शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

...तर ‘मातोश्री’ हे जेल म्हणून घोषित करायचं ठरलं होतं; छगन भुजबळांनी सांगितलं बाळासाहेबांच्या अटकेवेळचं 'प्लॅनिंग'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2021 11:48 IST

राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर श्रीकृष्ण आयोगाची अंमलबजावणी करू असं आम्ही शिवाजी पार्कवर जाहीर केले होते.

ठळक मुद्देमी आमदार असताना मंडल कमिशनची अंमलबजावणी झाली पाहिजे यासाठी वसंतदादांच्या अंगावर आम्ही धावून जायचो. बाळासाहेब कुठल्याही आरक्षणाच्या विरोधात होते. पोटाला जात नाही असं बाळासाहेब नेहमी म्हणायचेमी आरक्षण मिळालंच पाहिजे या भूमिकेत मोर्चात होतो. तेव्हा राज्यात आरक्षणाचा वाद पेटला होता

मुंबई – बाळासाहेब ठाकरे(Balasaheb Thackeray) मराठी माणसांच्या नोकऱ्यांसाठी पुढे आले. शिवाजी पार्कच्या पहिल्याच भाषणात मी शिवसैनिक झालो. मुंबईत १५ शाखाप्रमुख झाले त्यातला मी एक होतो. माझे आईवडील नाहीत. बाळासाहेब आणि माँसाहेब यांना मी आई वडील मानायचो. शिवसेना एक कुटुंब आहे. या कुटुंबातील प्रमुख बाळासाहेब होते. बाळासाहेब कधी चिडलेले पाहिले नाहीत अशा आठवणी मंत्री छगन भुजबळांनी जागवल्या.

बाळासाहेबांच्या अटकेवेळी काय घडलं?

राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर श्रीकृष्ण आयोगाची अंमलबजावणी करू असं आम्ही शिवाजी पार्कवर जाहीर केले होते. १९९३च्या दंगलीनंतर हा आयोग नेमण्यात आला होता. मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना त्यांनी हा अहवाल फेटाळला होता. मनोहर जोशी, गोपीनाथ मुंडे सत्तेत होते तेव्हा शिवसेनेविरोधातील अनेक फाईल्स बंद केल्या होत्या. मी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री होतो. तेव्हा माझ्यासमोर फाईल आली. तेव्हा श्रीकृष्ण आयोगातील अनेक प्रकरणं आली होती. मी ज्या पदावर होतो तेव्हा मला ही कारवाई करावी लागली कारण श्रीकृष्ण आयोग आम्ही स्वीकारु असं आम्ही जाहीर केले होते. मला बाळासाहेबांना त्रास द्यायचा नव्हता. बाळासाहेबांना तुरुंगात न्यायचं नाही हे आमचं ठरलं होतं. त्यांनी जामीन मागितला तर जामीनला विरोधही करायचा नाही. पण कोर्टाने जामीन नाकारला तर मातोश्री जेल म्हणून जाहीर करायचं हे आम्ही ठरवलं होतं. गृहमंत्री असल्याने तसे अधिकार मला होते. एखाद्या वास्तूला जेल म्हणून जाहीर करू शकत होतो असं मंत्री छगन भुजबळांनी(Chhagan Bhujbal) गौप्यस्फोट केला. लोकमतला दिलेल्या फेस टू फेस मुलाखतीत छगन भुजबळांनी हे भाष्य केले आहे.

शिवसेना का सोडली?

शिवसेना(Shivsena) कधीही आरक्षणावर बोलत नव्हती. मी आमदार असताना मंडल कमिशनची अंमलबजावणी झाली पाहिजे यासाठी वसंतदादांच्या अंगावर आम्ही धावून जायचो. मंडल आयोग आम्ही स्वीकारतोय असं तत्कालीन सरकारने जाहीर केले. तेव्हा मी कौतुक करणारं होतो. यू. पी सिंग यांनी घेतलेल्या निर्णयाचं मी स्वागत केले. तेव्हा शिवसेनेत माझ्याविरोधात कुरबुरी सुरू झाली. बाळासाहेब आणि ठाकरे कुटुंब नाशिकच्या घरी आले होते. तिकडे भटक्या विमुक्तांचा मोर्चा निघाला. तेव्हा बाळासाहेब कुठल्याही आरक्षणाच्या विरोधात होते. पोटाला जात नाही असं बाळासाहेब नेहमी म्हणायचे. तेव्हा त्या बंगल्यावरून बाळासाहेब पत्रकार परिषद घेणार होते. आणि मी आरक्षण मिळालंच पाहिजे या भूमिकेत मोर्चात होतो. तेव्हा राज्यात आरक्षणाचा वाद पेटला होता. अनेक आमदार माझ्याकडे आले मंडल कमिशनसाठी लागू झालं पाहिजे असं त्यांनी मांडलं. ३६ आमदार माझ्यासोबत होते. त्यातील अनेक पळाले काही राहिले. शिवसेना सोडण्याचं कारण ठरलं. लोकसंग्रह वाढवणं हे त्याकाळी गरजेचे होते त्यामुळे शिवसेना-माझ्यात दुरावा निर्माण झाला. मी शिवसेना सोडली आणि समता परिषदेची स्थापना केली.

बाळासाहेब माझ्यावर प्रचंड चिडले होते

त्याकाळी एखाद्या नगरसेवकानेही शिवसेना सोडणं हे अत्यंत धोकादायक होतं. त्यात बाळासाहेबांचे माझ्यावर प्रेम होते त्यामुळे राग माझ्यावर प्रचंड होता. जे गेले ते गेले असं बाळासाहेब म्हणाले होते. ते फार चिडले होते. माझ्यासोबत आले होते त्यातील काही परतले. २५ वर्ष बाळासाहेबांनी मला जवळ केले होते. त्यानंतर रमाबाई आंबेडकर नगर येथे बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना झाली होती. तेव्हा सामनामध्ये छगन भुजबळ विटंबना करणारा नराधम अशी हेडिंग आली होती. त्यानंतर न्यायालयीन लढाईत मला क्लीनचीट मिळाली. त्यानंतर मी शिवसेनेविरोधात दावा दाखल केला. माझ्याकडे अनेक पुरावे होते. सुभाष देसाई, संजय राऊत माझ्याकडे आले तेव्हा मी मंत्री होतो. जेव्हा या केसची सुनावणी पूर्ण होत आली तेव्हा मी केस मागे घेतली. मी बाळासाहेबांची माफी मागितली. बाळासाहेबांनीही मोठ्या मनानं सगळं विसरून आम्हाला सहकुटुंब जेवायला बोलावलं. त्यानंतर कालांतराने हे सगळं विसरून आम्ही एकत्र आलो. आणि आता तर एकाच सरकारमध्ये काम करतोय असंही छगन भुजबळ म्हणाले.  

टॅग्स :Chhagan Bhujbalछगन भुजबळBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरेShiv SenaशिवसेनाPrisonतुरुंग