शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
3
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
4
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
5
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
6
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
7
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
8
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
9
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
11
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
12
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
13
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
14
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
15
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
16
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
17
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
18
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
19
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
20
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
Daily Top 2Weekly Top 5

आम्ही नव्हे तर जयंत पाटीलच आमच्याकडे येतील; राष्ट्रवादी मंत्र्यांचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2023 10:10 IST

लोकसभेत ४५ तर विधानसभेत २०० हून अधिक जागा जिंकण्याचे आमचे मिशन आहे त्यादृष्टीने आम्ही तयारीला लागलो आहेत असंही मंत्री धर्मरावबाबा आत्रामयांनी म्हटलं.

नागपूर – आमच्याकडे अजित पवारांच्या नेतृत्वाखाली ४५ आमदार आहेत. ते एकत्र आहेत. मंगळवारीही आमची बैठक झाली होती. आमचे आमदार एकसंघ आहेत. आणखीही आमदार येतील. जे बोलणारे आहेत तेदेखील येतील असा दावा मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी करत शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या विधानावर प्रत्युत्तर दिले आहे.

धर्मरावबाबा आत्राम म्हणाले की, अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यापासून आमच्या सर्व आमदार, कार्यकर्त्यांना सांभाळण्याचे काम आमचे मंत्री करत आहेत. आमदारांना न्याय देण्याचा प्रयत्न सुरू आहे. आधी अनेक आमदारांना विचारलेही जात नव्हते. अजितदादा डॅशिंग नेते आणि प्रशासनावर पकडही आहे. त्यामुळे अजित पवारांवर विश्वास ठेऊन अनेक आमदार त्यांच्यासोबत आले आहेत असं त्यांनी सांगितले.

त्याचसोबत मविआ असताना दादांनी आमदारांना, खासदारांना भरपूर निधी दिला होता. त्यानंतर दुसरं सरकार आल्यानंतर त्यावर स्थगिती मिळाली होती. परंतु अजितदादा उपमुख्यमंत्री झाले आणि स्थगिती उठली. सगळ्या आमदारांच्या मतदारसंघातील कामे जोरात सुरू आहेत. जे आमदार नाराजीत होते, विरोधी बाकांवर समाधानी नव्हते. ते आता सत्तेच्या माध्यमातून मतदारसंघात काम करतायेत. सगळ्यांना विश्वासात घेऊन महायुतीतील आमदारांना एकत्र ठेवले जात आहे. लोकसभेत ४५ तर विधानसभेत २०० हून अधिक जागा जिंकण्याचे आमचे मिशन आहे त्यादृष्टीने आम्ही तयारीला लागलो आहेत असंही मंत्री धर्मरावबाबा आत्रामयांनी म्हटलं.

दरम्यान, लोकसभेची चर्चा अजून पक्षात व्हायची आहे. माझी लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा आहे. त्यादृष्टीने मी कामाला लागलो आहे. ज्यांना ज्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार आदेश देतील त्यांना लोकसभेत उभं राहावे लागेल. पक्ष मजबुतीसाठी, मोदी सरकारचे हात बळकट करण्यासाठी उभे राहावे लागेल. आमच्याकडे ५३ आमदार होती, कुठलाही गट राहणार नाही असा दावा मंत्री धर्मरावबाबा आत्रामयांनी केला आहे.

काय म्हणाले जयंत पाटील?

१५ आमदार आमच्या संपर्कात असून त्यांची पुन्हा येण्याची इच्छा आहे पण अंतिम निर्णय शरद पवार घेतील, आताच बोलून त्या आमदारांना अडचणीत आणणार नाही असा दावा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष  जयंत पाटील यांनी केला होता.

 

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवार