शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
6
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
7
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
8
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
9
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
10
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
11
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
12
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
13
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
14
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
15
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
16
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
17
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
18
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
19
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
20
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज

अमित शाहांसोबत चर्चा करायला शरद पवारांनीच सांगितलं होतं; अजित पवारांचा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2024 11:58 IST

अनेकदा तुम्ही आमच्यासोबत यायला तयार होता, त्यानंतर भूमिका बदलता. तुमची भूमिका ठाम नसते असं अमित शाहांनी म्हटलं.

पुणे - Ajit Pawar on Sharad Pawar ( Marathi News ) अनेकदा शरद पवार हे भाजपासोबत जाण्यास तयार होते, अमित शाहांसोबत चर्चा करायला पवारांनीच सांगितले असा गौप्यस्फोट अजित पवार यांनी केला आहे. त्याचसोबत बारामतीतील जनतेनं विकासासाठी साथ द्यावी असं आवाहनही त्यांनी केले. 

अजित पवार म्हणाले की, जेव्हा राज्यात उद्धव ठाकरेंचं सरकार पडलं, तेव्हा माझ्याच चेंबरमध्ये सर्व विधानसभा, विधान परिषदेच्या आमदारांनी आपल्याला सरकारमध्ये गेले पाहिजे असं पत्र सह्या करून शरद पवारांना दिले. त्यात एकही जण मागे नव्हता. जयंत पाटील, रोहित पवार, जितेंद्र आव्हाड, राजेश टोपे यांचीही सही होती. टोपेच पत्र घेऊन गेले होते. मतदारसंघातील कामे आता सुरू झाली, २ वर्ष कोरोनामुळे अडचणीत गेली. लोकांची कामे व्हावी या भूमिकेतून हा निर्णय घेतला होता. त्यानंतर शरद पवार साहेबांनी मला, प्रफुल पटेल आणि जयंत पाटील यांना अमित शाह यांच्याशी चर्चा करा असं सांगितले. आम्ही जायला निघालो होतो, त्यानंतर साहेबांनी तिथे जाऊ नका, इथूनच फोनवरून चर्चा करा म्हटलं. त्यावर अमित शाह यांनी अशी महत्त्वाची चर्चा फोनवर होत नाही, तुमचा पाठिमागचा अनुभव पाहता अनेकदा तुम्ही आमच्यासोबत यायला तयार होता, त्यानंतर भूमिका बदलता. तुमची भूमिका ठाम नसते. त्यामुळे तुमच्यासोबत फोनवर बोलण्याची विश्वासार्हता नाही. तुम्ही समोर या, भेटून बोलू, मी फोनवर बोलणार नाही असं अमित शाहांनी स्पष्ट सांगितले. 

तसेच शिवसेनेला बाहेर काढून आम्हाला सोबत घ्या अशी अट २०१७ मध्ये होती. परंतु भाजपाने शिवसेना इतकी वर्ष आमच्यासोबत आहे. त्यांना बाहेर काढणार नाही असं ठाम सांगितले. त्यानंतर २०१९ ला अशाप्रकारचा प्रयोग झाला. आम्ही केंद्रात कुणाच्या संपर्कात नव्हतो. केवळ शरद पवार, प्रफुल पटेल हेच केंद्रातील नेत्यांच्या संपर्कात होते असंही अजित पवारांनी म्हटलं.  एबीपीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. 

दरम्यान, राजकारणात भावनिकपणा बाजूला ठेवावे लागते. बारामतीची जनतेचा मिश्र प्रतिसाद आहे. मी माझ्यापरीने पटवून देण्याचा प्रयत्न करतोय. आपल्याला अधिकचा विकास हवा असेल तर राज्य आणि केंद्र सरकार एकत्र आले तर बारामती लोकसभा मतदारसंघाच्या फायद्याचे होईल. जोपर्यंत सर्वसामान्य मतदार माझ्या पाठिशी उभा आहे तोपर्यंत कुठल्याही राजकीय नेत्याची कारकिर्दी संपत नाही. मी जी गोष्ट हाती घेतो, ती तडीस नेतो. आजपर्यंत मी कुणाचे नुकसान केले नाही. मी माझे ध्येर्य ठरवून पुढे वाटचाल करत आहे. मी राजकीय भूमिका घेतली, त्यावर ठाम आहे. वडिलधाऱ्यांनी आशीर्वाद द्यावेत, लोकांनी आणि मतदारांनी साथ द्यावी असं अजित पवारांनी सांगितले. 

राजकारणात अनेक चढउतार पाहिलेत 

१९९१ पासून स्वत: उमेदवार या नात्याने वेगवेगळ्या निवडणूक लढवल्या आहेत. राजकारणात अनेक चढउतार पाहिलेत. मला निवडणुका नवीन नाही. माझ्यासमोर कुणीही उभं असलं तरी समोरचा उमेदवार तुल्यबळ आहे असं समजून प्रचाराची रणनीती आखतो. बारामती हा माझा मतदारसंघ आहे. आम्ही आमच्यापरीनं प्रयत्न करतोय. ही लढाई भावकी आणि गावकीची नाही. ही लढाई देशाचं भवितव्य ठरवणारी, उद्याचा कारभार कुणाच्या हातात द्यायचा अशी ही लढाई आहे. लोकांनी एकीकडे नरेंद्र मोदी आणि दुसरीकडे राहुल गांधी असं पाहायचं आहे. भावनिक बनून मतदान करू नका. सत्ताधारी विचाराचा खासदार केंद्रात गेला तर कामे अधिक होतात. विरोधात असले तर सगळ्या गोष्टींना विरोध करायचा, त्यातून मतदारसंघातील कामे थांबतात. केंद्रातून येणारा निधी मोठ्या प्रमाणात खर्च होत नाही असं अजित पवारांनी म्हटलं.  

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवारAmit Shahअमित शाहBJPभाजपाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४baramati-pcबारामती