शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

शरद पवार, उद्धव ठाकरे ओबीसींसोबत नाहीत हे स्पष्ट झालं; प्रकाश आंबेडकरांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2024 12:18 IST

मराठा-ओबीसी आरक्षण वादावरून वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी ठाकरे-पवारांवर आरोप केलेत. 

पुणे - शरद पवारांच्या राष्ट्रवादीने, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने ते ओबीसींसोबत नाहीत ही भूमिका स्पष्ट केलीय. ओबीसींचे किमान १०० आमदार विधानसभेत निवडून यायला हवेत अन्यथा ओबीसी आरक्षण धोक्यात आहे असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. 

पुण्यात पत्रकारांशी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, शरद पवार हे जरांगे पाटील यांच्यासोबत आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळालं पाहिजे या जरांगेंच्या मागणीला पवारांचा पूर्णपणे पाठिंबा आहे. त्यासाठी ते प्रयत्नशील आहे. विधानसभेच्या निवडणुकीनंतर ते प्रयत्न करतील. ओबीसीचे आरक्षण ज्या तत्वांवर सुप्रीम कोर्टात थांबवण्यात आले आहे. महाराष्ट्रातील ओबीसी इम्पिरियल डेटा नसल्याने शिक्षण, नोकरीतील ओबीसी आरक्षणाला स्थगिती विधानसभेच्या माध्यमातून देतील असा आमचा अंदाज आहे असं त्यांनी सांगितले. 

त्याशिवाय आरक्षण वाचवायचं आहे का हे ओबीसींनी ठरवले पाहिजे. जर आरक्षण वाचवायचे असेल तर किमान १०० ओबीसी आमदार या विधानसभेत निवडून आले पाहिजेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादीने, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने ते ओबीसींसोबत नाहीत ही भूमिका स्पष्ट केलीय. मध्यंतरी उद्धव ठाकरेंनी मराठ्यांना केंद्राकडून टक्केवारी वाढवून घ्या आणि ओबीसीतून आरक्षण मिळवा असं म्हटलं होते. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नये ही ओबीसींची मागणी त्यांना मान्य नाही. वंचित बहुजन आघाडी ओबीसींसोबत आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नये या मागणीला आमचा पूर्ण पाठिंबा आहे असं प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केले. 

एन्काउंटर प्रकरणी सरकारने खुलासा करावा

दरम्यान, बदलापूर प्रकरणातील आरोपीनं बंदूक हिसकावली, ३ गोळ्या झाडल्या त्यात एक पोलीस जखमी झाल्याची माहिती आहे. संशयाचं वातवरण दूर करण्यासाठी शासनाने ज्या पोलिसाला गोळीबार केला त्याचा मेडिकल रिपोर्ट सार्वजनिक करावा. जेणेकरून मांडीला गोळी लागली म्हणजे नेमकं कुठे लागली हे समोर आणावे. त्यातून या एन्काउंटरबाबत जे काही चर्चा, संशयास्पद गोष्टी समोर येतायेत, त्याला पूर्णविराम लागेल. नेमकं आरोपीला कुठे घेऊन जात होते, याचाही खुलासा पोलिसांकडून किंवा शासनाकडून आला पाहिजे. जर खुलासा केला नाही तर कुणाला तरी वाचवण्यासाठी शासनाने हा बळी दिलाय का असं लोकांना वाटेल. त्यामुळे संशयाच्या भोवऱ्यात न अडकता शासनाने वस्तूस्थिती मांडावी अशी मागणी प्रकाश आंबेडकरांनी सरकारकडे केली. 

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरOBC Reservationओबीसी आरक्षणMaratha Reservationमराठा आरक्षणSharad Pawarशरद पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरेManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील