शहरं
Join us  
Trending Stories
1
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
2
Rahul Gandhi :'निवडणुका नियमांनुसार होतात', राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचे उत्तर; चर्चेसाठी बोलावले
3
विहिरीत पडलेल्या वासराला वाचवण्यासाठी उतरलेले तरुण एका पाठोपाठ एक बेशुद्ध पडले, पाच जणांचा मृत्यू, संपूर्ण गावावर शोककळा  
4
"हात लावशील तर ३५ तुकडे करेन"; मधुचंद्राच्या रात्रीच नवरीने दिली थेट धमकी! म्हणाली...
5
अहमदाबाद विमान अपघात: ब्लॅक बॉक्सची माहिती कधीपर्यंत मिळेल? केंद्रीय मंत्री नायडू म्हणाले...
6
हिंदी मोफत शिकवत असतील तर त्यात गैर काय?; राष्ट्रवादी आमदार संग्राम जगतापांचा सवाल
7
ज्या कतारवर हल्ला केला, त्याच कतारच्या शेखने फोन केला...; अन् इराण सीझफायरसाठी तयारही झाला...
8
"अमेरिकेला गुडघे टेकायला लावले, इराण बनला मुस्लिम जगताचा नेता’’, महबूबा मुफ्ती यांनी केलं कौतुक  
9
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
10
युद्धबंदीच्या बातमीनंतर सेन्सेक्स-निफ्टी वधारले, पण 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले; काय आहे कारण?
11
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
12
लग्नानंतर दरमहा १०,००० फिक्स! पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त एकदाच करा गुंतवणूक!
13
"शूट करुन मग सर्जरी करायची...", अपघातानंतर अलका कुबल यांना निर्मात्यांकडून आला कटू अनुभव
14
"आधार कार्ड अपडेट करून येते"; बहाणा सांगून लग्नाच्या १०व्या दिवशी पत्नी झाली फरार! सोबत नवऱ्याचे पैसेही नेले
15
ENG vs IND : भारतीय क्रिकेटमध्ये दुखवटा! मैदानात दोन्ही संघांतील खेळाडूंनी दिग्गज फिरकीपटूला वाहिली श्रद्धांजली
16
Gold Silver Price 24 June: एका झटक्यात सोनं झालं ₹२ हजारांपेक्षाही स्वस्त; Iran-Israel युद्ध थांबलं तर चांदीचीही चमक झाली कमी
17
मुख्यमंत्री फडणवीसांच्या मतदारसंघात ५ महिन्यात ८ टक्के मतदार वाढ ही मतचोरीच- हर्षवर्धन सपकाळ
18
पत्नीच्या हत्येचा आरोपी NSG कमांडो, 'ऑपरेशन सिंदूर'च्या नावाखाली बचाव करत होता, सुप्रीम कोर्ट काय म्हणाले?
19
'गब्बर सिंगला डायलॉग शिकवले', यावरून ट्रोल होतायेत सचिन पिळगावकर; नक्की काय म्हणाले होते? पाहा Video
20
Jyeshtha Amavasya 2025: घरातले आजारपण, भांडणतंटा कमी होत नसेल तर ज्येष्ठ अमावास्येला करा 'हे' उपाय!

“लगेच टोकाची भूमिका घेणे योग्य नाही”; जयंत पाटलांचे नाना पटोलेंना प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2022 18:14 IST

स्थानिकदृष्ट्या एकत्र यायची मनस्थिती नसल्यावर आपण कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांना किती फोर्स करु शकतो, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

मुंबई: महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारमधील अंतर्गत वाद मधून-मधून समोर येत असतात. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर थेट पाठीत सुरा खुपसण्याचे काम केल्याचा आरोप केला आहे. आम्हाला एकदा त्यांनी सांगून द्यावे की त्यांना भाजपासोबत जायचेय. ते एकदा पहाटे गेलेच होते भाजपासोबत. मैत्रीचा हात पुढे करून राष्ट्रवादी ही काँग्रेस पक्षाच्या पाठीत सुरा खुपसण्याचे काम करीत आहे. आमच्या विरोधात त्यांच्या कुरघोड्या सातत्याने सुरू आहेत. याचा जाब आम्ही त्यांना नक्कीच विचारू, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे. यावरून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी नाना पटोलेंना प्रत्युत्तर देत, लगेचच टोकाची भूमिका घेणे योग्य नसल्याचे म्हटले आहे. 

भंडारा आणि गोंदिया या जिल्हा परिषदांच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीचा कार्यक्रम पार पडला. गोंदियामध्ये भाजपला राष्ट्रवादीने मदत केल्याने काँग्रेस एकटी पडली. जिल्ह्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्रित जाऊ शकले नाहीत. गोंदियामध्ये भाजप अन् राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येत युती केली. त्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला. त्यामुळे गोंदिया जिल्हा परिषद अध्यक्षपदी भाजपचे पंकज राहागडाले तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे यशवंत गणवीर विजयी झाले. या एकूण घटनाक्रमानंतर काँग्रेसच्या नाना पटोले यांनी संताप व्यक्त करत राष्ट्रवादीवर निशाणा साधला.

लगेच टोकाची भूमिका घेणं योग्य नाही

जयंत पाटील यांनी नाना पटोलेंना प्रत्युत्तर देताना, गोंदियामधल्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ते पाठीत खंजीर खुपसला वगैरे अशी टीका करत आहेत. पण महाराष्ट्रात वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत, होऊ घातलेल्या आहेत. स्थानिक पातळीवर काही ठिकाणी कमी जास्त होऊ शकते. पण लगेच टोकाची भूमिका घेणं योग्य नाही. भाजपच्या विरोधात तिन्ही पक्ष एकत्र आहेत, इथून पुढेही तिन्ही पक्ष एकत्र आलेच पाहिजेत, असा आमचा आग्रह आहे. परंतु गोंदियामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी का एकत्रित जाऊ शकले नाहीत? तिथे अशी परिस्थिती का उद्भवली? याची आम्ही माहिती घेत आहोत. प्रफुल्ल पटेल परदेशात आहेत. ते परत आल्यानंतर अधिक तपशील घेऊन त्यांच्याशी चर्चा करु, असे जयंत पाटील म्हणाले.

दरम्यान, यासंबंधी नाना पटोले माझ्याशी दोन ते तीन वेळा बोलले होते. आम्ही तसा प्रयत्नही केला. पण स्थानिकदृष्ट्या एकत्र यायची मनस्थिती नसल्यावर आपण कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांना किती फोर्स करु शकतो, त्यांच्या मतालाही आपण किंमत दिली पाहिजे, त्यांची मतेही विचारात घेतली पाहिजे. आम्ही बरेच प्रयत्न केले, पण शक्य झाली नाही, असे जयंत पाटील यांनी सांगितले.  

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलNana Patoleनाना पटोलेMahavikas Aghadiमहाविकास आघाडी