शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

गडकरींच्या कारखान्यांची ईडीकडून चौकशी करा, अमित शहांना पत्राद्वारे भाजपची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2021 06:12 IST

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ३ जुलैला अमित शहा यांना पाठविलेल्या पत्रासोबत ३० साखर कारखान्यांची यादी जोडली आहे.

यदु जोशी - मुंबई : केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी बंद पडलेले विदर्भातील दोन सहकारी साखर कारखाने विकत घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम काही वर्षांपूर्वी केले. मात्र, प्रदेश भाजपच्या वतीने राज्यातील साखर कारखान्यांच्या विक्रीची सक्तवसुली संचालनालयामार्फत (ईडी) चौकशी करण्यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केलेल्या मागणीत या दोन्ही कारखान्यांचाही समावेश आहे. (Investigate Gadkari's factories from ED, BJP's demand in a letter to Amit Shah)भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ३ जुलैला अमित शहा यांना पाठविलेल्या पत्रासोबत ३० साखर कारखान्यांची यादी जोडली आहे. त्यात वर्धा जिल्ह्यातील महात्मा सहकारी साखर कारखाना आणि भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा सहकारी साखर कारखान्यांचा समावेश आहे. विदर्भातील साखर कारखानदारी जिवंत राहावी यासाठी गडकरींच्या नेतृत्वातील पूर्ती कंपनीने  अनुक्रमे २००९ आणि २०१० मध्ये हे कारखाने लिलावात विकत घेतले होते. दोन्ही कारखाने बंद अवस्थेत होते. जवळपास पाच-सहा वर्षे ते बंद असताना कोणी विकत घ्यायला समोर येत नव्हते. वैनगंगा कारखान्यासाठी तर राज्य सहकारी बँकेने तीनवेळा लिलाव केला, पण कोणी पुढे आले नव्हते. 

महात्मा साखर कारखाना १५-१६ वर्षे चांगल्यारीतीने सहकार तत्त्वावर सुरू होता, पण पुढे तो बंद पडला. तेव्हा हा कारखाना गडकरी यांनी विकत घ्यावा, असे साकडे हजारो शेतकऱ्यांनी त्यांना घातले होते. वर्धेचे तत्कालीन खासदार दत्ता मेघे यांनी शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व करून गडकरींना कारखाना घ्यायला लावला होता. त्यावेळी या कारखान्याची ऑफसेट व्हॅल्यू दहा कोटी रुपये होती. गडकरींनी कारखाना १४ कोटी रुपयांना खरेदी केला होता. वैनगंगा सहकारी साखर कारखान्याची ऑफसेट व्हॅल्यू १० कोटी रुपये होती व तो १४ कोटी रुपयांना खरेदी केला होता. आज हे दोन्ही कारखाने गडकरी यांच्या मार्गदर्शनाखालील मानस अ‍ॅग्रो इंडस्ट्रिज इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडमार्फत चालविले जातात. भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांनी विनंती केल्यानंतर गडकरींनी त्यावेळी हा कारखाना विकत घेतला होता. 

पत्रामुळे आश्चर्य- जे साखर कारखाने आज ईडीच्या रडारवर आहेत त्यांच्यावर मुख्यत्वे ते खासगी कंपन्यांनी विकत घेतल्यानंतरही राज्य सहकारी बँकेने त्यांना कोट्यवधी रुपयांची कर्जे दिली, असा प्रमुख आरोप आहे. मात्र, गडकरी यांनी महात्मा व वैनगंगा कारखाना विकत घेतल्यानंतर राज्य बँकेकडून कर्ज घेतलेच नाही. - या दोन कारखान्यांसाठी अनुक्रमे आंध्र बँक आणि बँक ऑफ इंडिया या राष्ट्रीयीकृत बँकांकडून कर्ज घेण्यात आले होते. असे असतानाही या दोन्ही कारखान्यांना ईडी चौकशीच्या रडारवर आणण्यासाठी प्रदेश भाजपनेच पत्र दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीAmit Shahअमित शहाchandrakant patilचंद्रकांत पाटीलBJPभाजपाSugar factoryसाखर कारखाने