शहरं
Join us  
Trending Stories
1
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
2
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
3
"सरकार निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचे काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
4
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
5
VIDEO: अरे देवा... माकडाने ट्रेकरला मध्येच गाठलं, आधी बॅग उचकली, मग पाठीवर चढलं अन् मग...
6
धक्कादायक! या डेटिंग ॲपवरून महिलांचे हजारो फोटो लीक, प्रायव्हसी आली धोक्यात
7
'संपत्तीचे पुरावे देतो चौकशी करा'; एकनाथ खडसे म्हणाले, 'महिलांबाबत गिरीश महाजनांचे नाव पुढे का येतं?'
8
फणस खाणं महागात पडलं, ड्रिंक अँड ड्राइव्हमध्ये पकडलं; चालकांसोबत नेमकं काय घडलं?
9
१ ऑगस्टपासून लागू होणार नवे नियम, क्रेडिट कार्ड, यूपीआय, एलपीजीसह होणार हे ६ बदल, खबरदारी न घेतल्यास खिसा होणार रिकामा
10
वाल्मिक कराडचा जेलमधून माझ्यासमोर एकाला फोन आला; अंबादास दानवेंचा खळबळजनक दावा
11
सॉवरेन गोल्ड बाँडची कमाल...! ८ वर्षांत दिला २५०% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
Raja Raghuvanshi : "राजाचा आत्मा अजूनही भटकतोय", भावाचा मोठा दावा; हत्येच्या ठिकाणी कुटुंबाने केलं असं काही...
13
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
14
टेलिव्हिजनवरील या अभिनेत्रीला लागला मोठा जॅकपॉट, रणबीरच्या 'रामायण'मध्ये झाली एन्ट्री
15
हृदयद्रावक! "माझी दोन्ही मुलं गेली, देवाने मला...", आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
16
IND vs ENG: जसप्रीत बुमराह पुन्हा दुखापतग्रस्त? चौथ्या कसोटीदरम्यान गोलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा
17
Shravan Somvar 2025: श्रावण सोमवारनिमित्त मित्रांना, नातेवाईकांना पाठवा श्लोकरूपी शुभेच्छा संदेश!
18
गृहकर्जावरील व्याज अनुदान; सविस्तर जाणून घ्या, मोदी सरकारची ही खास योजना; पूर्ण होईल घर घेण्याचं स्वप्न!
19
पहिला श्रावणी रविवार: वैभवप्राप्तीसाठी आदित्य राणूबाई व्रत; वाचा व्रतविधी आणि द्या खिरीचा नैवेद्य!
20
NSE, SBI आणि IDBI साठी NSDL चा आयपीओ बनला मल्टीबॅगर मनी मशीन; ३९९९०% पर्यंत रिटर्न  

"हे पहिल्यांदा असं घडलंय की..."; जयंत पाटलांनी सांगितला 2019-2024 निवडणुकीतील ट्रेंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2024 13:14 IST

Markadwadi News: नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालाबद्दल शंका उपस्थित केल्या जात आहे. विरोधकांकडून मतपत्रिकेवर निवडणुका घेण्याची मागणी जोर धरत आहे. 

Sharad Pawar Markadwadi News: विधानभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर ईव्हीएमच्या छेडछाडीचा मुद्दा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. ईव्हीएम विरोधात विरोधक आंदोलन उभारण्याच्या तयारीत दिसत आहे. मारकडवाडीतील ग्रामस्थांना ईव्हीएमबद्दल शंका उपस्थित करत मतपत्रिकेवर मतदान घेण्याची तयारी केली, पण प्रशासनाने त्याला विरोध केला. याच पार्श्वभूमीवर रविवारी (८ डिसेंबर) शरद पवारांच्या उपस्थित मारकडवाडी येथे कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी काही मुद्दे उपस्थित करत शंका मांडल्या. 

जयंत पाटील म्हणाले, "सोलापुरातील मारकडवाडी हे गाव देशभरातील ईव्हीएम विरोधाचा केंद्रबिंदू ठरणार आहे. आज आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या उपस्थितीत मारकडवाडीच्या गावकऱ्यांनी केलेल्या निर्धारास बळ दिले. चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी मारकडवाडीची माती अर्पण करून हे आंदोलन आमदार उत्तमराव जानकर यांनी सुरू केले आहे. त्यास प्रचंड असा प्रतिसाद मिळत आहे."

'मविआला प्रचंड प्रतिसाद, पण निकाल अनपेक्षित लागला'

"हे पहिल्यांदा असं घडलं की, मतदान झाल्यानंतर निवडणूक आयोगाने तीनदा चारदा आपली आकडेवारी दुरुस्त केली. आणि काही लाख मतं मतदान पेटीत वाढली हे आपल्या सगळ्यांच्या निदर्शनास आलं. महाराष्ट्रातून महाविकास आघाडीला प्रचंड प्रतिसाद असल्याचे चित्र होते. मात्र निकाल अनपेक्षित लागले", असे जयंत पाटील म्हणाले. 

पोस्टल मतदानाबद्दल प्रश्न

"पोस्टाने आलेली मते साधारण त्या मतदारसंघाचा ट्रेण्ड दाखवते. २०१९ साली पोस्टल मतदानात पुढे असलेल्या पक्षांचे अधिक उमेदवार निवडून आले. मात्र २०२४ मध्ये पोस्टल मतदानाचा ट्रेण्ड त्यांच्यासाठी चढा ठरला. आणि आपल्या तीन पक्षांसाठी उतरता. हा विरोधाभास आहे. म्हणून लोकांच्या मनात शंका आहे", अशी शंका जयंत पाटील यांनी व्यक्त केली. 

"लाडक्या बहिणींना योजनेतून पैसे मिळाले असतील पण पैसे मिळाले म्हणून महाराष्ट्र विकला जाणार नाही.  हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. मारकडवाडीच्या ग्रामस्थांनी मोठे धैर्य दाखवले आहे. त्यांनी एक चळवळ उभी केली आहे. त्यामुळे आता इतरही गावं प्रेरित होऊन हा प्रयोग करू पाहत आहे", असे जयंत पाटील म्हणाले. 

माझ्या मतदारसंघातही मते घटली -जयंत पाटील

जयंत पाटील यांनी त्यांच्या मतदारसंघातील अनुभवही यावेळी सांगितला. ते म्हणाले, "माझ्या मतदारसंघातही काही गावे आहेत, जिथे सर्व पक्ष एकत्रितपणे माझ्यासाठी काम करत असताना देखील मते प्रचंड प्रमाणात घटली. महाराष्ट्रात असे अनेक ठिकाणी पहायला मिळाले."

"फ्रीडम ऑफ स्पीच" हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून लोकांना दिलेला अधिकार आहे. त्याद्वारे या गावात बॅलेट पेपरवर मतदान व्हावे ही इच्छा लोकांनी व्यक्त केली. मात्र त्यास सरकार का घाबरतेय? यापुढे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बॅलेट पेपर वरच व्हाव्यात ही जनतेचे मागणी आहे", अशी मागणी जयंत पाटील यांनी केली.  

"मारकडवाडी येथील लोकांनी दाखवलेले धारिष्ट अभिमानास्पद आहे. आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांनी स्वतः उपस्थित राहून तुम्हाला पाठिंबा दिला आहे. लोकशाहीचा हा लढा आपण एकत्रितपणे लढू", असे म्हणत ईव्हीएम विरोधात आंदोलन उभे करण्याचे संकेत जयंत पाटलांनी यावेळी दिले. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीMahayutiमहायुतीJayant Patilजयंत पाटीलElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग