शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

वादग्रस्त विधानावर जितेंद्र आव्हाडांनी व्यक्त केला खेद; विरोधकांना दाखवले पुरावे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2024 12:40 IST

माझं भाषण चांगले झाले. पण एका वाक्याने भाषणाची दिशा बदलली. त्या वाक्याने लोकांची मने दुखावली गेली. त्यावर मी खेद व्यक्त करतो असं आव्हाडांनी म्हटलं.

अहमदनगर - Jitendra Awhad Statement ( Marathi News ) प्रभू राम जिथून गेले त्या गावचा माणूस मी आहे. त्यामुळे मला राम कुणी सांगू नये. पक्ष कधीही सामाजिक आशय ठरवत नाही. मी पुरंदरेंच्या विरोधात बोललो तेव्हा मला प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी माफी मागायला सांगितली होती. पक्ष कुणाची सामाजिक भूमिका ठरवू शकत नाही असं पवारांनी मला स्पष्ट सांगितले होते. मी एकटा लढतो. रोहित पवारांना मी फार महत्त्व देत नाही. अबुधाबीत जाऊन बोलणे सोपे आहे. कुठलेही भाष्य असते कार्यकर्त्यांनी पटतं ते घ्यावे आणि बाकी सोडून द्यावे. वाल्मिकी रामायणात जे लिहिलंय ते मी बोललो. लोकभावनेचा आदर करतो. कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी खेद व्यक्त करतो असं स्पष्टीकरण जितेंद्र आव्हाडांनी वादग्रस्त विधानावर दिले आहे. 

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, मी कुठलंही भाष्य अभ्यासाशिवाय करत नाही. मला कुणाच्याही भावना दुखवायच्या नाही. माझ्यावर कितीही गुन्हे दाखल करा. मी जे बोलतो त्याचे पुरावे देतो. वाल्मिकी रामायणाचे मी पुरावे देऊन बोललो. सत्य कडू असले तरी लोकांच्या भावना दुखावू नये असं मला शिकवण्यात आलंय. त्यामुळे मी खेद व्यक्त करतो. कधी कधी भाषणाच्या ओघात बोलले जाते. मुलींना उचलून नेण्याची भाषा करणारे आज माझ्यावर बोलतायेत. माझ्या विधानाचा पक्षाशी संबंध नाही. मीदेखील रामभक्त आहे. आमचा राम सर्वांचे भले करणारा आहे. राम बेरोजगारी, महिलांवरील अत्याचार बघून पुन्हा जाईल असं त्यांनी सांगितले. 

तसेच माझं भाषण चांगले झाले. पण एका वाक्याने भाषणाची दिशा बदलली. त्या वाक्याने लोकांची मने दुखावली गेली. त्यावर मी खेद व्यक्त करतो. मी जे बोललो ते ओघात बोलून गेलो. श्रीराम मांसाहारी होते असं मी बोललो. हा वाद मला वाढवायचा नाही. पण जे याविरोधात उभे राहिलेत त्यांच्या माहितीकरता, वाल्मिकी रामायणात जे अयोध्या कंद यातील खंड २२, श्लोक १०२ यात लिहिलंय. माझ्याकडे सर्व पुरावे आहेत. भाषांतरीत केलेले संदर्भ आहेत. रामायणात जे लिहिलंय त्यावर कुणाचा आक्षेप आहे का तर ते सांगावे. अभ्यासाशिवाय मी कुठलेही भाष्य केलेले नाही. पण आजकाल अभ्यासाला महत्त्व नाही तर भावनांना महत्त्व आहे. त्यामुळे जर माझ्या वक्तव्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी खेद व्यक्त करतो असं जितेंद्र आव्हाडांनी म्हटलं. 

दरम्यान, नितेश राणे वाचतात किती, बोलतात किती हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. माझ्याकडे सगळे पुरावे उपलब्ध आहेत. ज्यांना लॉजिकली भांडायचे नसते त्याला अशाप्रकारे अटक करा, जेलमध्ये टाका बोलत असतात. आम्हा बहुजनांचा तो राम आहे. तुम्ही आमच्या रामाचे अपहरण करताय. जातीपाती न मानणारा राम आहे. सर्व जनता सुखी असावी हा आमचा राम आहे. राम हृदयात आहे. तुम्हाला आमचा राम निवडणुकीच्या बाजारात मांडायचा आहे पण आमच्या हृदयात राम जन्मापासून आहे. दरवर्षी मी रामाच्या दर्शनाला पंचवटीला जातो. त्यामुळे मला रामाबद्दल कुणी सांगायचा प्रयत्न करू नका अशा शब्दात जितेंद्र आव्हाडांनी भाजपावर निशाणा साधला. 

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडBJPभाजपा