शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
2
देशभरात तपासणी अन् औषधे मोफत; पीएम मोदींच्या हस्ते ‘स्वस्थ नारी योजने’चा शुभारंभ
3
"महाराष्ट्र पेटवण्याचा डाव..."; मीनाताई ठाकरे पुतळ्याची पाहणी, उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्या २ शंका
4
'मोदीजी, संपूर्ण रात्र झोपले नाही, त्यांचा कंठ दाटून आला होता'; शिवराज सिंह चौहानांनी सांगितला १९९२-९२ मधील किस्सा
5
"प्रत्येक दुकानावर बोर्ड असायला हवा, 'गर्व से कहो...!'"; वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचं मोठं आवाहन
6
"शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना, त्यांच्यावर..."; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका
7
७० वर्षांच्या आजारी आजीला पाठीवरुन घेऊन जाणारा नातू सोशल मीडियावर बनला हिरो
8
गोव्याच्या मनोहर पर्रीकरांचे नाव येताच रोखठोक अजितदादा निरुत्तर का झाले असावे? चर्चांना उधाण
9
पितृपक्ष २०२५: केवळ ५ मिनिटे गुरुपुष्यामृत योग, या दिवशी नेमके काय करावे? पाहा, सविस्तर
10
पीएम मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ तात्काळ हटवा; पाटणा उच्च न्यायालयाचा आदेश
11
दिल्ली-मुंबई हल्ल्यात मसूद अजहरचा हात; जैश कमांडर इलियासचा आणखी एक कबुलीजबाब
12
Ind Vs. Pak Asia Cup: आशिया कपमधून बाहेर गेल्यास पाकिस्तानचं कंबरडं मोडणार, होणार 'इतक्या' कोटींचं नुकसान
13
साखर कारखान्याच्या टँकरमध्ये सापडले दोन तरुणांचे मृतदेह, गार्ड आणि अधिकारी गायब  
14
अकोला हादरले! शासकीय रुग्णालयातच एकाची दगडाने ठेचून हत्या, शाब्दिक वादातून मित्रानेच घेतला जीव
15
NEET च्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या आरोपीचा पोलिसांकडून एन्काऊंटर
16
मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी कोटींची उधळपट्टी? कंत्राटदाराने २१ टक्के 'बिलो'ने काम घेतल्याने प्रकार उघडकीस
17
इनरवेअर बनवणाऱ्या शेअरचा जलवा! १०० स्टॉक्समधून एकाच महिन्यात २ लाख रुपयांची कमाई
18
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
19
"आमचे प्रेरणास्रोत..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींना इटलीच्या जॉर्जिया मेलोनी यांच्याकडून खास शुभेच्छा
20
अशक्यही होईल शक्य फक्त जिद्द हवी; १५ वर्षीय दृष्टीहीन करुणाने मिळवलं भारतीय संघात स्थान

पंतप्रधान मोदींच्या 'पाक' संबंधांचा शोध घ्या- अबू आझमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2018 06:32 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाकिस्तानसोबतच्या छुप्या संबंधांचा शोध घ्यावा लागेल अन्यथा भारताची सुरक्षा धोक्यात येईल, अशी चिंता समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार अबू असीम आझमी यांनी जाहीर सभेत बोलताना व्यक्त केली.

नाशिक : भारतात जातीयवादाची विष पेरणी करणाऱ्या भाजप व आरएसएससह गुप्तचर यंत्रणेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाकिस्तानसोबतच्या छुप्या संबंधांचा शोध घ्यावा लागेल अन्यथा भारताची सुरक्षा धोक्यात येईल, अशी चिंता समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार अबू असीम आझमी यांनी जाहीर सभेत बोलताना व्यक्त केली.

