शहरं
Join us  
Trending Stories
1
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
2
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
3
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
4
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
5
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
6
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
7
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
8
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
9
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
10
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
11
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
12
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
13
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
14
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
15
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
16
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
17
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
18
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
19
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
20
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)

अमित शाहांसोबत चर्चा करायला शरद पवारांनीच सांगितलं होतं; अजित पवारांचा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2024 11:58 IST

अनेकदा तुम्ही आमच्यासोबत यायला तयार होता, त्यानंतर भूमिका बदलता. तुमची भूमिका ठाम नसते असं अमित शाहांनी म्हटलं.

पुणे - Ajit Pawar on Sharad Pawar ( Marathi News ) अनेकदा शरद पवार हे भाजपासोबत जाण्यास तयार होते, अमित शाहांसोबत चर्चा करायला पवारांनीच सांगितले असा गौप्यस्फोट अजित पवार यांनी केला आहे. त्याचसोबत बारामतीतील जनतेनं विकासासाठी साथ द्यावी असं आवाहनही त्यांनी केले. 

अजित पवार म्हणाले की, जेव्हा राज्यात उद्धव ठाकरेंचं सरकार पडलं, तेव्हा माझ्याच चेंबरमध्ये सर्व विधानसभा, विधान परिषदेच्या आमदारांनी आपल्याला सरकारमध्ये गेले पाहिजे असं पत्र सह्या करून शरद पवारांना दिले. त्यात एकही जण मागे नव्हता. जयंत पाटील, रोहित पवार, जितेंद्र आव्हाड, राजेश टोपे यांचीही सही होती. टोपेच पत्र घेऊन गेले होते. मतदारसंघातील कामे आता सुरू झाली, २ वर्ष कोरोनामुळे अडचणीत गेली. लोकांची कामे व्हावी या भूमिकेतून हा निर्णय घेतला होता. त्यानंतर शरद पवार साहेबांनी मला, प्रफुल पटेल आणि जयंत पाटील यांना अमित शाह यांच्याशी चर्चा करा असं सांगितले. आम्ही जायला निघालो होतो, त्यानंतर साहेबांनी तिथे जाऊ नका, इथूनच फोनवरून चर्चा करा म्हटलं. त्यावर अमित शाह यांनी अशी महत्त्वाची चर्चा फोनवर होत नाही, तुमचा पाठिमागचा अनुभव पाहता अनेकदा तुम्ही आमच्यासोबत यायला तयार होता, त्यानंतर भूमिका बदलता. तुमची भूमिका ठाम नसते. त्यामुळे तुमच्यासोबत फोनवर बोलण्याची विश्वासार्हता नाही. तुम्ही समोर या, भेटून बोलू, मी फोनवर बोलणार नाही असं अमित शाहांनी स्पष्ट सांगितले. 

तसेच शिवसेनेला बाहेर काढून आम्हाला सोबत घ्या अशी अट २०१७ मध्ये होती. परंतु भाजपाने शिवसेना इतकी वर्ष आमच्यासोबत आहे. त्यांना बाहेर काढणार नाही असं ठाम सांगितले. त्यानंतर २०१९ ला अशाप्रकारचा प्रयोग झाला. आम्ही केंद्रात कुणाच्या संपर्कात नव्हतो. केवळ शरद पवार, प्रफुल पटेल हेच केंद्रातील नेत्यांच्या संपर्कात होते असंही अजित पवारांनी म्हटलं.  एबीपीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. 

दरम्यान, राजकारणात भावनिकपणा बाजूला ठेवावे लागते. बारामतीची जनतेचा मिश्र प्रतिसाद आहे. मी माझ्यापरीने पटवून देण्याचा प्रयत्न करतोय. आपल्याला अधिकचा विकास हवा असेल तर राज्य आणि केंद्र सरकार एकत्र आले तर बारामती लोकसभा मतदारसंघाच्या फायद्याचे होईल. जोपर्यंत सर्वसामान्य मतदार माझ्या पाठिशी उभा आहे तोपर्यंत कुठल्याही राजकीय नेत्याची कारकिर्दी संपत नाही. मी जी गोष्ट हाती घेतो, ती तडीस नेतो. आजपर्यंत मी कुणाचे नुकसान केले नाही. मी माझे ध्येर्य ठरवून पुढे वाटचाल करत आहे. मी राजकीय भूमिका घेतली, त्यावर ठाम आहे. वडिलधाऱ्यांनी आशीर्वाद द्यावेत, लोकांनी आणि मतदारांनी साथ द्यावी असं अजित पवारांनी सांगितले. 

राजकारणात अनेक चढउतार पाहिलेत 

१९९१ पासून स्वत: उमेदवार या नात्याने वेगवेगळ्या निवडणूक लढवल्या आहेत. राजकारणात अनेक चढउतार पाहिलेत. मला निवडणुका नवीन नाही. माझ्यासमोर कुणीही उभं असलं तरी समोरचा उमेदवार तुल्यबळ आहे असं समजून प्रचाराची रणनीती आखतो. बारामती हा माझा मतदारसंघ आहे. आम्ही आमच्यापरीनं प्रयत्न करतोय. ही लढाई भावकी आणि गावकीची नाही. ही लढाई देशाचं भवितव्य ठरवणारी, उद्याचा कारभार कुणाच्या हातात द्यायचा अशी ही लढाई आहे. लोकांनी एकीकडे नरेंद्र मोदी आणि दुसरीकडे राहुल गांधी असं पाहायचं आहे. भावनिक बनून मतदान करू नका. सत्ताधारी विचाराचा खासदार केंद्रात गेला तर कामे अधिक होतात. विरोधात असले तर सगळ्या गोष्टींना विरोध करायचा, त्यातून मतदारसंघातील कामे थांबतात. केंद्रातून येणारा निधी मोठ्या प्रमाणात खर्च होत नाही असं अजित पवारांनी म्हटलं.  

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवारAmit Shahअमित शाहBJPभाजपाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४baramati-pcबारामती