शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
4
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
5
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
6
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
7
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
8
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
9
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
10
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
11
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
12
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
13
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
14
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
15
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
16
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
17
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
18
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
19
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
20
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
Daily Top 2Weekly Top 5

माळीणमधील गूढ स्फोटाची चौकशी करणार : आर. आर. पाटील

By admin | Updated: August 2, 2014 23:17 IST

माळीण येथील दुर्घटना घडत असताना मोठा आवाज झाला होता़ स्फोटासारखा आवाज झाल्याची माहिती स्थानिक नागरिक व घटनेतील जखमींनी दिली आह़े

मंचर : माळीण येथील दुर्घटना घडत असताना मोठा आवाज झाला होता़ स्फोटासारखा आवाज झाल्याची माहिती स्थानिक नागरिक व घटनेतील जखमींनी दिली आह़े त्यामुळे यासंदर्भात तज्ज्ञामार्फत चौकशी केली जाईल, अशी माहिती गृहमंत्री आऱ आऱ पाटील यांनी आज दिली़
माळीण येथे पाटील यांनी भेट दिली़ त्यानंतर त्यांनी मंचर उपजिल्हा रुग्णालयात येऊन जखमींची विचारपूस केली़ पराग डेअरी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होत़े या वेळी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, शरद सहकारी बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा आदी उपस्थित होत़े 
माळीण येथील घटना घडली, त्या वेळी विजांचा कडकडाट होत होता, पाऊस जास्त होता़ तेथील नागरिकांशी चर्चा करताना त्यांनी मोठा आवाज झाल्याची माहिती दिली. उपजिल्हा रुग्णालयातील जखमींनी आवाज झाल्याच्या घटनेला दुजोरा दिला आह़े त्यामुळे आता तज्ज्ञांमार्फत खातरजमा करणार आह़े माती अथवा दगड कसे ढासळे याबाबत तज्ज्ञ शोध घेतील, हा आवाज कशाचा होता, स्फोट झाला का, याबाबत तपास करणार असल्याचे पाटील म्हणाल़े
पडकई योजनेबाबत होणा:या चर्चेमुळे स्थानिक नाराज आहेत, असे सांगून गृहमंत्री आऱ आऱ पाटील म्हणाले, येथील शेतक:यांना दोन वेळचा घास देणारी ही योजना आह़े मुळात ज्या भागात कडा कोसळला, तेथे पडकई नव्हती़  पडकई योजना आदिवासींसाठी वरदान असून ती बंद करू नका, अशी मागणी माळीण भेटीत आदिवासी बांधवांनी केल्याचे पाटील यांनी सांगितल़े  (वार्ताहर)
 
माळीण येथे आज भेट दिली, त्या वेळी शासन तसेच विविध स्वयंसेवी संस्था अधिकारी समन्वय ठेवून चांगले काम करीत असल्याचे दिसल़े 4क् टक्के काम पूर्ण झाले असून, रोगराई पसरू नये त्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत़ जखमींवर चांगले उपचार होत आहेत़
- आऱ आऱ पाटील, 
गृहमंत्री महाराष्ट्र राज्य
 
वारज्यातील घरांना भूस्खलनाचा धोका
 
4मोठय़ा प्रामाणात टेकडीफोड व डोंगरउतारावर (हिल स्लोप) बांधकामे झाल्याने वारजे भागातही माळीण गाव दुर्घटनेचे पुनरावृत्ती होऊ शकते, असा जाणकारारांचा अंदाज आहे. या भागात मुख्यत्वे तीन डोंगर (टेकड्या) आहेत. प्रभाग तीस मध्ये विठ्ठलनगर गोकूळनगर चा वरचा भाग, तसेच आकाशनगर कडून वर खाणी कडे जाणारे भाग (बीडीपी झोन) आणि तिसरा प्रभाग 31 मधील रामनगर वसाहतीचा काही भाग हा उंचवट्यावर आहे.
4प्रभाग 3क् मधील विठ्ठलनगर व गोकूळनगर हा संपूर्ण भाग बीडीपी त असुन या ठिकाणी परवानगी नसतानाही मोठ्या प्रमाणात घरे बांधली गेली आहेत. त्यासाठी जमीन समप्रमाणात घरून घेण्यासाठी मोठ्या प्रामाणात जेसीबी लाऊन जमिनीची खोदाई करण्यात आली आहे. 
 
पुनर्वसनाचा प्रश्न लवकरच मार्गी लावणार 
मंचर : वने व पुनर्वसन मंत्री पतंगराव कदम यांनी आज मंचर उपजिल्हा रुग्णालयात जाऊन माळीण दुर्घटनेतील जखमींची विचारपूस केली. स्थानिक ग्रामस्थांशी बोलून पुनर्वसनाचा प्रश्न लवकरच मार्गी लावणार असल्याचे त्यांनी सांगितले. घरे तसेच संसारोपयोगी साहित्य दिले जाणार आहे. 
मंचर उपजिल्हा रुग्णालयात माळीण दुर्घटनेत वाचलेल्या सहा जखमींवर उपचार सुरु आहेत. पतंगराव कदम यांनी त्यांची भेट घेतली व या घटनेविषयी जाणून घेतले. पत्रकारांशी बोलताना कदम म्हणाले, ‘‘माळीण येथे प्रशासनाने युद्धपातळीवर काम सुरु ठेवले आहे. पावसाचा अडथळा आला नाही तर दोन दिवसांत काम संपेल अन्यथा 4 ते 5 दिवस लागतील. सरकारी यंत्रणा व स्वयंसेवी संस्था यांच्याकडून वाचलेल्या लोकांना भोजन व इतर व्यवस्था करण्यात आली आहे. (वार्ताहर)
 
4ग्रामस्थांशी बोलून या भागातील नागरिकांचे पुनर्वसन केले जाईल, असे सांगून कदम म्हणाले, ‘‘घर तसेच भांडी व इतर गरजेच्या वस्तू दिल्या जातील. राज्यात जर अशी जी धोकादायक ठिकाणो आहेत त्यांचा सव्र्हे केला जाईल. डोंगर, पठार, अशा सर्व धोकादायक ठिकाणची पाहणी केली जाईल. बचावकार्य पूर्ण झाल्यानंतर लगेचच पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.