शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

भाजपाच्या ४८ जागा कमी करणं ही आपली जबाबदारी; प्रकाश आंबेडकरांचं लोकांना आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2024 12:00 IST

आपली सत्ता गेली आणि उद्या चौकशी झाली तर आपण जेलमध्ये जाऊ शकतो त्यामुळे ते लटलट कापायला लागलेत अशी टीका प्रकाश आंबेडकरांनी मोदींवर केली.

मुंबई  - लोकसभा निवडणुका लागणार आहेत. ४०० पार जागा निवडून आणणार आहोत अशी मोदींनी घोषणा केली आहे. आता या ४०० पैकी ४८ जागा या महाराष्ट्रात आहेत. या जागा कमी करणे ही आपली जबाबदारी आहे असं आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी लोकांना केलं आहे. 

मुंबई मुलुंड येथील लोकशाही गौरव महासभेत ते बोलत होते.प्रकाश आंबेडकर म्हणाले की, ४०० पैकी ४८ जागा कमी झाल्यानंतर ३५२ जागा राहतात. त्यामुळे ४८ जागा कमी करणे ही आपली जबाबदारी आहे. त्या ४८ जागा आपण कमी करूया. उद्या युती होईल की नाही हे डोक्यातून काढून टाका. झाली तर फार चांगली आणि नाही झाली तरी आपल्याला लढायचं आहे हे लक्षात असलं पाहिजे. जेवढ्या ताकदीने आपण उतरू. तेवढ्याच ताकदीने इतर पक्ष, समुह जो भाजपाच्या विरोधात आहे तो आपल्याला मदत केल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे युती झाली तर युतीत अन् नाही झाली तरी आपणच लढणार असंही त्यांनी सांगितले. 

त्याशिवाय मोदी असेल अथवा भाजपा यांना अंगावर आपणच घेतोय. इतरांचे फक्त खोके चाललेत, त्यापलीकडे काहीच चालले नाही. विचारांची लढाई ही आपण उभी करतोय. मोदी घराणेशाहीवर बोलतात. देशातील जनता हा माझा परिवार आहे असं सांगता, मग हे खरे असेल तर एकच गोष्ट त्यांनी करावी. निवडणूक प्रतिज्ञापत्रात तुम्ही लग्न झाल्याचं जाहीर केले आहे. त्यामुळे त्या महिलेले एक दिवस तरी पंतप्रधान निवासस्थानी ठेवा. मग तुम्ही १४० कोटी लोकांचा बाप आहात हे म्हणू. राजकीय घराणेशाहीवर मोदी बोलतात. पण समाजव्यवस्थेत घरातील जी व्यवस्था आहे. ती आपण पाळत नाही अशी टीका प्रकाश आंबेडकरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली. 

दरम्यान, जुनागड येथील बंदरात १९ हजार कोटींचा नार्कोटीक्सचा ड्रग्स साठा सापडला. ज्याचा मालक अफगाण दाखवला जो फाटका आहे. आपली सत्ता गेली आणि उद्या चौकशी झाली तर आपण जेलमध्ये जाऊ शकतो त्यामुळे ते लटलट कापायला लागलेत. महाराष्ट्राच्या राजकारणात भाजपाचा झेंडा दिसत नाही. भाजपाचं नाव दिसत नाही. सबकुछ मोदींच्या नावावर अशी परिस्थिती आहे. २०२४ च्या निवडणुकीत मोदी निवडून आले तर त्यांचे वागणे व्यापाऱ्यांच्या मागे ईडी,सीबीआय, पोलीस लावणे असं आहे. उद्या मुलुंडमधील व्यापाऱ्यांच्या घरावर धाडी पडल्याशिवाय राहणार नाही असा इशारा प्रकाश आंबेडकरांनी दिला.  

..तर राहुल गांधींना पुढे करू नका

काँग्रेसवाल्यांना सांगणं आहे, मोदींना अंगावर घ्यायचे असेल तर राहुल गांधींना पुढे करू नका. प्रियंका गांधींना पुढे करा. ती बरोबर त्याचे ४-५ वाजवत असते. मोदींची पोलखोल करणे हे महत्त्वाचे आहे असंही प्रकाश आंबेडकरांनी सांगितले. 

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Narendra Modiनरेंद्र मोदी