शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
4
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
5
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
6
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
7
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
8
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
9
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
10
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
11
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
12
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
13
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
14
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
15
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
16
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
17
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
18
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
19
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
20
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!

पंतप्रधान मोदींच्या 'पाक' संबंधांचा शोध घ्या- अबू आझमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2018 06:32 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाकिस्तानसोबतच्या छुप्या संबंधांचा शोध घ्यावा लागेल अन्यथा भारताची सुरक्षा धोक्यात येईल, अशी चिंता समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार अबू असीम आझमी यांनी जाहीर सभेत बोलताना व्यक्त केली.

नाशिक : भारतात जातीयवादाची विष पेरणी करणाऱ्या भाजप व आरएसएससह गुप्तचर यंत्रणेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाकिस्तानसोबतच्या छुप्या संबंधांचा शोध घ्यावा लागेल अन्यथा भारताची सुरक्षा धोक्यात येईल, अशी चिंता समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार अबू असीम आझमी यांनी जाहीर सभेत बोलताना व्यक्त केली.

शहरातील वडाळा रोडवरील एक पटांगणात आयोजित लोकशाही बचाव सभेत आझमी यांनी पंतप्रधानांसह देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. यावेळी मंचावर प्रदेश उपाध्यक्ष रमजान पहिलवान, जमील सिद्दिकी, अजमल फारुखी, सूचिता चव्हाण, जिल्हाध्यक्ष रफिक सय्यद, महानगरप्रमुख इम्रान चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी आझमी म्हणाले, भारत धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. या राष्ट्राची एकात्मता टिकून ठेवणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. मात्र निवडणुकांच्या तोंडावर काही राजकीय पक्ष स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी आयोजित मंदिराचा मुद्दा उपस्थित करून वादग्रस्त विधाने करून देशाची राष्ट्रीय एकात्मता धोक्यात आणू पाहत आहे अशा राजकीय पक्षांची मान्यता सर्वोच्च न्यायालयाने रद्द करावी, यासाठी मी पत्रव्यवहार केला आहे. कारण यांच्या पोळ्या भाजण्यासाठी देशात जातीयवाद उफाळून दंगली घडवून आणण्याचा समाजकंटक प्रयत्न हेतुपुरस्सर करीत असल्याचा आरोप आझमी यांनी यावेळी केला. केंद्रातील मोदी व राज्यातील फडणवीस सरकार विकास करु शक्त नाही, म्हणून फक्त जातीयवादाला खतपाणी घालून सत्ता भोगण्याचा प्रयत्न करीत आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुका जवळ आल्याने त्यांना आयोध्या व राम मंदिराची आठवण झाली आणि शिवसेनेला स्मरण. स्वातंत्र्यपूर्वीपासून देशातील हिंदू-मुस्लिम बांधव एकत्रीतपणे राहत आले आहेत, मात्र इंग्रजांनी येथे सत्ता गाजविण्यासाठी जातीय तेढ निर्माण केला, आणि मोदी व त्यांचे सरकार देखील तेच करू पाहत आहे.  देशाला स्वतंत्र्य मिळवून देण्यासाठी लाखो मुस्लिमांनी बलिदान दिले आहे. आता काही मुठभर लोक देशाचा इतिहास बदलण्याचा प्रयत्न करीत आहे, त्यात ते यशस्वी होणार नाही. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी बर्मामध्ये ज्यावेळी सैन्य तयार केले. त्यात ४० टक्के जवान मुस्लिम समाजाचे होते, असा दाखलाही त्यांनी दिला.शंभर दिवसात परदेशातील काळे धन देशात आणून प्रत्येकाला १५ लाख देण्याचे आश्‍वासन दिले होते, त्याचे काय झाले, असा रोख ठोक सवालदेखील आझमी यांनी मोदी सरकारला केला. लाखो कोटी रुपये घेऊन चोरटे देशातून फरार झाले तेव्हा मोदी यांनी कानावर हात अन् डोळे बंद का केले?  नोटबंदी आणि जीएसटीच्या निर्णयामुळे देशातील ५ कोटी जनता बेरोजगार झाल्याचा दावा त्यांनी केला. देशाचे वातावरण दूषित करण्याचे काम भाजपाकडून होत आहे. मागील साडेचार वर्षात कधी गोहत्या, कधी लव्ह जिहाद, तीन तलाक अशा प्रकारचे मुद्दे उपस्थित करुन देशातील अल्पसंख्यांक समाजाला टार्गेट करण्यात आल्याचे ते म्हणाले.

भारतभर गोहत्या बंदी लागू करासंपूर्ण भारतात भाजपाची सत्ता आहे त्यामुळे नरेंद्र मोदी यांनी केवळ महाराष्ट्रात गोहत्या बंदी करू नये, तर संपूर्ण भारतात गोहत्यावर बंदी घालावी, असा सल्ला आझमी यांनी मोदी सरकारला दिला.

एकात्मता जोपासा, भारत बलशाली करादेशाचे तुकडे होऊ देऊ नका, भारताच्या एकात्मतेला छेद देऊ नका, हिंदू मुस्लीम, शीख, इसाई सगळे सौख्याने मानवतेने राहून भारताला बालशाली बनवूया, जातीयवादी शक्ती आणि त्यांच्या विचारांना मूठमाती द्या, यातच सगळ्यांचे कल्याण आहे, असेही आझमी म्हणाले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघPakistanपाकिस्तानAbu Azmiअबू आझमी