शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
5
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
6
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
7
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
8
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
9
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
10
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
11
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
12
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
13
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
14
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
15
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
16
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
17
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
18
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
19
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
20
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”

राष्ट्रवादीने केला करेक्ट कार्यक्रम! भाजपचे वाजवले ‘१२’; बड्या नेत्यांचा पक्षाला रामराम

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2022 16:28 IST

सोलापूर भाजपला राष्ट्रवादीने जोरदार धक्का दिला असून, रात्री १२ वाजता झालेल्या पक्ष प्रवेशाची राज्यभरात चर्चा आहे.

सोलापूर: राज्यातील आगामी विविध निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांचे फोडाफोडीचे राजकारण सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपमधील बड्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. रात्री १२ वाजता झालेल्या या प्रवेश सोहळ्याची सध्या राज्यभरात चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. 

भाजपचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस बिजू अण्णा प्रधाने, माजी नगरसेवक, सुभाष डांगे, माजी नगरसेविका मंदाकिनी तोडकरी, सुनील भोसले, किशोर पाटील, सुरेश पाटील यांनी सोमवारी रात्री राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला. यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना जयंत पाटील यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला.

सत्ता नसली की माणसाचे संतुलन बिघडते

सत्ता नसली की माणसाचे संतुलन बिघडते. राज्याच्या सत्तेविना भाजपची तशीच परिस्थिती झाली आहे, असा टोला लगावत प्रत्येक आमदाराशी संपर्क साधून सरकार पाडण्याचा प्रयत्न भाजपने केला. मात्र, १७० आमदारांच्या जोरावर सरकार मजबूत उभे आहे आणि महाराष्ट्रात परिवर्तन घडवत आहे, असे जयंत पाटील म्हणाले. बिजू अण्णा ज्या भारतीय जनता पक्षात काम करत होते, तिथे कार्यकर्त्यांना गरजेपुरते वापरून बाजूला सारण्याची प्रथाच आहे. कार्यकर्त्यांकडून काम करून घेणे आणि गरज संपली की कार्यकर्त्याला सोडून देणे ही प्रथा राष्ट्रवादीत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सर्वांनाच योग्य वागणूक मिळते, असे जयंत पाटील यांनी नमूद केले. 

दरम्यान, भाजपमधील अनेक लोकांना पक्ष सोडायचा आहे. आता अनेकजण राष्ट्रवादीत येण्याचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. सोलापूरचा कायापालट करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस काम करेल. येत्या महापालिका निवडणुकीत आपल्याला चांगले यश मिळवून हे काम करायचे आहे, असे आवाहन जयंत पाटील यांनी केले.  

टॅग्स :PoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाSolapurसोलापूर