शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Politics : 'योग्य वेळ, योग्य निर्णय! जयंत पाटील लवकरच सरकारमध्ये येतील'; राष्ट्रवादीमधील नेत्याने सगळंच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 12:33 IST

Maharashtra Politics : काल महायुती सरकारमधील ३९ आमदारांनी मंत्रि‍पदाची शपथ घेतली.

Maharashtra Politics ( Marathi News ) :   मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारमध्ये रविवारी एकाचवेळी ३३ कॅबिनेट मंत्री आणि सहा राज्यमंत्र्यांना शपथ देण्यात आली. राष्ट्रवादी कोट्यातील आणखी एक मंत्रिपद खाली ठेवल्याचे बोलले जात आहे. हे मंत्रिपद कोणत्या नेत्यासाठी याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान, आता यावर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. 

फडणवीसांची ऑफर नाकारल्याचा पश्चाताप होतोय; शिवसेना आमदाराची शिंदेंवर उघड नाराजी

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एक मंत्रिपद हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासाठी राखीव ठेवल्याचा मोठा गौप्यस्फोट आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे. यामुळे आता राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू आहेत. काही दिवसापूर्वी अधिवेशनात जयंत पाटील यांनी 'योग्य वेळी, योग्य निर्णय' असं विधान केले होते. दरम्यान, आता एक मंत्रिपद राखील ठेवल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत. 

विधानसभेचे हिवाळी अधिवेशन नागपुरात सुरू आहे. दरम्यान, आज अमोल मिटकरी यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी बोलताना अमोल मिटकरी म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे ४१ आमदार निवडून आले आहेत. त्यामुळे मंत्रिपद देताना तारांबळ होणं साहाजिक आहे.  मला वाटत नाही कोण नाराज असेल. भुजबळ साहेब मंत्रिमंडळात नसल्यामुळे काही ओबीसी कार्यकर्ते नाराज आहेत. पक्षाकडून ते लवकरच राज्यसभेवर जातील अशी माहिती माध्यमातून मिळाली. भाजपामधील सुधीर मुनगंटीवार यांनाही मंत्रि‍पदाची शपथ घेता आलेली नाही, शिवसेनेतील दीपक केसरकर यांनाही शपथ घेता आली नाही. कोणही नाराज नाही, असंही मिटकरी म्हणाले. 

'जयंत पाटील लवकरच सरकारमध्ये येतील'

राखील ठेवलेल्या मंत्रिपदावरुन बोलताना अमोल मिटकरी म्हणाले, मागेही एक मंत्रिपद जयंत पाटील यांच्यासाठी ठेवले होते त्यावेळी त्यांनी फार विचार केला. नंतर लोकसभा निवडणुकीत त्यांना यश मिळालं त्यावेळी त्यांना तिथं जाण्याची गरज नाही असं वाटलं. पण आता अशी परिस्थिती आहे की एक मंत्रिपद जे खाली ठेवलंय त्याकरता योग्य व्यक्ती, योग्य निर्णय हे तेच बोललेत. त्यामुळे आता लवकरच योग्य निर्णय होईल. त्यांना अस्वस्थ होणे सहाजिकच आहे. पण ते नक्कीच येतील. डिसेंबरच्या अखेर ते नक्की येतील, असा मोठा गौप्यस्फोट अमोल मिटकरी यांनी केला.

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवारAmol Mitkariअमोल मिटकरी