शहरं
Join us  
Trending Stories
1
डॉक्टर तरुणी रात्री १.३० वाजता हॉटेलमध्ये आली होती; सीसीटीव्ही फुटेज पहिल्यांदाच समोर आले
2
मोठी बातमी! भारताकडे निघालेला रशियन तेलाचा टँकर समुद्रातून अचानक माघारी वळला; रिफायनरींची चिंता वाढली...
3
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासोबत दिसल्या स्क्वॉड्रन लीडर शिवांगी सिंग! 'त्या' एका फोटोने पाकिस्तानचा होईल जळफळाट
4
आजोबांच्या संपत्तीवर नातवंडांचा जन्मसिद्ध हक्क नाही; मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय, प्रकरण काय?
5
Mutual Funds मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचा होणार फायदा; सेबीचा नवा प्रस्ताव, गुंतवणूकदारांना काय मिळणार?
6
भारताचा हिटमॅन 'जगात भारी'! वनडेमध्ये रोहित शर्मा अव्वल, गिलला मागे टाकत रचला विश्वविक्रम
7
पाकिस्तान करणार हमासचा खात्मा? अमेरिकेची 'चलाख' खेळी; असीम मुनीर २० हजार सैन्य उतरवणार
8
इथं १ ग्रॅम घेताना घाम फुटतोय! मग ७ महिन्यात ६४००० किलो सोनं भारतात कोणी आणलं?
9
फक्त १० वर्षांच्या फरकाने तुमच्या SIP रिटर्न्समध्ये ४७ लाखांचा मोठा फरक; तोटा होण्याआधी गणित पाहा
10
Viral News: रस्त्यावरून खरेदी केले जुने बूट; ब्रँडचं नाव पाहिलं आणि किंमत तपासली; महिला झाली शॉक!
11
Guru Upasna: गुरु उच्च राशीत असेल तर उपासना कोणती करावी किंवा कशी वाढवावी? वाचा 
12
Shreyas Iyer : श्रेयस लवकर बरा व्हावा! सूर्याच्या आईची देवासमोर प्रार्थना; व्हिडिओ व्हायरल
13
जो तो एआयच्या मागे लागलाय...! इंटेलच्या CEO नी यासाठी राजीनामा दिला; आता ₹९१५ कोटी लावून...
14
भारत-अमेरिका टॅरिफ वॉर थांबणार, US सोबत खास डील होणार? ट्रम्प यांचे मोठे संकेत
15
सरकार पुन्हा विकणार LIC चे शेअर्स! केव्हा आणि कसं? जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
16
Indian Currency Facts : भारतीय चलनी नोटांच्या मध्यभागी खरंच चांदीची तार असते का? जाणून घ्या...
17
PPF Vs NPS Investment: पैशांची गुंतवणूक करायची आहे, एनपीएस निवडू की पीपीएफ? नक्की काय करावं
18
शाब्बास पोरा! ना कॉलेज, ना कोचिंग... UPSC सह क्रॅक केल्या १२ सरकारी नोकऱ्या, झाला IPS
19
"बंगल्यात झालेल्या चोरीतून सीडी, पेनड्राईव्ह, कागदपत्रे लांबवली", एकनाथ खडसेंचा मोठा गौप्यस्फोट
20
भाभा अणुसंशोधन केंद्रात हेरगिरीचा डाव, शास्त्रज्ञ बनून फिरत होते आदिल आणि अख्तर, असं फुटलं बिंग 

Jalgaon, Sangli Election Results: देवेंद्राचा 'चमत्कार'... २०१९चं स्वप्नही होऊ शकतं साकार? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2018 17:19 IST

Jalgaon, Sangli Election Results: गेल्या महिन्याभरात प्रदेश भाजपाचे, देवेंद्र सरकारचे 'बुरे दिन' सुरू झाले की काय, असं चित्र निर्माण झालं होतं. वारा विरुद्ध दिशेनं वाहू लागला होता. पण.....

मुंबईः 'शेतकरी रस्त्यावर उतरलेत... मराठे पेटून उठलेत... आता भाजपाचं - देवेंद्र सरकारचं काही खरं नाही...' असं वातावरण राज्यात असताना जळगाव महानगरपालिकेत उमललेलं 'कमळ' आणि सांगली-मिरजमध्ये पक्षाला दिसलेले 'अच्छे दिन' हा चमत्कारच मानायला हवा. गेली ४० वर्षं जळगावच्या राजकारणाचा 'रिमोट कंट्रोल' म्हणून ओळखले जाणारे राज्याचे माजी मंत्री सुरेशदादा जैन यांना मोठा धक्का देत भाजपानं जळगाव महानगरपालिकेवर झेंडा फडकवला आहे. तर, काँग्रेसचा गड मानल्या जाणाऱ्या - मराठ्यांची लक्षणीय संख्या असलेल्या सांगली-मिरज-कुपवाडमध्ये दणदणीत विजय मिळवून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिलाय. हे यश भाजपाचं मनोबल उंचावणारं आहे. आता त्या जोरावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांची टीम २०१९ चं स्वप्नही साकार करू शकेल का, याचं गणित मांडण्यास सुरुवात झालीय.