शहरातील वडाळा रोडवरील एक पटांगणात आयोजित लोकशाही बचाव सभेत आझमी यांनी पंतप्रधानांसह देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. यावेळी मंचावर प्रदेश उपाध्यक्ष रमजान पहिलवान, जमील सिद्दिकी, अजमल फारुखी, सूचिता चव्हाण, जिल्हाध्यक्ष रफिक सय्यद, महानगरप्रमुख इम्रान चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी आझमी म्हणाले, भारत धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. या राष्ट्राची एकात्मता टिकून ठेवणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. मात्र निवडणुकांच्या तोंडावर काही राजकीय पक्ष स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी आयोजित मंदिराचा मुद्दा उपस्थित करून वादग्रस्त विधाने करून देशाची राष्ट्रीय एकात्मता धोक्यात आणू पाहत आहे अशा राजकीय पक्षांची मान्यता सर्वोच्च न्यायालयाने रद्द करावी, यासाठी मी पत्रव्यवहार केला आहे. कारण यांच्या पोळ्या भाजण्यासाठी देशात जातीयवाद उफाळून दंगली घडवून आणण्याचा समाजकंटक प्रयत्न हेतुपुरस्सर करीत असल्याचा आरोप आझमी यांनी यावेळी केला. केंद्रातील मोदी व राज्यातील फडणवीस सरकार विकास करु शक्त नाही, म्हणून फक्त जातीयवादाला खतपाणी घालून सत्ता भोगण्याचा प्रयत्न करीत आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुका जवळ आल्याने त्यांना आयोध्या व राम मंदिराची आठवण झाली आणि शिवसेनेला स्मरण. स्वातंत्र्यपूर्वीपासून देशातील हिंदू-मुस्लिम बांधव एकत्रीतपणे राहत आले आहेत, मात्र इंग्रजांनी येथे सत्ता गाजविण्यासाठी जातीय तेढ निर्माण केला, आणि मोदी व त्यांचे सरकार देखील तेच करू पाहत आहे.  देशाला स्वतंत्र्य मिळवून देण्यासाठी लाखो मुस्लिमांनी बलिदान दिले आहे. आता काही मुठभर लोक देशाचा इतिहास बदलण्याचा प्रयत्न करीत आहे, त्यात ते यशस्वी होणार नाही. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी बर्मामध्ये ज्यावेळी सैन्य तयार केले. त्यात ४० टक्के जवान मुस्लिम समाजाचे होते, असा दाखलाही त्यांनी दिला.शंभर दिवसात परदेशातील काळे धन देशात आणून प्रत्येकाला १५ लाख देण्याचे आश्‍वासन दिले होते, त्याचे काय झाले, असा रोख ठोक सवालदेखील आझमी यांनी मोदी सरकारला केला. लाखो कोटी रुपये घेऊन चोरटे देशातून फरार झाले तेव्हा मोदी यांनी कानावर हात अन् डोळे बंद का केले?  नोटबंदी आणि जीएसटीच्या निर्णयामुळे देशातील ५ कोटी जनता बेरोजगार झाल्याचा दावा त्यांनी केला. देशाचे वातावरण दूषित करण्याचे काम भाजपाकडून होत आहे. मागील साडेचार वर्षात कधी गोहत्या, कधी लव्ह जिहाद, तीन तलाक अशा प्रकारचे मुद्दे उपस्थित करुन देशातील अल्पसंख्यांक समाजाला टार्गेट करण्यात आल्याचे ते म्हणाले.

भारतभर गोहत्या बंदी लागू करासंपूर्ण भारतात भाजपाची सत्ता आहे त्यामुळे नरेंद्र मोदी यांनी केवळ महाराष्ट्रात गोहत्या बंदी करू नये, तर संपूर्ण भारतात गोहत्यावर बंदी घालावी, असा सल्ला आझमी यांनी मोदी सरकारला दिला.

एकात्मता जोपासा, भारत बलशाली करादेशाचे तुकडे होऊ देऊ नका, भारताच्या एकात्मतेला छेद देऊ नका, हिंदू मुस्लीम, शीख, इसाई सगळे सौख्याने मानवतेने राहून भारताला बालशाली बनवूया, जातीयवादी शक्ती आणि त्यांच्या विचारांना मूठमाती द्या, यातच सगळ्यांचे कल्याण आहे, असेही आझमी म्हणाले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघPakistanपाकिस्तानAbu Azmiअबू आझमी