शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये पावसाचा हाहाकार, दार्जिलिंगमध्ये पूल कोसळला, 6 जणांचा मृत्यू; बघा Video 
2
पुण्यात NCP शरद पवार गटाच्या आमदाराला मारहाण; सत्ताधारी अजित पवारांच्या समर्थकांसोबत वाद
3
गेल्या ७ वर्षात किती वाढला भारतीयांचा पगार?; सरकारी रिपोर्टमधील आकडेवारी पाहून व्हाल हैराण
4
Napal Landslide: निसर्ग कोपला! नेपाळमध्ये ढगफुटी, भूस्खलनामुळे २२ जणांचा मृत्यू, विमानतळं महामार्ग बंद
5
केजरीवालांनी खासदार होणं टाळलं! उद्योगपती राजिंदर गुप्तांना राज्यसभेचे तिकीट, गुप्तांबद्दल जाणून घ्या
6
विषारी 'Coldrif' कफ सिरपने घेतला 14 बालकांचा जीव; महाराष्ट्रासह 6 राज्यांमध्ये तपास सुरू
7
नकाशावरून भारताचा इशारा, आता पाकिस्तानी सैन्यानं दिली पोकळ धमकी: "यापुढे युद्ध झालं तर..."
8
३० वर्षांचे गृहकर्ज होईल व्याजमुक्त; फक्त 'इतकी' SIP सुरू करा आणि व्याजापेक्षा जास्त पैसे कमवा
9
अमेरिकन कंपनीनं अचानक नोकरीवरून काढलं; युवकाचं ६ महिन्यातच नशीब पालटलं, महिन्याला ४४ लाख कमाई
10
अमित शाहांची रणनीती, बंद दाराआड पाऊण तास खलबतं; CM फडणवीस अन् दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
11
स्वामी चैतन्यानंदचे सोशल मीडियावरही 'चाळे'; मुलींच्या फोटोंवर कमेंट्स, स्क्रीनशॉट्स व्हायरल
12
४४ वर्षांपूर्वी 'या' बँकेने जारी केलं होतं पहिलं क्रेडिट कार्ड! आता देशभरात किती लोक वापरतात?
13
दिल्लीत केनियाचा खेळाडू आणि दोन प्रशिक्षकांवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; भाजप म्हणतेय... 'कलंक'
14
6 लाखांपेक्षाही खाली आली Maruti Baleno ची किंमत, GST कपातीशिवायही मिळतोय ढासू डिस्काउंट 
15
इतकी मोठी झाली उर्मिला-आदिनाथ कोठारेची लेक जिजा, दिसायला आहे आईची कार्बन कॉपी
16
राधाकिशन दमानींच्या DMart चा दुसऱ्या तिमाहीत महसूल वाढीचा धमाका; शेअरवर 'फोकस' वाढणार?
17
आता मिसाइल, दारूगोळा अन् शस्त्रास्त्र खासगी कंपन्या बनवणार; संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय
18
IND W vs PAK W Live Streaming: भारतीय 'रन'रागिणींचा दबदबा; पाक महिला संघ कधीच नाही जिंकला!
19
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
20
चालतंय तोवर चालवायचं असं तो वागला नाही; मग तुम्ही एवढी घाई का केली? कैफचा आगरकरांना सवाल

“लगेच टोकाची भूमिका घेणे योग्य नाही”; जयंत पाटलांचे नाना पटोलेंना प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2022 18:14 IST

स्थानिकदृष्ट्या एकत्र यायची मनस्थिती नसल्यावर आपण कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांना किती फोर्स करु शकतो, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

मुंबई: महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारमधील अंतर्गत वाद मधून-मधून समोर येत असतात. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर थेट पाठीत सुरा खुपसण्याचे काम केल्याचा आरोप केला आहे. आम्हाला एकदा त्यांनी सांगून द्यावे की त्यांना भाजपासोबत जायचेय. ते एकदा पहाटे गेलेच होते भाजपासोबत. मैत्रीचा हात पुढे करून राष्ट्रवादी ही काँग्रेस पक्षाच्या पाठीत सुरा खुपसण्याचे काम करीत आहे. आमच्या विरोधात त्यांच्या कुरघोड्या सातत्याने सुरू आहेत. याचा जाब आम्ही त्यांना नक्कीच विचारू, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे. यावरून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी नाना पटोलेंना प्रत्युत्तर देत, लगेचच टोकाची भूमिका घेणे योग्य नसल्याचे म्हटले आहे. 

भंडारा आणि गोंदिया या जिल्हा परिषदांच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीचा कार्यक्रम पार पडला. गोंदियामध्ये भाजपला राष्ट्रवादीने मदत केल्याने काँग्रेस एकटी पडली. जिल्ह्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्रित जाऊ शकले नाहीत. गोंदियामध्ये भाजप अन् राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येत युती केली. त्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला. त्यामुळे गोंदिया जिल्हा परिषद अध्यक्षपदी भाजपचे पंकज राहागडाले तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे यशवंत गणवीर विजयी झाले. या एकूण घटनाक्रमानंतर काँग्रेसच्या नाना पटोले यांनी संताप व्यक्त करत राष्ट्रवादीवर निशाणा साधला.

लगेच टोकाची भूमिका घेणं योग्य नाही

जयंत पाटील यांनी नाना पटोलेंना प्रत्युत्तर देताना, गोंदियामधल्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ते पाठीत खंजीर खुपसला वगैरे अशी टीका करत आहेत. पण महाराष्ट्रात वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत, होऊ घातलेल्या आहेत. स्थानिक पातळीवर काही ठिकाणी कमी जास्त होऊ शकते. पण लगेच टोकाची भूमिका घेणं योग्य नाही. भाजपच्या विरोधात तिन्ही पक्ष एकत्र आहेत, इथून पुढेही तिन्ही पक्ष एकत्र आलेच पाहिजेत, असा आमचा आग्रह आहे. परंतु गोंदियामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी का एकत्रित जाऊ शकले नाहीत? तिथे अशी परिस्थिती का उद्भवली? याची आम्ही माहिती घेत आहोत. प्रफुल्ल पटेल परदेशात आहेत. ते परत आल्यानंतर अधिक तपशील घेऊन त्यांच्याशी चर्चा करु, असे जयंत पाटील म्हणाले.

दरम्यान, यासंबंधी नाना पटोले माझ्याशी दोन ते तीन वेळा बोलले होते. आम्ही तसा प्रयत्नही केला. पण स्थानिकदृष्ट्या एकत्र यायची मनस्थिती नसल्यावर आपण कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांना किती फोर्स करु शकतो, त्यांच्या मतालाही आपण किंमत दिली पाहिजे, त्यांची मतेही विचारात घेतली पाहिजे. आम्ही बरेच प्रयत्न केले, पण शक्य झाली नाही, असे जयंत पाटील यांनी सांगितले.  

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलNana Patoleनाना पटोलेMahavikas Aghadiमहाविकास आघाडी