शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

“लगेच टोकाची भूमिका घेणे योग्य नाही”; जयंत पाटलांचे नाना पटोलेंना प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2022 18:14 IST

स्थानिकदृष्ट्या एकत्र यायची मनस्थिती नसल्यावर आपण कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांना किती फोर्स करु शकतो, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

मुंबई: महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारमधील अंतर्गत वाद मधून-मधून समोर येत असतात. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर थेट पाठीत सुरा खुपसण्याचे काम केल्याचा आरोप केला आहे. आम्हाला एकदा त्यांनी सांगून द्यावे की त्यांना भाजपासोबत जायचेय. ते एकदा पहाटे गेलेच होते भाजपासोबत. मैत्रीचा हात पुढे करून राष्ट्रवादी ही काँग्रेस पक्षाच्या पाठीत सुरा खुपसण्याचे काम करीत आहे. आमच्या विरोधात त्यांच्या कुरघोड्या सातत्याने सुरू आहेत. याचा जाब आम्ही त्यांना नक्कीच विचारू, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे. यावरून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी नाना पटोलेंना प्रत्युत्तर देत, लगेचच टोकाची भूमिका घेणे योग्य नसल्याचे म्हटले आहे. 

भंडारा आणि गोंदिया या जिल्हा परिषदांच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीचा कार्यक्रम पार पडला. गोंदियामध्ये भाजपला राष्ट्रवादीने मदत केल्याने काँग्रेस एकटी पडली. जिल्ह्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्रित जाऊ शकले नाहीत. गोंदियामध्ये भाजप अन् राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येत युती केली. त्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला. त्यामुळे गोंदिया जिल्हा परिषद अध्यक्षपदी भाजपचे पंकज राहागडाले तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे यशवंत गणवीर विजयी झाले. या एकूण घटनाक्रमानंतर काँग्रेसच्या नाना पटोले यांनी संताप व्यक्त करत राष्ट्रवादीवर निशाणा साधला.

लगेच टोकाची भूमिका घेणं योग्य नाही

जयंत पाटील यांनी नाना पटोलेंना प्रत्युत्तर देताना, गोंदियामधल्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ते पाठीत खंजीर खुपसला वगैरे अशी टीका करत आहेत. पण महाराष्ट्रात वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत, होऊ घातलेल्या आहेत. स्थानिक पातळीवर काही ठिकाणी कमी जास्त होऊ शकते. पण लगेच टोकाची भूमिका घेणं योग्य नाही. भाजपच्या विरोधात तिन्ही पक्ष एकत्र आहेत, इथून पुढेही तिन्ही पक्ष एकत्र आलेच पाहिजेत, असा आमचा आग्रह आहे. परंतु गोंदियामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी का एकत्रित जाऊ शकले नाहीत? तिथे अशी परिस्थिती का उद्भवली? याची आम्ही माहिती घेत आहोत. प्रफुल्ल पटेल परदेशात आहेत. ते परत आल्यानंतर अधिक तपशील घेऊन त्यांच्याशी चर्चा करु, असे जयंत पाटील म्हणाले.

दरम्यान, यासंबंधी नाना पटोले माझ्याशी दोन ते तीन वेळा बोलले होते. आम्ही तसा प्रयत्नही केला. पण स्थानिकदृष्ट्या एकत्र यायची मनस्थिती नसल्यावर आपण कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांना किती फोर्स करु शकतो, त्यांच्या मतालाही आपण किंमत दिली पाहिजे, त्यांची मतेही विचारात घेतली पाहिजे. आम्ही बरेच प्रयत्न केले, पण शक्य झाली नाही, असे जयंत पाटील यांनी सांगितले.  

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलNana Patoleनाना पटोलेMahavikas Aghadiमहाविकास आघाडी