शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

“लगेच टोकाची भूमिका घेणे योग्य नाही”; जयंत पाटलांचे नाना पटोलेंना प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2022 18:14 IST

स्थानिकदृष्ट्या एकत्र यायची मनस्थिती नसल्यावर आपण कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांना किती फोर्स करु शकतो, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

मुंबई: महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारमधील अंतर्गत वाद मधून-मधून समोर येत असतात. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर थेट पाठीत सुरा खुपसण्याचे काम केल्याचा आरोप केला आहे. आम्हाला एकदा त्यांनी सांगून द्यावे की त्यांना भाजपासोबत जायचेय. ते एकदा पहाटे गेलेच होते भाजपासोबत. मैत्रीचा हात पुढे करून राष्ट्रवादी ही काँग्रेस पक्षाच्या पाठीत सुरा खुपसण्याचे काम करीत आहे. आमच्या विरोधात त्यांच्या कुरघोड्या सातत्याने सुरू आहेत. याचा जाब आम्ही त्यांना नक्कीच विचारू, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे. यावरून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी नाना पटोलेंना प्रत्युत्तर देत, लगेचच टोकाची भूमिका घेणे योग्य नसल्याचे म्हटले आहे. 

भंडारा आणि गोंदिया या जिल्हा परिषदांच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीचा कार्यक्रम पार पडला. गोंदियामध्ये भाजपला राष्ट्रवादीने मदत केल्याने काँग्रेस एकटी पडली. जिल्ह्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्रित जाऊ शकले नाहीत. गोंदियामध्ये भाजप अन् राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येत युती केली. त्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला. त्यामुळे गोंदिया जिल्हा परिषद अध्यक्षपदी भाजपचे पंकज राहागडाले तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे यशवंत गणवीर विजयी झाले. या एकूण घटनाक्रमानंतर काँग्रेसच्या नाना पटोले यांनी संताप व्यक्त करत राष्ट्रवादीवर निशाणा साधला.

लगेच टोकाची भूमिका घेणं योग्य नाही

जयंत पाटील यांनी नाना पटोलेंना प्रत्युत्तर देताना, गोंदियामधल्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ते पाठीत खंजीर खुपसला वगैरे अशी टीका करत आहेत. पण महाराष्ट्रात वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत, होऊ घातलेल्या आहेत. स्थानिक पातळीवर काही ठिकाणी कमी जास्त होऊ शकते. पण लगेच टोकाची भूमिका घेणं योग्य नाही. भाजपच्या विरोधात तिन्ही पक्ष एकत्र आहेत, इथून पुढेही तिन्ही पक्ष एकत्र आलेच पाहिजेत, असा आमचा आग्रह आहे. परंतु गोंदियामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी का एकत्रित जाऊ शकले नाहीत? तिथे अशी परिस्थिती का उद्भवली? याची आम्ही माहिती घेत आहोत. प्रफुल्ल पटेल परदेशात आहेत. ते परत आल्यानंतर अधिक तपशील घेऊन त्यांच्याशी चर्चा करु, असे जयंत पाटील म्हणाले.

दरम्यान, यासंबंधी नाना पटोले माझ्याशी दोन ते तीन वेळा बोलले होते. आम्ही तसा प्रयत्नही केला. पण स्थानिकदृष्ट्या एकत्र यायची मनस्थिती नसल्यावर आपण कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांना किती फोर्स करु शकतो, त्यांच्या मतालाही आपण किंमत दिली पाहिजे, त्यांची मतेही विचारात घेतली पाहिजे. आम्ही बरेच प्रयत्न केले, पण शक्य झाली नाही, असे जयंत पाटील यांनी सांगितले.  

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलNana Patoleनाना पटोलेMahavikas Aghadiमहाविकास आघाडी