शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

कर्जमाफीच्या निर्णायावर एकनाथ खडसे म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2019 4:13 PM

कर्जमाफीच्या निर्णयाने शेतकऱ्यांचं पूर्णपणे समाधान होणार नसलं तरीही दोन लाख रुपयापर्यंत कर्जमाफीचा हा निर्णय स्वागतार्ह असल्याचं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी शेतकरी कर्जमाफीची मोठी घोषणा केली. यानुसार राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याची 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी होणार आहे. मात्र उद्धव ठाकरेंनी जाहीर केलेल्या कर्जमाफीबाबत भाजपच्या नेत्यांनी सरकारवर टीका केली. परंतु भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी मात्र या निर्णयाचं स्वागत केलं आहे.

कर्जमाफीच्या निर्णयावर बोलताना खडसे म्हणाले की, ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीच्या सरकारने नुकतीच शेतकऱ्यांसाठी दिलेल्या कर्जमाफीचे निकष अजून निश्चित झालेले नाहीत. त्यामुळे त्यावर प्रतिक्रिया देणे उचित नसल्याचे खडसे म्हणाले. मात्र त्याचवेळी खडसेंनी या निर्णयाचं स्वागतही केलं आहे.

या कर्जमाफीच्या निर्णयाने शेतकऱ्यांचं पूर्णपणे समाधान होणार नसलं तरीही दोन लाख रुपयापर्यंत कर्जमाफीचा हा निर्णय स्वागतार्ह असल्याचं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे एकीकडे भाजप नेते सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीबाबत टीका करत असताना खडसे यांनी मात्र या निर्णयाचं स्वागत केलं आहे.

तसेच याचवेळी बोलताना त्यांनी पक्षांतर करणार असल्याच्या चर्चा पूर्णपणे चुकीच्या असल्याचे स्पष्ट केलं. तसेच भाजपने पाच दिवसात निर्णय घ्यावा अशी कोणतेही मागणी मी पक्षाला केली नाही. मी स्वता: पक्ष चालवलेला आहे त्यामुळे पाच दिवसात कोणताही पक्ष निर्णय घेऊ शकत नाही. असेही खडसे म्हणाले.