शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली कॅपिटल्स जिंकले, राजस्थान रॉयल्सचे प्ले ऑफचे तिकीट पक्के झाले! गणित बिघडले
2
Rakhi Sawant : राखी सावंतची प्रकृती बिघडली, रुग्णालयातील फोटो व्हायरल, नेमकं काय झालंय?
3
जगातील कोणतीही शक्ती CAA ला रोखू शकत नाही; अमित शाहंचा TMC-काँग्रेसवर हल्लाबोल
4
छत्रपतींचा अपमान करणाऱ्या महाराष्ट्रद्रोह्यांना मराठी माणूस धडा शिकवेल; काँग्रेसची घणाघाती टीका
5
PM Modi Property in Affidavit, Lok Sabha Election 2024: वाराणसीतून पंतप्रधान मोदी यांनी भरला उमेदवारी अर्ज... पाहा त्यांची प्रॉपर्टी किती? शिक्षण किती?
6
इस्रायलच्या अडचणी वाढणार? आंतरराष्ट्रीय न्यायालयात होणार सुनावणी
7
पेटीएमवर UPI Lite Wallet कसे अ‍ॅक्टिव्हेट करायचे? जाणून घ्या प्रोसेस...
8
"गेल्या १० वर्षात देशाची प्रगती, आता भारताला कुणीच..."; रश्मिका मंदानानं केलं मुंबईच्या 'अटल सेतू'चं कौतुक!
9
KL Rahul चा अफलातून झेल पाहून संजीव गोएंका खूश झाले; टाळ्या वाजवताना दिसले, Video
10
Kangana Ranaut : 7 किलो सोनं, 60 किलो चांदी, 50 LIC पॉलिसी...; कोट्यवधींची मालकीण आहे कंगना राणौत
11
राहुल द्रविडनंतर BCCI मुख्य प्रशिक्षक म्हणून CSK च्या ताफ्यातील प्रमुख व्यक्तीचा करतेय विचार 
12
घाटकोपर होर्डिंगप्रकरणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अंबादास दानवेंची मागणी
13
34 हजार कोटींचा बँक घोटाळा; DHFL चा माजी संचालक धीरज वाधवानला CBI ने घेतले ताब्यात
14
अजितदादा आणखी ५-६ दिवस थांबले असते तर शरद पवार 'तो' निर्णय घेणार होते; पाटलांचा खुलासा
15
VIP चोराची अजब कहाणी! वर्षभरात 200वेळा विमानप्रवास; फ्लाईटमधून कोट्यवधींचे दागिने लंपास
16
'कल्याणमध्ये ठाकरेसेना-शिंदेंसेनेची नुरा कुस्ती, निवडणुकीनंतर मोदी आणि ठाकरे एकत्र येतील', प्रकाश आंबेडकर यांचा दावा
17
आधी झापलं, मग जेवायला घरी बोलावलं! Sanjiv Goenka यांची लोकेश राहुलला झप्पी
18
"अग्निवीर योजना फाडून कचऱ्यात फेकून देऊ", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल 
19
'चंदा लो, धंदा दो' या महायुतीच्या धोरणामुळेच झाली होर्डिंग दुर्घटना; विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र
20
Arvind Kejriwal : "तुम्ही कमळाचं बटण दाबलंत तर मला पुन्हा जेलमध्ये जावं लागेल पण जर..."

मराठा समाजानं OBC ऐवजी EWS मधून आरक्षण घेणं फायदेशीर, प्रवीण गायकवाड यांचा सल्ला 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2023 7:46 PM

Maratha Reservation : आरक्षणाबाबत आपलं मत मांडताना प्रवीण गायकवाड म्हणाले की, मराठा समाजानं ओबीसीऐवजी ईडब्ल्यूएसमधून आरक्षण घेतलं तर ते अधिक फायदेशीर ठरेल.

गेल्या काही दिवसांमध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा अधिक तीव्र झाला आहे. त्यातच मराठा आरक्षणासाठी आक्रमक असलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी कोट्यातून आरक्षण द्यावे, अशी मागणी केली आहे. जरांगे पाटील यांनी केलेल्या या मागणीवरून राज्यात मराठा आरक्षण समर्थक विरुद्ध ओबीसी आरक्षण समर्थक असा संघर्ष उभा राहण्याची शक्यता आहे. या दरम्यान, संभाजी बिग्रेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी मराठा समाजाला महत्त्वाचा सल्ला दिला आहे.  

आरक्षणाबाबत आपलं मत मांडताना प्रवीण गायकवाड म्हणाले की, मराठा समाजानं ओबीसीऐवजी ईडब्ल्यूएसमधून आरक्षण घेतलं तर ते अधिक फायदेशीर ठरेल. ओबीसी आरक्षणापैकी १८ ते १९ टक्के वाटा हा कुणबी समाज घेतो. मराठा समाज ओबीसी आरक्षणामध्ये आल्यास मराठ्यांना खूप कमी वाटा मिळेल. त्यामुळे आर्थिक निकषावर मिळणाऱ्या १० टक्के आरक्षणापैकी आठ ते साडे आठ टक्के वाटा मराठा समाजाला मिळू शकतं, असं दिसत आहे, असे निरीक्षण गायकवाड यांनी नोंदवलं. गायकवाड यांनी दिलेल्या सल्ल्यामुळे एका नव्या चर्चेला तोंड फुटण्याची शक्यता आहे. गेल्या काही काळात वाढलेली आर्थिक असमानता हे आरक्षणाच्या मागणीमागचं मूळ कारण आहे. त्यामुळे सरकारने धोरणात बदल करण्याची गरज आहे, असं मत प्रवीण गायकवाड यांनी मांडलं आहे. 

दरम्यान, आज मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार आणि मनोज जरांगे पाटील हे आमने सामने आलेले दिसले. मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण देण्यास वडेट्टीवार यांनी विरोध केला. ते म्हणाले की,  जरांगे पाटलांच्या म्हणण्यावर सर्व काही ठरवू नये, अभ्यास करुन तरुणांनी निर्णय घ्यावा, असं आवाहन वड्डेटीवार यांनी केलं. ज्या ठिकाणी नोकऱ्यांचा आणि सोयी, सवलती यांचा संदर्भ येतो तिथे मोठं नुकसान होणार आहे. अशा परिस्थीतीत मराठा तरुणांनी अभ्यास करुन आपण कोणाला साथ देत आहोत. आपलं भलं काय आहे याचा विचार करावा, असा सल्लाही वड्डेटीवार यांनी दिला होता. 

त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनीही वडेट्टीवार यांना प्रत्युत्तर दिले होते. विरोधी पक्षनेता आणि विधिमंडळ हे न्यायमंदिर आहे. आता त्यांना स्वत:च्या जातीविषयी गर्व झालाय, असा घटनेतला विरोधी पक्षनेता असतो का? सरकारनं न्याय दिला नाही तर विरोधी पक्षनेता प्रचंड मोठा आवाज उठवतो आणि सरकारला झुकवतो. तुमचे विचार कसे पाहिजे, राहुल गांधींनी हे शिकवले का? मराठ्यांविरोधात आवाज उचलतो, त्यासाठी राहुल गांधींनी पद दिलंय का असा घणाघात मनोज जरांगे पाटील यांनी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यावर केला.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणpravin gaikwadप्रवीण गायकवाडOBC Reservationओबीसी आरक्षणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील