पष्ट इशारा अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला दिला.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडMolestationविनयभंगAjit Pawarअजित पवारBJPभाजपा