शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

भाजपाच्या ४८ जागा कमी करणं ही आपली जबाबदारी; प्रकाश आंबेडकरांचं लोकांना आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2024 12:00 IST

आपली सत्ता गेली आणि उद्या चौकशी झाली तर आपण जेलमध्ये जाऊ शकतो त्यामुळे ते लटलट कापायला लागलेत अशी टीका प्रकाश आंबेडकरांनी मोदींवर केली.

मुंबई  - लोकसभा निवडणुका लागणार आहेत. ४०० पार जागा निवडून आणणार आहोत अशी मोदींनी घोषणा केली आहे. आता या ४०० पैकी ४८ जागा या महाराष्ट्रात आहेत. या जागा कमी करणे ही आपली जबाबदारी आहे असं आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी लोकांना केलं आहे. 

मुंबई मुलुंड येथील लोकशाही गौरव महासभेत ते बोलत होते.प्रकाश आंबेडकर म्हणाले की, ४०० पैकी ४८ जागा कमी झाल्यानंतर ३५२ जागा राहतात. त्यामुळे ४८ जागा कमी करणे ही आपली जबाबदारी आहे. त्या ४८ जागा आपण कमी करूया. उद्या युती होईल की नाही हे डोक्यातून काढून टाका. झाली तर फार चांगली आणि नाही झाली तरी आपल्याला लढायचं आहे हे लक्षात असलं पाहिजे. जेवढ्या ताकदीने आपण उतरू. तेवढ्याच ताकदीने इतर पक्ष, समुह जो भाजपाच्या विरोधात आहे तो आपल्याला मदत केल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे युती झाली तर युतीत अन् नाही झाली तरी आपणच लढणार असंही त्यांनी सांगितले. 

त्याशिवाय मोदी असेल अथवा भाजपा यांना अंगावर आपणच घेतोय. इतरांचे फक्त खोके चाललेत, त्यापलीकडे काहीच चालले नाही. विचारांची लढाई ही आपण उभी करतोय. मोदी घराणेशाहीवर बोलतात. देशातील जनता हा माझा परिवार आहे असं सांगता, मग हे खरे असेल तर एकच गोष्ट त्यांनी करावी. निवडणूक प्रतिज्ञापत्रात तुम्ही लग्न झाल्याचं जाहीर केले आहे. त्यामुळे त्या महिलेले एक दिवस तरी पंतप्रधान निवासस्थानी ठेवा. मग तुम्ही १४० कोटी लोकांचा बाप आहात हे म्हणू. राजकीय घराणेशाहीवर मोदी बोलतात. पण समाजव्यवस्थेत घरातील जी व्यवस्था आहे. ती आपण पाळत नाही अशी टीका प्रकाश आंबेडकरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली. 

दरम्यान, जुनागड येथील बंदरात १९ हजार कोटींचा नार्कोटीक्सचा ड्रग्स साठा सापडला. ज्याचा मालक अफगाण दाखवला जो फाटका आहे. आपली सत्ता गेली आणि उद्या चौकशी झाली तर आपण जेलमध्ये जाऊ शकतो त्यामुळे ते लटलट कापायला लागलेत. महाराष्ट्राच्या राजकारणात भाजपाचा झेंडा दिसत नाही. भाजपाचं नाव दिसत नाही. सबकुछ मोदींच्या नावावर अशी परिस्थिती आहे. २०२४ च्या निवडणुकीत मोदी निवडून आले तर त्यांचे वागणे व्यापाऱ्यांच्या मागे ईडी,सीबीआय, पोलीस लावणे असं आहे. उद्या मुलुंडमधील व्यापाऱ्यांच्या घरावर धाडी पडल्याशिवाय राहणार नाही असा इशारा प्रकाश आंबेडकरांनी दिला.  

..तर राहुल गांधींना पुढे करू नका

काँग्रेसवाल्यांना सांगणं आहे, मोदींना अंगावर घ्यायचे असेल तर राहुल गांधींना पुढे करू नका. प्रियंका गांधींना पुढे करा. ती बरोबर त्याचे ४-५ वाजवत असते. मोदींची पोलखोल करणे हे महत्त्वाचे आहे असंही प्रकाश आंबेडकरांनी सांगितले. 

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Narendra Modiनरेंद्र मोदी