शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
2
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
3
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
4
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
5
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
6
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
7
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
8
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
9
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
10
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
11
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
12
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
13
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
14
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
15
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
17
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
18
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
20
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

पूरग्रस्त स्थितीतून बाहेर यायला वेळ लागेल, भंपकपणा सोडून निवडणूका पुढे ढकला : ना. धों. महानोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2019 11:58 IST

सध्या सत्ता तुमचीच आहे. मग, निवडणूक पुढे ढकलली तर कोणाचे काय जाणार आहे..

ठळक मुद्देनारायण सुर्वे जीवनगौरव पुरस्कार प्रदान‘चार कविता कमी लिहिल्या तरी चालेल, पण सुर्वेसारखे जगण्याचा प्रयत्न करेन.

पुणे : पूरग्रस्त परिस्थितीतून बाहेर पडून सगळे नव्याने उभे करायला किमान पाच-सहा वर्षे लागतील. अशावेळी भंपकपणा करून उपयोग नाही. कोटींचे आकडे बाजूला ठेवून प्रत्यक्ष काम करावे लागणार आहे. सध्या सत्ता तुमचीच आहे. मग, निवडणूक पुढे ढकलली तर कोणाचे काय जाणार आहे, असा सवाल उपस्थित करत ज्येष्ठ कवी ना.धों.महानोर यांनी सरकारवर निशाणा साधला. निवडणुकीची आचारसंहिता लागली की कामात अडचणी येतात. त्यामुळे निवडणुका किमान दोन-तीन महिने पुढे ढकला, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. 
महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभेतर्फे आयोजित कार्यक्रमात रविवारी एस.एम.जोशी सभागृह येथे ज्येष्ठ कवी ना.धों. महानोर यांना नारायण सुर्वे जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. कविवर्य पद्मश्री नारायण सुर्वे स्मृतीदिन समारंभ आणि पुरस्कार प्रदान सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर तर अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोतापल्ले उपस्थित होते.
निवृत्त सनदी अधिकारी चंद्रकांत दळवी यांना नारायण सुर्वे भला माणूस पुरस्कार, ज्येष्ठ साहित्यिक राजन खान यांना नारायण सुर्वे साहित्य पुरस्कार, अखिल भारतीय मराठी नाटय परिषद पिंपरी-चिंचवडचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांना नारायण सुर्वे स्नेहबंध पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी निवृत्त विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. विठ्ठल जाधव, तसेच सूर्यदत्ता ग्रूप ऑफ इन्स्टिटयूटचे डॉ. संजय चोरडिया यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
महानोर म्हणाले, ‘चार कविता कमी लिहिल्या तरी चालेल, पण सुर्वेसारखे जगण्याचा प्रयत्न करेन. १९५६ संयुक्त महाराष्ट्राची निवडणुकीच्या दरम्यान शाहीर अमर शेख यांच्या माध्यमातून मला नारायण सुर्वे पहिल्यांदा भेटले. त्या निवडणुकीतील एक पान अमर शेख आणि नारायण सुर्वे यांचे आहे. सुर्वेंनी जगण्याचा, रोजीरोटीचा प्रश्न कवितेतून मांडला. घाम गाळणा-या दु:खी माणसाचा हुंकार त्यांनी ठोसपणे पहिल्यांदा मांडला.’ 
उद्धव कानडे यांनी सूत्रसंचालन केले. सचिन इटकर यांनी प्रास्ताविक केले. 
--------------
काय म्हणाले महानोर?
- १९५६ च्या संयुक्त महाराष्ट्राच्या निवणुकीमध्ये सभा, संमेलने रंगत होती, दिग्गजांची उपस्थिती असायची. एका सभेला जवाहरलाल नेहरु स्वत: उपस्थित होते. त्यांनी रशिया, चीनसंबंधी आंतरराष्ट्रीय प्रश्न, भाक्रानांगल याबाबत भाष्य केले. त्यावेळी समाजवादी पक्षातर्फे कोणी निवडणूक लढवायला तयार नव्हते. एका तरुणाला काँग्रेसविरोधात उभे करण्यात आले. शाहीर अमर शेख यांनी सुर्वेंच्या कवितेच्या माध्यमातून निवडणुकीच्या प्रचारात वास्तव मांडले. त्यावेळी भाकरी महत्वाची की भाक्रानांगल, असा सवाल उपस्थित करण्यात आला.
- मला उजवा-डावा असा भेद समजतच नाही. तुकारामालाही त्यातील काही समजत नव्हते. त्यांनी केवळ प्रेमाची शिकवण दिली. समाजाच्या भल्याचा विचार केला. डावे-उजवे असे मतभेद नक्की असतील. पण देशात इतिहास घडवणारा माणूस म्हणून नेहरुंचा मोठेपणा विसरता येणार नाही. राजकारणात तारतम्य बाळगून कसे चालले पाहिजे, हे त्या काळातील लोकांकडून आजच्या राजकारण्यांनी समजून घेतले पाहिज.े
- भ्रष्टाचार ना करेंगे, ना करने देंगे हे कोणत्या आत्मविश्वासाने बोलले जाते? महाराष्ट्र आणि देशात अजूनही भ्रष्टाचार राजरोसपणे सुरू आहे.
- काँग्रेसच्या विरोधात उभे राहायला तेव्हा माणसेच मिळत नव्हती. परिस्थिती कशी बदलते, ते आता कळते आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.
- राजकारण्यांना लाजवेल असे राजकारण आमचे साहित्यिक करतात. निवडणुकीत एकगठ्ठा मते, मतांची पळवापळवी हे लाजिरवाणे होते. कविता, साहित्यासाठी आयुष्य वेचलेले दिग्गजही संमेलनाध्यक्षाच्या निवडणुकीत पडले. यातून काय साध्य झाले? साहित्य संमेलनाबद्दल न बोललेलेच बरे.

टॅग्स :PuneपुणेGovernmentसरकारfloodपूरElectionनिवडणूकDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस