शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

Jalgaon, Sangli Election Results: मोर्चे, आंदोलनांनंतरही जनतेचा भाजपावर विश्वास- मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2018 18:04 IST

जळगाव, सांगली महापालिका निवडणुकीत भाजपाचा दणदणीत विजय

मुंबई- राज्यातील मोर्चे, आंदोलनांनंतरही जनतेचा भाजपावरील विश्वास कायम असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जळगाव आणि सांगली महापालिकेतील घवघवीत यशानंतर दिली आहे. सध्या राज्यात सर्वत्र मोर्चे निघत आहेत, आंदोलनं होत आहेत. मात्र तरीही जनतेचा भाजपा आणि राज्य सरकारवरील विश्वास कमी झालेला नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले. जळगाव आणि सांगली महापालिकेत भाजपानं दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयानंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सांगली आणि जळगावातील जनतेनं भाजपावर विश्वास दाखवला. त्याबद्दल आम्ही तेथील जनतेचे आभारी आहोत, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील मराठा मोर्चांवरही भाष्य केलं. 'सध्या राज्यात सर्वत्र मोर्चे निघत आहेत. मात्र हा प्रश्न आता निर्माण झालेला नाही, हे जनतेला माहित आहे. हा प्रश्न 40 ते 50 वर्ष जुना आहे, याची कल्पना जनतेला आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न भाजपा सरकार सोडवेल, असा विश्वास राज्यातील जनतेला आहे,' असं फडणवीस म्हणाले. जनतेनं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विकास आणि विश्वासाच्या राजकारणावर विश्वास दाखवला आहे. जनतेनं दाखवलेला हा विश्वास आम्ही सार्थ ठरवू, अशी हमी मुख्यमंत्र्यांनी दिली. 

टॅग्स :Sangli Electionसांगली महानगरपालिका निवडणूकJalgaon Electionजळगाव महानगरपालिका निवडणूकBJPभाजपाMaratha Reservationमराठा आरक्षणMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस