शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
3
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
4
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
5
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
6
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
7
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
8
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
9
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
10
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
11
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
12
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
13
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
14
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
15
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
16
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
17
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
18
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
19
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
20
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?

जयंत पाटील लवकरच अजितदादांच्या राष्ट्रवादीत? अमोल मिटकरी म्हणाले, "योग्य वेळी निर्णय घेतील..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2024 17:32 IST

जयंत पाटील लवकरच अजित पवारांच्या राष्ट्रवादीत असतील, असा विश्वास अमोल मिटकरी यांनी व्यक्त केला. 

मुंबई : आज राहुल नार्वेकर यांची विधानसभेचे अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली. यावेळी त्यांच्या अभिनंदनाच्या ठरावावर बोलताना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. सभागृहात बोलताना जयंत पाटील यांनी योग्य वेळी योग्य निर्णय असा आपल्या पक्षाचा नियम असल्याचे म्हटले. त्यावरून आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादी गटाचे नेते अमोल मिटकरी भाष्य केले आहे. जयंत पाटील लवकरच अजित पवारांच्या राष्ट्रवादीत असतील, असा विश्वास अमोल मिटकरी यांनी व्यक्त केला. 

जयंत पाटील म्हणाले योग्य वेळी योग्य निर्णय घेणार. मधली ओळ अशी आहे की, लवकरच अजित पवारांच्या राष्ट्रवादी सोबत ते असतील. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे अजित पवार, म्हणून योग्य वेळी योग्य निर्णय ते घेणार आहेत. गेल्या वेळच्या महायुतीच्या सरकारच्या 10 कॅबिनेट बैठका झाल्या होत्या. त्याचवेळी अजित पवारांनी जयंत पाटलांना बोलावलं होतं. मागच्या वेळी त्यांनी प्रयत्न केले होते, पण ती योग्य वेळ नव्हती. त्यांना आवाहन करायला मी मोठा नाही, असे अमोल मिटकरी म्हणाले.

याचबरोबर, जयंत पाटील यांच्यासाठी देवगिरीची दार अखंड खुली आहेत. त्यांच्यासारखा नेता महाराष्ट्राला पुढे नेऊ शकतो, तो आम्हालाच काय भाजपला पण हवाहवासा वाटतो. ड्राईव्हिंग सीट त्यांच्यासाठी राखीव ते उत्तम चालक आहेत, वेळ पडली तर स्टेरिंग त्यांच्या हाती देऊ. रथ कोणी हाकलावा हा नंतरचा भाग. मात्र, जयंत पाटील यांचे आजचे विधान महाराष्ट्राला खूप काही सांगून जाणारं आहे, असे सूचक विधान अमोल मिटकरी यांनी केले आहे.

सभागृहात नेमंक काय म्हणाले जयंत पाटील?  आज राहुल नार्वेकर यांची विधानसभेचे अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली. यावेळी त्यांच्या अभिनंदनाच्या ठरावावर जयंत पाटील यांनी भाषण केले. यावेळी विधानसभा अध्यक्षांचा मान किती मोठा असतो, याबाबत ते बोलत असताना म्हणाले की, मी 90 साली पहिल्यांदा अध्यक्ष झालो, असे म्हणाले. त्याचवेळी अजित पवार म्हणाले की, तुम्ही अध्यक्ष नाही आमदार झालात, तेव्हा जयंत पाटील यांनी सारवासारव करत म्हटलं की, बघा अजितदादांचं माझ्यावर किती लक्ष आहे, तेव्हा अजित पवार लगेच म्हणाले की, माझं तुमच्यावर लक्ष आहे, पण तुम्ही कधी प्रतिसाद देतांय, तेव्हा जयंत पाटील म्हणाले की, दादा आपल्या पक्षाचा एक नियम आहे, योग्य वेळी योग्य निर्णय. दरम्यान, जयंत पाटील यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा त्यांच्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याच्या चर्चेला उधाण आलं आहे.

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसAmol Mitkariअमोल मिटकरी