शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

विधानसभेत जिंतूरमध्ये पुन्हा आजी-माजी आमदारांमध्ये चुरस

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2019 12:37 PM

युतीत ही जागा भाजपकडे तर आघाडीत राष्ट्रवादी पक्षाकडे राहणार असल्याचे ठरले असल्याची चर्चा आहे.

मुंबई - विधानसभा निवडणुका अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपली आहेत. त्यामुळे सर्वच पक्षातील इच्छुकांनी तयारी सुरु केली आहे. परभणी जिल्ह्यातील जिंतूर मतदारसंघात यावेळी पुन्हा आजी-माजी आमदार यांच्यात लढाई होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर आणि राष्ट्रवादीचे विद्यामान आमदार विजय भांबळे यांच्यातच पुन्हा मुख्य लढत होणार असल्याची चर्चा आहे.

गेल्या निवडणुकीत सर्वच पक्षांनी वेगवेगळे आपले उमदेवार रिंगणात उतरवले होते. जिंतूरमध्ये काँग्रेसकडून रामप्रसाद बोर्डीकर, राष्ट्रवादीकडून विजय भांबळे, शिवसेनेचे राम खराबे पाटील व भाजपाचे संजय साडेगावकर रिंगणात होते. मात्र खरी लढत बोर्डीकर आणि भांबळे यांच्यात झाली. भांबळे यांनी यावेळी विजय मिळवला होता. पुढे बोर्डीकर यांनी काँग्रेसचे हात सोडून कमळ हातात घेतले. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यात मुख्य लढत होणार असल्याचे निश्चित समजले जात आहे.

युतीत ही जागा भाजपकडे तर आघाडीत राष्ट्रवादी पक्षाकडे राहणार असल्याचे ठरले असल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादी पक्षाकडून आमदार भांबळे यांच्या वेतिरिक्त उमदेवारीसाठी एक ही अर्ज आला नसल्याने त्यांची उमेदवारी निश्चित झाली आहे. तर भाजपकडून रामप्रसाद बोर्डीकर यांनी दावा केला आहे. तसेच मागच्यावेळी झालेल्या पराभवाचा वचका काढण्याचा बोर्डीकर यांनी ठरवले असल्याचे बोलले जात आहे.

२०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीत परभणी मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून  आमदार विजय भांबळे यांना उमदेवारी देण्यात आली होती. मात्र त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. त्यावेळी जिंतूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसकडून रामप्रसाद बोर्डीकर आमदार होते. मात्र पुढे विधानसभेत आघाडी झाली नसल्याने राष्ट्रवादीकडून विजय भांबळे यांना उमदेवारी देण्यात आली होती. आणि त्यावेळी त्यांनी जिंतूरमधून विजय सुद्धा मिळवला. आता पुन्हा २०१४ प्रमाणे या दोन नेत्यांमध्येच लढाई होणार असून, मात्र मागच्यावेळी काँग्रेसकडून लढणारे रामप्रसाद बोर्डीकर यावेळी भाजपकडून रिंगणात असणार आहे.