शहरं
Join us  
Trending Stories
1
बँक चौकात रात्रीतून उभा केला सावित्रीबाई फुलेंचा पुतळा; जयंतीच्या पूर्वसंध्येलाच रंगले नाट्य!
2
Mira-Bhayandar: मीरा भाईंदरमध्ये ९५ जागांसाठी ४३५ उमेदवारांत चुरस; भाजपात नाराजीचा सूर कायम!
3
Nagpur: काँग्रेसमध्ये 'ऑल वेल', पण भाजपची डोकेदुखी वाढली; ६ बंडखोरांचा माघार घेण्यास नकार!
4
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
5
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
6
Obscene Content: अश्लील कंटेंटवरून सरकारचा एलन मस्क यांना इशारा, ७२ तासांत मागितला अहवाल!
7
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
8
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
9
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
10
"मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही"; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जहरी टीका
11
पनवेल महानगरपालिकेत मतदानाआधीच विजयाचा गुलाल, महायुतीचे तब्बल सात नगरसेवक बिनविरोध
12
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
13
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
14
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
15
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
16
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
17
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
18
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
19
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
20
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
Daily Top 2Weekly Top 5

इंदूर-मनमाड रेल्वेमार्ग : जेएनपीटीच्या माथी ४,७१६ कोटींचा खर्च

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2018 05:39 IST

देशातील सर्वाधिक कंटेनर हाताळणीचा विक्रम करणाऱ्या जवाहरलाल नेहरू पोर्टकडील (जेएनपीटी) तीन हजार कोटींहून अधिक ठेवींवर डोळा ठेवून केंद्रीय बंदर, जहाजबांधणी आणि रस्ते वाहतूक मंत्रालयाने मनमाड ते इंदूर नव्या रेल्वेमार्गाची बांधणी करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली आहे.

ठाणे - देशातील सर्वाधिक कंटेनर हाताळणीचा विक्रम करणाऱ्या जवाहरलाल नेहरू पोर्टकडील (जेएनपीटी) तीन हजार कोटींहून अधिक ठेवींवर डोळा ठेवून केंद्रीय बंदर, जहाजबांधणी आणि रस्ते वाहतूक मंत्रालयाने मनमाड ते इंदूर नव्या रेल्वेमार्गाची बांधणी करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली आहे. जेएनपीटीला भारतीय बंदर रेल्वे महामंडळाचा भागीदार बनवण्यातील ग्यानबाची मेख अशी आहे की, या मार्गासाठी येणारा ४७१६ कोटी १३ लाख ४५ हजारांचा खर्च त्यांना करावा लागणार आहे. डबघाईला आलेल्या एअर इंडियाच्या मुंबईतील नरिमन पॉइंट येथील इमारतीचा ८०० कोटींचा पांढरा हत्ती पोसण्याचे लोढणे यापूर्वीच वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी जेएनपीटीच्या गळ्यात बांधले आहे.देशातील बंदरांना रेल्वेमार्गांशी जोडण्यास केंद्र सरकारने प्राधान्य दिले आहे. यामुळे रस्त्यावरील वाहतूक कमी होऊन इंधन खर्च वाचून रस्ते अपघात आणि प्रदूषणास आळा बसेल, असा केंद्र शासनाचा दावा आहे. मात्र, हे करताना जो खर्च रेल्वेने करायला हवा, तो मुंबई, नवी मुंबई महापालिका, एमएमआरडीए आणि सिडकोवर सोपवला आहे. इंदूर-मनमाड या नव्या ३६२ किमी मार्गाच्या ८५७४ कोटी ७९ लाख खर्चापैकी ५५ टक्के खर्च जेएनपीटीने करावा, असे केंद्र सरकारने ठरवले आहे.मालेगाव येथे लॉजिस्टिक पार्कइंदूर-मनमाड मार्गाचे महत्त्व अधिक वाढवण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील मालेगाव आणि अन्य ठिकाणी मल्टिमोडल लॉजिस्टिक पार्क विकसित करण्याचे ठरले आहे.उत्तर आणि मध्य भारताला होणार लाभनव्या इंदूर-मनमाड या मार्गामुळे जेएनपीटीत येणारा माल रेल्वेने थेट अतिजलद गतीने उत्तर आणि मध्य भारतात नेणे सोपे होईल, असा केंद्राचा कयास आहे. केंद्र सरकारच्या सागरमाला प्रकल्पांतर्गत भारतीय बंदर रेल्वे महामंडळाची स्थापना केली आहे.या महामंडळाद्वारे इंदूर-मनमाड या मार्गाची बांधणी करण्यात येणार असून त्यासाठी विशेष हेतू कंपनी स्थापन करून तिच्या माध्यमातून तो पूर्ण करण्यात येणार आहे. यासाठी जेएनपीटीची निवड करण्यात आली आहे.एकूण प्रकल्पाच्या५५ टक्के हिस्सा जेएनपीटीचाइंदूर-मनमाड मार्गासाठी येणाºया एकूण खर्चाच्या ५५ टक्के हिस्सा जेएनपीटीस उचलावा लागणार आहे.याशिवाय महाराष्ट्र शासन, मध्य प्रदेश शासन आणि सागरमाला प्रकल्प यांचा प्रत्येकी १५ टक्के असा हिस्सा राहणार आहे.महाराष्ट्र शासनाने असा उचलला खर्चमहाराष्ट्राच्या हिश्श्याचे १५ टक्के अर्थात ५१६ कोटी ९६ लाख रुपये आहेत. त्यातील खोदकाम रॉयल्टीचे १४० कोटी ८६ लाख आणि शासकीय जमिनीचे मूल्य १५ कोटी २५ लाख असे वळते केले असून, उर्वरित ३५८ कोटी ८५ लाख रुपये पाच वर्षांत देण्यात येणार आहेत, तसेच पर्यावरणविषयक आणि इतर परवानग्यांसाठी शासन सहकार्य करणार आहे.अशी आहेत मार्गाची वैशिष्ट्येएकूण रेल्वेमार्गाची लांबी ३६२ किमीराज्यातील रेल्वेमार्गाची लांबी १७६ किमीमध्य प्रदेशातील रेल्वेमार्गाची लांबी १७६ किमीरेल्वेमार्ग प्रकार -विद्युत ब्रॉड गेजरेल्वेमार्गाची गती १२० किमीमार्गावर एकूण स्थानके १३लागणारी जमीन २००८ हेक्टर (महाराष्ट्र ९६४ हेक्टर)एकूण प्रस्तावित किंमत ८५७४.७९ कोटी

टॅग्स :railwayरेल्वेJNPTजेएनपीटी