शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

अमित शाहांसोबत चर्चा करायला शरद पवारांनीच सांगितलं होतं; अजित पवारांचा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2024 11:58 IST

अनेकदा तुम्ही आमच्यासोबत यायला तयार होता, त्यानंतर भूमिका बदलता. तुमची भूमिका ठाम नसते असं अमित शाहांनी म्हटलं.

पुणे - Ajit Pawar on Sharad Pawar ( Marathi News ) अनेकदा शरद पवार हे भाजपासोबत जाण्यास तयार होते, अमित शाहांसोबत चर्चा करायला पवारांनीच सांगितले असा गौप्यस्फोट अजित पवार यांनी केला आहे. त्याचसोबत बारामतीतील जनतेनं विकासासाठी साथ द्यावी असं आवाहनही त्यांनी केले. 

अजित पवार म्हणाले की, जेव्हा राज्यात उद्धव ठाकरेंचं सरकार पडलं, तेव्हा माझ्याच चेंबरमध्ये सर्व विधानसभा, विधान परिषदेच्या आमदारांनी आपल्याला सरकारमध्ये गेले पाहिजे असं पत्र सह्या करून शरद पवारांना दिले. त्यात एकही जण मागे नव्हता. जयंत पाटील, रोहित पवार, जितेंद्र आव्हाड, राजेश टोपे यांचीही सही होती. टोपेच पत्र घेऊन गेले होते. मतदारसंघातील कामे आता सुरू झाली, २ वर्ष कोरोनामुळे अडचणीत गेली. लोकांची कामे व्हावी या भूमिकेतून हा निर्णय घेतला होता. त्यानंतर शरद पवार साहेबांनी मला, प्रफुल पटेल आणि जयंत पाटील यांना अमित शाह यांच्याशी चर्चा करा असं सांगितले. आम्ही जायला निघालो होतो, त्यानंतर साहेबांनी तिथे जाऊ नका, इथूनच फोनवरून चर्चा करा म्हटलं. त्यावर अमित शाह यांनी अशी महत्त्वाची चर्चा फोनवर होत नाही, तुमचा पाठिमागचा अनुभव पाहता अनेकदा तुम्ही आमच्यासोबत यायला तयार होता, त्यानंतर भूमिका बदलता. तुमची भूमिका ठाम नसते. त्यामुळे तुमच्यासोबत फोनवर बोलण्याची विश्वासार्हता नाही. तुम्ही समोर या, भेटून बोलू, मी फोनवर बोलणार नाही असं अमित शाहांनी स्पष्ट सांगितले. 

तसेच शिवसेनेला बाहेर काढून आम्हाला सोबत घ्या अशी अट २०१७ मध्ये होती. परंतु भाजपाने शिवसेना इतकी वर्ष आमच्यासोबत आहे. त्यांना बाहेर काढणार नाही असं ठाम सांगितले. त्यानंतर २०१९ ला अशाप्रकारचा प्रयोग झाला. आम्ही केंद्रात कुणाच्या संपर्कात नव्हतो. केवळ शरद पवार, प्रफुल पटेल हेच केंद्रातील नेत्यांच्या संपर्कात होते असंही अजित पवारांनी म्हटलं.  एबीपीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. 

दरम्यान, राजकारणात भावनिकपणा बाजूला ठेवावे लागते. बारामतीची जनतेचा मिश्र प्रतिसाद आहे. मी माझ्यापरीने पटवून देण्याचा प्रयत्न करतोय. आपल्याला अधिकचा विकास हवा असेल तर राज्य आणि केंद्र सरकार एकत्र आले तर बारामती लोकसभा मतदारसंघाच्या फायद्याचे होईल. जोपर्यंत सर्वसामान्य मतदार माझ्या पाठिशी उभा आहे तोपर्यंत कुठल्याही राजकीय नेत्याची कारकिर्दी संपत नाही. मी जी गोष्ट हाती घेतो, ती तडीस नेतो. आजपर्यंत मी कुणाचे नुकसान केले नाही. मी माझे ध्येर्य ठरवून पुढे वाटचाल करत आहे. मी राजकीय भूमिका घेतली, त्यावर ठाम आहे. वडिलधाऱ्यांनी आशीर्वाद द्यावेत, लोकांनी आणि मतदारांनी साथ द्यावी असं अजित पवारांनी सांगितले. 

राजकारणात अनेक चढउतार पाहिलेत 

१९९१ पासून स्वत: उमेदवार या नात्याने वेगवेगळ्या निवडणूक लढवल्या आहेत. राजकारणात अनेक चढउतार पाहिलेत. मला निवडणुका नवीन नाही. माझ्यासमोर कुणीही उभं असलं तरी समोरचा उमेदवार तुल्यबळ आहे असं समजून प्रचाराची रणनीती आखतो. बारामती हा माझा मतदारसंघ आहे. आम्ही आमच्यापरीनं प्रयत्न करतोय. ही लढाई भावकी आणि गावकीची नाही. ही लढाई देशाचं भवितव्य ठरवणारी, उद्याचा कारभार कुणाच्या हातात द्यायचा अशी ही लढाई आहे. लोकांनी एकीकडे नरेंद्र मोदी आणि दुसरीकडे राहुल गांधी असं पाहायचं आहे. भावनिक बनून मतदान करू नका. सत्ताधारी विचाराचा खासदार केंद्रात गेला तर कामे अधिक होतात. विरोधात असले तर सगळ्या गोष्टींना विरोध करायचा, त्यातून मतदारसंघातील कामे थांबतात. केंद्रातून येणारा निधी मोठ्या प्रमाणात खर्च होत नाही असं अजित पवारांनी म्हटलं.  

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवारAmit Shahअमित शाहBJPभाजपाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४baramati-pcबारामती