गेल्या साडेतीन-चार वर्षांच्या कार्यकाळात देवेंद्र सरकारपुढे अनेक आव्हानं उभी राहिली. काही वेळा सरकार अडचणीतही आलं. मुख्यमंत्र्यांसह काही मंत्र्यांवर आरोप झाले, नाणार प्रकल्प, समृद्धी महामार्गाला विरोध झाला - होतोय. काँग्रेस-राष्ट्रवादीने त्यांना घेरण्याचा प्रयत्न केलाच, पण सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेनंही त्यांना लक्ष्य केलं. मात्र, जनमानसातील चांगल्या प्रतिमेच्या जोरावर देवेंद्र फडणवीस यांनी सगळ्या संकटांमधून मार्ग काढला. इतकंच नव्हे तर, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि लोकसभेची प्रतिष्ठेची पोटनिवडणूकही जिंकून दाखवली. अर्थात, हे सगळं टीमवर्कच आहे, पण कर्णधार म्हणून फडणवीस यांचा वाटा मोठा आहे. 

मात्र, गेल्या महिन्याभरात प्रदेश भाजपाचे, देवेंद्र सरकारचे 'बुरे दिन' सुरू झाले की काय, असं चित्र निर्माण झालं होतं. वारा विरुद्ध दिशेनं वाहू लागला होता. आधी दूध दरवाढीच्या मुद्द्यावरून शेतकरी खवळले होते. दुधाचे टँकरच्या टँकर रस्त्यावर रिकामे केले जात होते. दरवाढ मिळेपर्यंत माघार नाही, यावर 'स्वाभिमानी' शेतकरी ठाम होते. त्यामुळे सरकारची शेतकरीविरोधी प्रतिमा निर्माण करण्याची संधीच विरोधकांना मिळाली होती. पण, सरकारनं शेतकऱ्यांना कसंबसं शांत केलं. मात्र, हे संकट दूर होत नाही तोच, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू झालेलं सकल मराठा समाजाचं आंदोलन चिघळलं. महाराष्ट्र बंद, मुंबई बंद, रास्ता रोको, दगडफेक, जाळपोळ, तोडफोड, जेल भरो, जलसमाधी हे सगळं गेल्या दोन आठवड्यांपासून राज्यात ठिकठिकाणी सुरू आहे. त्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीही झडताहेत. पण, मुख्यमंत्री कायद्यावर बोट ठेवून आहेत आणि आंदोलक त्यांच्या नावाने बोटं मोडताहेत. स्वाभाविकच, मराठा समाजाचा हा रोष फडणवीस सरकारला महागात पडेल, याबद्दल आज सकाळपर्यंत कुणाचंच दुमत नव्हतं. पण, जळगाव आणि सांगली महापालिकेच्या आश्चर्यकारक निकालांनंतर ते पारच बदललंय. देवेंद्र फडणवीस यांची काहीशी डगमगणारी 'खुर्ची'ही आता भक्कम झाली आहे.

जळगाव महापालिकेत ७५ पैकी तब्बल ५७ जागा भाजपानं जिंकल्यात. कागदावर हा सामना भाजपा विरुद्ध शिवसेना असा होता. पण त्यांची खरी लढाई  होती, ती सुरेशदादा जैन यांच्याशी. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी ही जबाबदारी स्वीकारली आणि 'मिशन जळगाव' फत्ते करून दाखवलं. गेल्या निवडणुकीत भाजपाने १५ जागा जिंकल्या होत्या, त्यात यावेळी ४२ जागांची वाढ झाली आहे. सुरेश जैन यांच्या खानदेश विकास आघाडीला गेल्या निवडणुकीत ३३ जागा मिळाल्या होत्या. यावेळी त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला १४ जागांपर्यंतच मजल मारता आलीय. भाजपाकडून झालेला हा पराभव शिवसेना नेत्यांना चांगलाच जिव्हारी लागणारा आहे.

जळगावपेक्षाही भाजपाने सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेत केलेला पराक्रम चक्रावून टाकणारा आहे. कारण, माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या काळापासून सांगली हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. २०१३च्या निवडणुकीत काँग्रेसला ४१ आणि राष्ट्रवादीला १९ जागा मिळाल्या होत्या, हे त्याचंच प्रतीक. पण, यावेळी भाजपाने ६ जागांवरून ४० जागांवर घेतलेली उसळी विरोधकांना आत्मपरीक्षण करायला भाग पाडणारी आहे.  

आता महापालिका निवडणुकांमध्ये स्थानिक मुद्दे महत्त्वाचे असतात, मतदार त्या आधारेच मतदान करतात, राज्यस्तरीय विषयांचा तिथे फारसा संबंध नसतो, असं काही जण म्हणतील. ते योग्यही आहे. पण मराठा आंदोलनाचा एकंदर आवाका आणि भडका बघता, मराठा मतदार फक्त स्थानिक मुद्द्यांवर मतदान करतील, असं वाटत नाही आणि म्हणूनच भाजपाचे दोन्ही विजय लक्षवेधी ठरतात.      देवेंद्र सरकारचं अपयश दाखवण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीनं कंबर कसली आहे. शिवसेना तर अगदी व्रत घेतल्यासारखीच त्यांच्यावर शरसंधान करत असते. परंतु, या तीनही विरोधकांना धोबीपछाड देऊन भाजपानं दोन्ही महापालिकांमध्ये मुसंडी मारलीय. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला जळगावात भोपळाही फोडता आलेला नाही आणि शिवसेना सांगलीत खातंही उघडू शकलेली नाही. या शून्यामध्ये बरंच काही सामावलेलं आहे. ते विरोधकांनी ओळखणं गरजेचं आहे. त्यासोबतच, हे यश डोक्यात जाऊ न देण्याची काळजी भाजपानं घेतली नाही तर त्यांचाही फुगा फुटू शकतो.  

टॅग्स :Jalgaon Electionजळगाव महानगरपालिका निवडणूकSangli Electionसांगली महानगरपालिका निवडणूकDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस