शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
4
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
5
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
6
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
7
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
8
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
9
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
10
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
11
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
12
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
13
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
14
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
15
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
16
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
17
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
18
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
19
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
20
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 

नवाब मलिकांविरोधात जयकुमार रावल यांचा अब्रू नुकसानीचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2018 7:34 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्याविरोधात पर्यटन व रोजगार हमी मंत्री जयकुमार रावल यांनी अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला आहे. 

धुळे: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्याविरोधात पर्यटन व रोजगार हमी मंत्री जयकुमार रावल यांनी अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला आहे. नवाब मलिक यांनी रावल यांच्यावर कवडीमोल भावाने जमिनी हडपल्याचा आरोप केला होता. आज दोडाईचा पोलिसात जयकुमार रावल यांनी नबाब मालिक यांच्याविरोधात अब्रू नुकसानीची तक्रार दाखल केली आहे. अब्रू नुकसानीची तक्रार दाखल केल्याने मलिक यांच्या अडचणीत वाढ झाल्याचे दिसत आहे. पो. नि. हेमंत पाटील यांनी भादंवि कलम 499 व 500 नुसार मानहानीचा तक्रार दाखल केली असून पुढील तपास पो उपनीरीक्षक निलेश मोरे करीत आहेत.

धुळे जिल्हयातील विखरण येथील शेतकरी धर्मा पाटील यांच्या मृत्यूनंतर पर्यटन व रोजगार हमी मंत्री जयकुमार रावल यांच्यावर आरोप करणं राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्या अंगाशी येण्याची चिन्हं आहेत.  कारण विखरण येथे जयकुमार रावल यांनी घेतलेली जमीन ही अधिसूचना निघाल्याच्या 2 महिने आधीच खरेदीचा व्यवहार झाला असून त्यासाठी महाजन को सह जिल्हाधिकारी ,धुळे यांनी त्यांना रितसर परवानगी दिली असल्याचे  रावल आज पत्रकार परिषदेत म्हणाले. त्याच दस्ताऐवजांच्या आधारे रावल यांनी नवाब मलिक यांच्या विरोधात दोंडाईचा  पोलिसात तक्रार देवून दोडाईचा न्यायालयात  मानहानीचा दावा दाखल केला आहे.

 

धुळे जिल्यातील विखरण येथील  वीज प्रकल्पासाठी  2009ला शेतकरीची जमीन भूसंपादन अधिकाऱ्यानी अधिग्रहित केली आहे.त्यात अधिग्रहित करण्यात आलेल्या जमिनीचा कमी मोबदला मिळाल्याचा कारणावरून धर्मा पाटील यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला .त्यात दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला. धर्मा पाटील यांच्या मृत्यूनंतर नवाब मलिक यांनी करून रोजगार हमी योजना व पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्याविरोधात जमीन बळकविल्याचा  व धर्मा पाटील यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा आरोप केला होता. त्यामुळे जयकुमार रावल यांच्या राजकीय व सामाजिक प्रतिष्टेला धक्का  पोहचला .राजकीय बदनामी केली, अशी तक्रार रावल यांनी केली. 

दरम्यान, तक्रार दिल्यानंतर पत्रकारांशी बोलतांना रावल यांनी राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनाच आरोपींच्या पिंज-यात उभे केले.  समाजसेवक अण्णा हजारे यांनी मलिक यांचे भ्रष्ट्राचाराचे प्रकरण बाहेर काढले होते, त्यावेळी मलिक यांना राजीनामा दयावा लागला असल्याचे नमुद करत रावल परीवार हा दानशूर परीवार असून लोकांच्या जमिनी घेण्याचे सांगणा-या नवाब मलिकांना रावल परीवाराचा इतिहास माहित नाही, रावल परीवाराकडे स्वातंत्रपूर्व काळात 5000 एकर जमिन होती, त्यातून बाजार समिती, दुध संघ, खरेदी विक्री संघ, टेलिफोन कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय, बस स्टॅन्ड अशा विविध सार्वजनिक ठिकाणी जमिनी नाममात्र दरात दिलेल्या आहेत. त्यामुळे नवाब मलिक यांची रावल परीवारावर टीका करण्याची लायकी नाही, दोंडाईचा येथील कत्तलखान्याला आम्ही विरोध केल्यामुळे नवाब मलिक यांचा जळफळाट झाल्याचे जयकुमार रावल यांनी यावेळी नमुद केले. 

टॅग्स :Dharma Patilधर्मा पाटील